शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

जनावरे जगवायची कशी?

By admin | Updated: May 5, 2016 00:12 IST

तालुक्यात पाणी व वैरणाचा प्रश्न बिकट होत चालला आहे. पावसाळ्यापर्यंत जनावरे जगवायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे.

परिस्थिती बिकट : भामरागड तालुक्याच्या दुर्गम भागात शेतकऱ्यांसमोर संकटभामरागड : तालुक्यात पाणी व वैरणाचा प्रश्न बिकट होत चालला आहे. पावसाळ्यापर्यंत जनावरे जगवायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. त्यामुळे शेकडो शेतकऱ्यांनी आपले जनावरे जगो की मरो या आशेवर जंगलात मोकाट सोडून दिली आहे. जंगलातही पाण्याचे स्रोत फारसे राहिलेले नाहीत. त्यामुळे शेकडो जनावरे जंगलातही मेलेले आहेत. आपलं जनावरं वाचलं की मेलं हे पाहण्यासाठी जाण्याची हिंमतही शेतकऱ्यांमध्ये उरलेली नाही. इतकी बिकट परिस्थिती भामरागड तालुक्यात आहे. छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेलगत असलेल्या भामरागड तालुक्यात १२८ गावे आहेत. अनेक गावाजवळून मोठ्या व लहान नद्या, नाले वाहतात. परंतु यावर्षी या गावामध्येही पाणी टंचाईची समस्या बिकट आहे. ज्या गावात नदी आहे. त्या नदीचे पात्र मार्च महिन्यातच कोरडे झाले आहे. मे महिन्यात तर नदीचा मुख्य डोहही कोरडा होईल, अशी माहिती गावातील जुन्या लोकांनी लोकमत प्रतिनिधीशी बोलताना दिली, अशी परिस्थिती गेल्या १८ वर्षात पाहिलेली नाही, असेही लोक सांगत आहे. गुराढोरांना पाणी पाजण्याचा गंभीर प्रश्न असून जंगलातही आता मुबलक चारा राहिलेला नाही. आदिवासी बहूल भागात गावातील लोक शेतीचे कामे संपल्यानंतर पीक हाती येईपर्यंत गुरे चारण्याचे काम करतात परंतु जंगलही मोठ्या प्रमाणावर जळून गेला आहे. त्यामुळे पावसाळ्यापर्यंत बैल जगवायचे कसे हा प्रश्न शेतकऱ्यानाही भेडसावत आहे. गावातील बोअरवेलचे गुंडभर पाणी घेण्यासाठी पहाटे ४ वाजतापासून महिलांची गर्दी असते. तर गुरांना पाणी पाजायचे कुठे म्हणून गावकऱ्यांनी मार्च महिन्यातच जनावरे जंगलात सोडून दिले आहे. काही जनावरे इंद्रावती, पामूलगौतम, पर्लकोटा, बांडीया नदीच्या किनाऱ्यावर सोडले. अनेक गावांसाठी नदी ३० किमी अंतरावर पडते. जंगलातील तलाव, मालगुजारी तलाव, वनतलावही नसलेले अनेक गाव आहेत. या गावातील जनावरांचे हाल आहेत. ऐवढ्या नद्या असुनही यावर्षी नद्यांचे पात्र कोरडे झाले. जंगलात शेतकऱ्यांनी सोडलेले जनावरे मरून पडले आहे. तालुक्याच्या काही भागात प्रतिनिधीने भेट दिली. यावेळी अनेक जनावरे मेलेले दिसले. तर खंडेनैनवाडी, मरदूर, कुचेर, वटेली या गावात तलाव नाहीत. बोअरवेलही आटलेल्या आहे. येथे केवळ मानसांना पिण्यापुरतेच पाणी मिळते. तेथे जनावरे पोसायचे कसे म्हणून जंगलात सोडणाऱ्यांची संख्या अधिक आहे. (तालुका प्रतिनिधी)