शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

शेकडो हातपंप बंद

By admin | Updated: April 21, 2017 01:11 IST

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अनेक गावांमध्ये उन्हाळ्याच्या दिवसात हातपंप नादुरूस्त स्थितीत आहेत.

दुर्लक्ष : ग्रामीण भागात नागरिकांची पाण्यासाठी धावाधावगडचिरोली : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अनेक गावांमध्ये उन्हाळ्याच्या दिवसात हातपंप नादुरूस्त स्थितीत आहेत. काही ठिकाणी सौरऊर्जेवरील पाणीपुरवठा योजना बंद पडून आहेत. त्यामुळे पाणीटंचाईचे मोठे संकट निर्माण झाले आहे. नदीकाठावरील गावांनाही पाणीटंचाईची झळ जाणवू लागली आहे. मुलचेरा तालुक्यातील अडपल्ली माल ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या मलकापूर येथे मागील आठवडाभरापासून पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी इतरत्र भटकावे लागत आहे. गावातील दोन हातपंपातील जलपातळी खालावली असून येथील सौरऊर्जेवरील नळयोजनाही बंद अवस्थेत आहे. अडपल्ली गट ग्रामपंचायत अंतर्गत सहा गावांचा समावेश होतो. या गावांपैैकी मलकापूर गाव आहे. या गावाची लोकसंख्या अडीच हजारावर आहे. लोकसंख्येच्या मानाने येथे केवळ दोन हातपंप आहेत. तसेच २००८ मध्ये जलस्वराज्य योजनेतून ६८ हजार रूपयांचा खर्च करून सौरऊर्जेवरील नळ योजना कार्यान्वित करण्यात आली होती. या योजनेंतर्गत गावात पाण्याची टाकी व पाईपही टाकण्यात आले. काही दिवस सुरळीत पाणी पुरवठा झाला. मात्र काही दिवसांतच नळ योजना बंद पडली. अडीच हजारावर लोकसंख्या असतानाही गावात केवळ दोन हातपंप आहेत. सध्या या हातपंपातील जलस्तर घटलेला आहे. त्यामुळे महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी पहाटेपासूनच नळावर गर्दी करावी लागते. सौर ऊर्जेवरील नळ योजनेंतर्गत ८०० लोकांना कनेक्शन देण्यात आले आहे. अहेरी तालुक्यातील तिमरम येथील दोन्ही हातपंप मागील सात दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे या गावातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तिमरम या गावाची लोकसंख्या जवळपास २०० एवढी आहे. या गावात केवळ दोनच हातपंप आहेत. दोन्ही हातपंप एकाचवेळी बंद पडल्याने गावातील महिलांना अर्धा किमी अंतरावरून पाणी आणावे लागत आहे. पुरूष मंडळीही पाणी भरत असल्याचे दिसून येत आहे. १० दिवसांपूर्वी बंद अवस्थेतील हातपंप दुरूस्त करण्यात आला. मात्र सदर हातपंप केवळ दोन दिवसातच बंद पडला. चामोर्शी तालुक्यातील घोट परिसरातील पेटतळा येथील वार्ड क्रमांक २ मधील तीन हातपंप मागील एक महिन्यापासून बंद आहेत. यामध्ये तुळसाबाई येर्रेवार यांच्या दुकानासमोरील, गजनान बर्लावार यांच्या घरासमोरील व गोटूल जवळील हातपंपाचा समावेश आहे. गडचिरोली शहरानजीक असलेल्या नवेगाव व मुरखळा या दोन गावांमधील जवळपास सहा हातपंप बंद असल्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.भामरागड तालुक्यातील लाहेरी येथील तीन हातपंप गेल्या दहा दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. धानोरा तालुक्यातील नरचुली ग्राम पंचायतीतर्गत येत असलेल्या वानरचुवा येथे बांधकाम करण्यात आलेल्या विहिरीला प्लेटफार्म नसल्याने सदर विहिरीवरून पाणी भरता येत नाही. गावात एकच हातपंप असल्यामुळे भर उन्हाळ्यात नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. अनेक ठिकाणी पंचायत समित्यांकडे नागरिकांनी हातपंप बंद असल्याबाबत तक्रारी केल्या. परंतु पंचायत समितीस्तरावर एक किंवा दोनच पथक कार्यरत आहे. बंद हातपंपाची संख्या अधिक असल्याने पथकाचीही हातपंप दुरूस्तीसाठी दमछाक होत आहे. वाढत्या उष्णतामानात दुपारी १२ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत गावेही ओस पडून आहेत. त्यामुळे पथकही आपले काम करू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. (लोकमत वृत्तसेवा)