शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

रस्त्याच्या कडेला फेकले शेकडो रोपटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 23:09 IST

वैरागड-कढोली मार्गाच्या बाजूला सामाजिक वनीकरण विभागाने वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदले. रोपटेही आणले. मात्र या रोपट्यांची लागवड न करताच सदर रोपटे रस्त्याच्या बाजूला फेकून देण्यात आले आहेत. यामुळे रोपटे व खड्डे खोदण्याचा खर्च वाया गेला आहे.

ठळक मुद्देखड्डे खोदणे व रोपट्यांचा खर्च पाण्यात : चौकशी करून कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : वैरागड-कढोली मार्गाच्या बाजूला सामाजिक वनीकरण विभागाने वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदले. रोपटेही आणले. मात्र या रोपट्यांची लागवड न करताच सदर रोपटे रस्त्याच्या बाजूला फेकून देण्यात आले आहेत. यामुळे रोपटे व खड्डे खोदण्याचा खर्च वाया गेला आहे.१ जुलैपासून ३३ कोटी वृक्ष लागवडीची मोहीम राबविली जात आहे. केवळ उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नको त्या ठिकाणी खड्डे खोदून वृक्ष लागवडीचा फार्स आटोपला जात आहे. वृक्ष लागवडीनंतर त्याला कठडा केला जात नसल्याने दुसऱ्याच दिवशी किंवा काही वेळातच जनावरे सदर झाड फस्त करीत आहेत.वैरागड मार्गावर पाठनवाडा ते कराडीदरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूला सामाजिक वनीकरण विभागाने वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदले. मात्र या खड्ड्यांमध्ये वृक्ष लागवड केली नाही. रस्त्याच्या बाजूला रोपटे अस्ताव्यस्त पडून आहेत. यातील काही रोपटे कोमेजले सुद्धा आहेत. खड्डे व वृक्षांचा खर्च वाया गेला आहे. असे प्रकार जिल्हाभरात अनेक ठिकाणी घडले आहेत.विशेष म्हणजे अगदी मुख्य रस्त्याच्या बाजूला लागवड न करताच रोपटे फेकण्यात आले आहेत. वनविभाग जंगलात लाखो झाडांची लागवड करीत असल्याचे दाखविते. मात्र खरच लागवड होते काय व त्यातील किती वृक्ष जगतात याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. गडचिरोली जिल्ह्याला लाखो झाडे लावण्याचे उद्दिष्ट दिले आहे. यासाठी शासनाचे कोट्यवधी रुपये खर्च होतात. मात्र झाडे न लावताच सदर पैसे परस्पर खर्च केले जात असल्याचा प्रकार नाकारता येत नाही. किती झाडे लावण्यात आली, त्यातील किती झाडे जगली, याचा सर्वेक्षण होणे गरजचे आहे. अन्यथा पुन्हा पुढील १० वर्ष लागवड झाली तरी वृक्षांची संख्या वाढणार नाही.