शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "अजित पवार, सगळ्यांचा नाद करायचा, पण..."; भाजपा नेते राजन पाटलांच्या मुलाचं थेट चॅलेंज
2
भारताला 'हिंदू राष्ट्र' घोषित करण्याची गरज नाही, हिंदू म्हणजे अशी व्यक्ती जी...- मोहन भागवत
3
'AI वर आंधळा विश्वास ठेवू नका; यातील गुंतवणुकीचा फुगा कधीही फुटू शकतो' सुंदर पिचाईं यांचा इशारा!
4
"मुलाच्या मनात माझा आदर वाढेल"; डिनर पार्टीत ट्रम्प यांनी रोनाल्डोसोबत शेअर केला घरातला खास किस्सा
5
Mumbai Airport: मुंबई विमानतळ २० नोव्हेंबर रोजी ६ तास बंद राहणार, कारण काय?
6
अनगरात 'सही'चा खेळ! अर्ज बाद होताच उज्ज्वला थिटेंचा आरोप, 'मुलगा सोबत असूनही सही राहिलीच कशी?
7
FD-RD विसरा! सुरक्षित गुंतवणूक हवी असल्यास FMP ठरेल स्मार्ट चॅाईस, लो रिस्क हाय रिटर्नचा स्मार्ट कॅाम्बो
8
भाजपाची घराणेशाही! एकाच कुटुंबातील ६ जणांना तिकीट; पत्नी, भाऊ, वहिनी, मेहुणा... सगळेच रिंगणात
9
Mahayuti: भाजप- शिंदे गटात माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा, निवडणुकीपूर्वी महायुतीत अंतर्गत वाद शिगेला!
10
शेअर बाजारात आजही घसरण, २५,९०० च्या खाली निफ्टी; IT Stocks मध्ये मोठी खरेदी
11
Video: "लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम..."; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा घणाघात, भाजपावर निशाणा
12
Delhi Blast: युनूस सरकारचा दावा खोटा; अटकेत असलेला इख्तियार बांगलादेशचा पर्दाफाश करणार !
13
आजचे राशीभविष्य - १९ नोव्हेंबर २०२५, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इत्यादीसाठी आजचा दिवस अनुकूल
14
Politics: "मला आणि माझा मुलाला मारण्याचा कट" भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्याचा शिंदेसेनेवर गंभीर आरोप!
15
Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार, आरक्षणाच्या मर्यादेवर आज सुनावणी!
16
Mumbai Airport: विमानतळ परिसरातील मार्ग आजपासून २ दिवस बंद; 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर!
17
CNG Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा! ३ दिवसांनंतर सीएनजी पुरवठा पूर्ववत, प्रवाशांनी सोडला सुटकेचा निःश्वास
18
Farmers Relief: मुसळधार पाऊस किंवा वन्य प्राण्यांनी पीक तुडवले, नुकसान भरपाई मिळणार,  पण एक अट!
19
Mahayuti: एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी पळवण्यावरून महायुतीत घमासान! 
20
Government Decision: 'नोटरी'वर झालेले जमीन व्यवहारही आता कायदेशीर; ३ कोटी नागरिकांना मोठा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील किती शिक्षकांनी शाळेत जायचे रे भाऊ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:24 IST

गडचिराेली : पूर्व विदर्भ वगळता महाराष्ट्रातील इतर सर्व जिल्ह्यांतील शाळा १५ जून मंगळवारपासून सुरू झाल्या. विदर्भातील शाळा २८ जूनपासून ...

गडचिराेली : पूर्व विदर्भ वगळता महाराष्ट्रातील इतर सर्व जिल्ह्यांतील शाळा १५ जून मंगळवारपासून सुरू झाल्या. विदर्भातील शाळा २८ जूनपासून सुरू हाेणार आहेत. त्या अनुषंगाने शिक्षण पद्धती व शाळा उपस्थितीबाबत शिक्षण संचालकांनी मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. शिक्षण संचालकांनी शिक्षकांसाठी ५० टक्के व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी १०० टक्के उपस्थिती असावी, असे म्हटले आहे. या संदर्भात जि. प. चे नियाेजन व तसे आदेश अजूनही निघाले नाहीत. त्यामुळे किती शिक्षकांनी शाळेत जायचे रे भाऊ? असा प्रश्न शिक्षकांमधून उपस्थित केला जात आहे.

गडचिराेली जिल्ह्यात एकूण १ हजार ८५८ शाळा आहेत. यामध्ये १ हजार ४६४ जिल्हा परिषद शाळा आहेत. २०४ अनुदानित, तर १८ शाळा विनाअनुदानित आहेत. इंग्रजी माध्यमांच्या काॅन्व्हेंटसह ९१ शाळा स्वंअर्थसाहाय्य तत्त्वावर चालविल्या जातात. गतवर्षीचे शैक्षणिक सत्र काेराेना संकटामुळे ऑनलाईन पद्धतीनेच पार पडले. त्यापूर्वीच्या मार्च व एप्रिल महिन्यातील परीक्षा काेराेनामुळे ऑनलाईनच झाल्या.

काेट .....

२८ जूनपासून जिल्ह्यातील शाळा सुरू हाेत असून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत शिक्षण संचालकांचे पत्र प्राप्त झाले आहे. या पत्रानुसार शिक्षण विभागाच्या वतीने तसे नियाेजन करण्यात येणार आहे. शासनाच्या आदेशानुसार ऑनलाईन पद्धतीनेच सुरुवातीला शैक्षणिक सत्र चालणार आहे.

- हेमलता परसा, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जि. प. गडचिराेली.

बाॅक्स ......

संचालकांच्या पत्रांचे काय?

- पहिली ते नववी आणि अकरावीच्या वर्गाच्या सर्व शाळांमध्ये ५० टक्के शिक्षक उपस्थिती अनिवार्य राहिली. दहावी व बारावीच्या वर्गावर शिकविणाऱ्या शिक्षकांची उपस्थिती १०० टक्के, तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थिती १०० टक्के अनिवार्य राहील. सर्व शाळांचे मुख्याध्यापक, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य यांची १०० टक्के उपस्थिती अनिवार्य आहे, असे शिक्षण संचालकांनी १४ जूनला काढलेल्या पत्रात नमूद आहे.

बाॅक्स ...

जि. प.चे पत्र नाही

- जिल्ह्यातील शाळा सुरू हाेण्यास १० दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. शिक्षण संचालकांचे पत्र प्राप्त झाले असले तरी शिक्षक, कर्मचारी उपस्थितीबाबत जि. प. ने काेणतेही आदेश वा पत्र काढले नाही.

काेट ......

ऑनलाईन पद्धतीने शिक्षण चालणार असल्याने सर्व शिक्षकांची शाळेत उपस्थिती फारशी गरजेची नाही. काेविडच्या दृष्टिकाेनातून खबरदारी घेऊन शाळा ऑनलाईन पद्धतीने चालणार आहे.

- विलास मगरे, शिक्षक

काेट ......

अहेरी उपविभागातील दुर्गम भागात अनेक शाळा दाेन शिक्षकी आहेत. ५० टक्के उपस्थितीनुसार एका शिक्षकाला सर्व कामे सांभाळावी लागणार आहेत. शासनाच्या मार्गदर्शनानुसार काम करू.

- उत्तम मडावी, शिक्षक