शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

माझ्यापेक्षा मैत्रिणीला जास्त गुण कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:39 IST

गडचिराेली : दीड वर्षांपासून काेराेना विषाणूच्या संसर्गाचा धाेका कायम आहे. त्यामुळे यावर्षीच्या उन्हाळ्यात इयत्ता दहावी व बारावीची बाेर्डाची परीक्षा ...

गडचिराेली : दीड वर्षांपासून काेराेना विषाणूच्या संसर्गाचा धाेका कायम आहे. त्यामुळे यावर्षीच्या उन्हाळ्यात इयत्ता दहावी व बारावीची बाेर्डाची परीक्षा न घेता अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारावर विद्यार्थ्यांना गुणदान करण्यात आले. परंतु, अनेक हुशार विद्यार्थ्यांनाही इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत कमी गुण मिळाल्याने हुशार विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य निर्माण झाले. त्यांच्यातील शैक्षणिक ओढ कमी झाल्याचे दिसून येते.

बाॅक्स

परीक्षा नाही, पुनर्मूल्यांकनही नाही

इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना नववीतील वार्षिक परीक्षांच्या आधारावर तसेच त्यांची शाळेतील शैक्षणिक प्रगती यानुसार गुणदान करण्यात आले. इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांनासुद्धा अकरावीतील वार्षिक गुण व शाळेतील शैक्षणिक प्रगती तसेच बुद्धिमता याच्या आधारावर गुणदान झाले. परीक्षा न झाल्याने विद्यार्थी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करू शकत नाही.

स्थानिक शाळांमध्येच पालकांच्या शंकांचे झाले निरसन

इयत्ता दहावी व बारावीच्या अनेक हुशार विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाले, तर त्यांच्यापेक्षा अल्प हुशार असलेल्या काहींना अधिक गुण मिळाल्याने बहुतांश पालकांनी केवळ शाळास्तरावर संबंधित मुख्याध्यापकांकडे शिक्षकांनाच विचारणा केली. शिक्षण विभाग अथवा परीक्षा बाेर्डाकडे तक्रारी केल्या नाही. विद्यार्थ्यांना कशा प्रकारे गुणदान करण्यात आले याबाबत समजावून सांगितल्यानंतर त्यांचाही राेष मावळला.

विद्यार्थी म्हणतात...

आमच्या वर्गात मी सर्वांत हुशार विद्यार्थी हाेताे. इयत्ता नववीपर्यंत घेतलेल्या सर्वच वार्षिक व सराव परीक्षांमध्ये मला सर्वाधिक गुण मिळायचे. गणित व इंग्रजी हा विषय माझा सर्वाधिक आवडीचा. परंतु, याच विषयात मला बरेच कमी गुण मिळाले.

- गाैरव मडावी, विद्यार्थी

इयत्ता दहावीच्या वार्षिक परीक्षेत मला प्रावीण्य श्रेणी मिळाली हाेती. बारावीतही अपेक्षेनुसार प्रावीण्य श्रेणीच मिळेल, अशी अपेक्षा हाेती. त्यानुसार मी अभ्यासही केला. परंतु, परीक्षाच न झाल्याने गुण मिळविणे आपल्या हाती नव्हते. अपेक्षेप्रमाणे गुण मिळाले नाही.

- स्वप्निल गंडाटे, विद्यार्थी

निकालावर नाराज असलेले पालक म्हणाले....

काेराेना संकटामुळे इयत्ता दहावी व बारावीची बाेर्डाची परीक्षा झाली नाही. शाळांमार्फत विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतेनुसार गुण मिळतील, असे वाटत हाेते. परंतु, माझ्यासह अनेक पालकांचा हिरमाेड झाला. अनेक पालक नाराज आहेत.

विशाल साेनकुसरे, पालक

माझा मुलगा वर्गात सर्वांत हुशार हाेता. त्याला बाेर्डाच्या परीक्षेतही चांगले गुण मिळतील अशी आशा हाेती. परंतु, शाळेतील बहुतांश शिक्षकांनी मर्जीतील विद्यार्थ्यांनाच अधिक गुण दिले व इतरांना दुय्यम स्थान दिल्याने बऱ्याच विद्यार्थ्यांचे नुकसान झाले.

- सुधाकर चापले, पालक