शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

माझ्यापेक्षा मैत्रिणीला जास्त गुण कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:39 IST

गडचिराेली : दीड वर्षांपासून काेराेना विषाणूच्या संसर्गाचा धाेका कायम आहे. त्यामुळे यावर्षीच्या उन्हाळ्यात इयत्ता दहावी व बारावीची बाेर्डाची परीक्षा ...

गडचिराेली : दीड वर्षांपासून काेराेना विषाणूच्या संसर्गाचा धाेका कायम आहे. त्यामुळे यावर्षीच्या उन्हाळ्यात इयत्ता दहावी व बारावीची बाेर्डाची परीक्षा न घेता अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारावर विद्यार्थ्यांना गुणदान करण्यात आले. परंतु, अनेक हुशार विद्यार्थ्यांनाही इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत कमी गुण मिळाल्याने हुशार विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य निर्माण झाले. त्यांच्यातील शैक्षणिक ओढ कमी झाल्याचे दिसून येते.

बाॅक्स

परीक्षा नाही, पुनर्मूल्यांकनही नाही

इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना नववीतील वार्षिक परीक्षांच्या आधारावर तसेच त्यांची शाळेतील शैक्षणिक प्रगती यानुसार गुणदान करण्यात आले. इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांनासुद्धा अकरावीतील वार्षिक गुण व शाळेतील शैक्षणिक प्रगती तसेच बुद्धिमता याच्या आधारावर गुणदान झाले. परीक्षा न झाल्याने विद्यार्थी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करू शकत नाही.

स्थानिक शाळांमध्येच पालकांच्या शंकांचे झाले निरसन

इयत्ता दहावी व बारावीच्या अनेक हुशार विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाले, तर त्यांच्यापेक्षा अल्प हुशार असलेल्या काहींना अधिक गुण मिळाल्याने बहुतांश पालकांनी केवळ शाळास्तरावर संबंधित मुख्याध्यापकांकडे शिक्षकांनाच विचारणा केली. शिक्षण विभाग अथवा परीक्षा बाेर्डाकडे तक्रारी केल्या नाही. विद्यार्थ्यांना कशा प्रकारे गुणदान करण्यात आले याबाबत समजावून सांगितल्यानंतर त्यांचाही राेष मावळला.

विद्यार्थी म्हणतात...

आमच्या वर्गात मी सर्वांत हुशार विद्यार्थी हाेताे. इयत्ता नववीपर्यंत घेतलेल्या सर्वच वार्षिक व सराव परीक्षांमध्ये मला सर्वाधिक गुण मिळायचे. गणित व इंग्रजी हा विषय माझा सर्वाधिक आवडीचा. परंतु, याच विषयात मला बरेच कमी गुण मिळाले.

- गाैरव मडावी, विद्यार्थी

इयत्ता दहावीच्या वार्षिक परीक्षेत मला प्रावीण्य श्रेणी मिळाली हाेती. बारावीतही अपेक्षेनुसार प्रावीण्य श्रेणीच मिळेल, अशी अपेक्षा हाेती. त्यानुसार मी अभ्यासही केला. परंतु, परीक्षाच न झाल्याने गुण मिळविणे आपल्या हाती नव्हते. अपेक्षेप्रमाणे गुण मिळाले नाही.

- स्वप्निल गंडाटे, विद्यार्थी

निकालावर नाराज असलेले पालक म्हणाले....

काेराेना संकटामुळे इयत्ता दहावी व बारावीची बाेर्डाची परीक्षा झाली नाही. शाळांमार्फत विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतेनुसार गुण मिळतील, असे वाटत हाेते. परंतु, माझ्यासह अनेक पालकांचा हिरमाेड झाला. अनेक पालक नाराज आहेत.

विशाल साेनकुसरे, पालक

माझा मुलगा वर्गात सर्वांत हुशार हाेता. त्याला बाेर्डाच्या परीक्षेतही चांगले गुण मिळतील अशी आशा हाेती. परंतु, शाळेतील बहुतांश शिक्षकांनी मर्जीतील विद्यार्थ्यांनाच अधिक गुण दिले व इतरांना दुय्यम स्थान दिल्याने बऱ्याच विद्यार्थ्यांचे नुकसान झाले.

- सुधाकर चापले, पालक