शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

जनावरे जगवायची कशी?

By admin | Updated: May 5, 2016 00:12 IST

तालुक्यात पाणी व वैरणाचा प्रश्न बिकट होत चालला आहे. पावसाळ्यापर्यंत जनावरे जगवायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे.

परिस्थिती बिकट : भामरागड तालुक्याच्या दुर्गम भागात शेतकऱ्यांसमोर संकटभामरागड : तालुक्यात पाणी व वैरणाचा प्रश्न बिकट होत चालला आहे. पावसाळ्यापर्यंत जनावरे जगवायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. त्यामुळे शेकडो शेतकऱ्यांनी आपले जनावरे जगो की मरो या आशेवर जंगलात मोकाट सोडून दिली आहे. जंगलातही पाण्याचे स्रोत फारसे राहिलेले नाहीत. त्यामुळे शेकडो जनावरे जंगलातही मेलेले आहेत. आपलं जनावरं वाचलं की मेलं हे पाहण्यासाठी जाण्याची हिंमतही शेतकऱ्यांमध्ये उरलेली नाही. इतकी बिकट परिस्थिती भामरागड तालुक्यात आहे. छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेलगत असलेल्या भामरागड तालुक्यात १२८ गावे आहेत. अनेक गावाजवळून मोठ्या व लहान नद्या, नाले वाहतात. परंतु यावर्षी या गावामध्येही पाणी टंचाईची समस्या बिकट आहे. ज्या गावात नदी आहे. त्या नदीचे पात्र मार्च महिन्यातच कोरडे झाले आहे. मे महिन्यात तर नदीचा मुख्य डोहही कोरडा होईल, अशी माहिती गावातील जुन्या लोकांनी लोकमत प्रतिनिधीशी बोलताना दिली, अशी परिस्थिती गेल्या १८ वर्षात पाहिलेली नाही, असेही लोक सांगत आहे. गुराढोरांना पाणी पाजण्याचा गंभीर प्रश्न असून जंगलातही आता मुबलक चारा राहिलेला नाही. आदिवासी बहूल भागात गावातील लोक शेतीचे कामे संपल्यानंतर पीक हाती येईपर्यंत गुरे चारण्याचे काम करतात परंतु जंगलही मोठ्या प्रमाणावर जळून गेला आहे. त्यामुळे पावसाळ्यापर्यंत बैल जगवायचे कसे हा प्रश्न शेतकऱ्यानाही भेडसावत आहे. गावातील बोअरवेलचे गुंडभर पाणी घेण्यासाठी पहाटे ४ वाजतापासून महिलांची गर्दी असते. तर गुरांना पाणी पाजायचे कुठे म्हणून गावकऱ्यांनी मार्च महिन्यातच जनावरे जंगलात सोडून दिले आहे. काही जनावरे इंद्रावती, पामूलगौतम, पर्लकोटा, बांडीया नदीच्या किनाऱ्यावर सोडले. अनेक गावांसाठी नदी ३० किमी अंतरावर पडते. जंगलातील तलाव, मालगुजारी तलाव, वनतलावही नसलेले अनेक गाव आहेत. या गावातील जनावरांचे हाल आहेत. ऐवढ्या नद्या असुनही यावर्षी नद्यांचे पात्र कोरडे झाले. जंगलात शेतकऱ्यांनी सोडलेले जनावरे मरून पडले आहे. तालुक्याच्या काही भागात प्रतिनिधीने भेट दिली. यावेळी अनेक जनावरे मेलेले दिसले. तर खंडेनैनवाडी, मरदूर, कुचेर, वटेली या गावात तलाव नाहीत. बोअरवेलही आटलेल्या आहे. येथे केवळ मानसांना पिण्यापुरतेच पाणी मिळते. तेथे जनावरे पोसायचे कसे म्हणून जंगलात सोडणाऱ्यांची संख्या अधिक आहे. (तालुका प्रतिनिधी)