शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

जनावरे जगवायची कशी?

By admin | Updated: May 5, 2016 00:12 IST

तालुक्यात पाणी व वैरणाचा प्रश्न बिकट होत चालला आहे. पावसाळ्यापर्यंत जनावरे जगवायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे.

परिस्थिती बिकट : भामरागड तालुक्याच्या दुर्गम भागात शेतकऱ्यांसमोर संकटभामरागड : तालुक्यात पाणी व वैरणाचा प्रश्न बिकट होत चालला आहे. पावसाळ्यापर्यंत जनावरे जगवायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. त्यामुळे शेकडो शेतकऱ्यांनी आपले जनावरे जगो की मरो या आशेवर जंगलात मोकाट सोडून दिली आहे. जंगलातही पाण्याचे स्रोत फारसे राहिलेले नाहीत. त्यामुळे शेकडो जनावरे जंगलातही मेलेले आहेत. आपलं जनावरं वाचलं की मेलं हे पाहण्यासाठी जाण्याची हिंमतही शेतकऱ्यांमध्ये उरलेली नाही. इतकी बिकट परिस्थिती भामरागड तालुक्यात आहे. छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेलगत असलेल्या भामरागड तालुक्यात १२८ गावे आहेत. अनेक गावाजवळून मोठ्या व लहान नद्या, नाले वाहतात. परंतु यावर्षी या गावामध्येही पाणी टंचाईची समस्या बिकट आहे. ज्या गावात नदी आहे. त्या नदीचे पात्र मार्च महिन्यातच कोरडे झाले आहे. मे महिन्यात तर नदीचा मुख्य डोहही कोरडा होईल, अशी माहिती गावातील जुन्या लोकांनी लोकमत प्रतिनिधीशी बोलताना दिली, अशी परिस्थिती गेल्या १८ वर्षात पाहिलेली नाही, असेही लोक सांगत आहे. गुराढोरांना पाणी पाजण्याचा गंभीर प्रश्न असून जंगलातही आता मुबलक चारा राहिलेला नाही. आदिवासी बहूल भागात गावातील लोक शेतीचे कामे संपल्यानंतर पीक हाती येईपर्यंत गुरे चारण्याचे काम करतात परंतु जंगलही मोठ्या प्रमाणावर जळून गेला आहे. त्यामुळे पावसाळ्यापर्यंत बैल जगवायचे कसे हा प्रश्न शेतकऱ्यानाही भेडसावत आहे. गावातील बोअरवेलचे गुंडभर पाणी घेण्यासाठी पहाटे ४ वाजतापासून महिलांची गर्दी असते. तर गुरांना पाणी पाजायचे कुठे म्हणून गावकऱ्यांनी मार्च महिन्यातच जनावरे जंगलात सोडून दिले आहे. काही जनावरे इंद्रावती, पामूलगौतम, पर्लकोटा, बांडीया नदीच्या किनाऱ्यावर सोडले. अनेक गावांसाठी नदी ३० किमी अंतरावर पडते. जंगलातील तलाव, मालगुजारी तलाव, वनतलावही नसलेले अनेक गाव आहेत. या गावातील जनावरांचे हाल आहेत. ऐवढ्या नद्या असुनही यावर्षी नद्यांचे पात्र कोरडे झाले. जंगलात शेतकऱ्यांनी सोडलेले जनावरे मरून पडले आहे. तालुक्याच्या काही भागात प्रतिनिधीने भेट दिली. यावेळी अनेक जनावरे मेलेले दिसले. तर खंडेनैनवाडी, मरदूर, कुचेर, वटेली या गावात तलाव नाहीत. बोअरवेलही आटलेल्या आहे. येथे केवळ मानसांना पिण्यापुरतेच पाणी मिळते. तेथे जनावरे पोसायचे कसे म्हणून जंगलात सोडणाऱ्यांची संख्या अधिक आहे. (तालुका प्रतिनिधी)