शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

तलावांमध्ये वस्त्या वाढल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 23:17 IST

गडचिरोली शहरात पाच तलाव आहेत. या तलावांमध्ये अतिक्रमण करून नागरिकांनी घरे बांधली आहेत.

ठळक मुद्देशेती धोक्यात : कारवाई नसल्याने अतिक्रमण बोकाळले

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली शहरात पाच तलाव आहेत. या तलावांमध्ये अतिक्रमण करून नागरिकांनी घरे बांधली आहेत. अतिक्रमणाचा दरवर्षी विस्तार होत असल्याने तलावांचे अस्तित्व धोक्यात आले असून त्यावर अवलंबून असलेली शेतजमीनही अडचणीत आली आहे.जिल्हा निर्मितीपूर्वी गडचिरोली हे लहानसे खेडे होते. येथील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती असल्याने गावाच्या सभोवताल पाच तलाव होते. आता हे चारही तलाव शहरात सापडली आहेत. जिल्हा मुख्यालय असल्याने दरवर्षी घरांच्या संख्येत भर पडत आहे. गडचिरोली शहराला विस्तारासाठी फार कमी जागा असल्याने जागेच्या किंमती नागपूर शहराच्या तुलनेतही अधिक आहेत. काही नागरिकांनी तलावामध्ये अतिक्रमण करून जागा पकडली आहे. शहराच्या मध्यभागी आठवडी बाजाराजवळ असलेल्या तलावात तर चारही बाजुने अतिक्रमण झाले आहे. गोकुलनगर मार्गाच्या बाजुला शेकडो घरे बांधण्यात आली आहेत. त्याचबरोबर गडचिरोली-मूल मुख्य मार्गाच्या बाजुलाही काही नागरिकांनी संरक्षण भिंत टाकून तलावाची जागा आपल्या ताब्यात घेतली आहे. गडचिरोली शहरातील जागेचे भाव बघितले तर सदर जागा कोट्यवधी रूपयांची आहे. आरमोरी मार्गावर असलेल्या तलावातही काही नागरिकांनी घरे बांधली आहेत. पावसात तलाव भरल्यानंतर तलावाचे पाणी अंगणात साचते. त्यावेळी दोष नगर परिषदेला दिला जातो. मात्र तलावामध्ये आपण अतिक्रमण करून अवैधरित्या घर बांधले, याची जाणीव या नागरिकांना होत नाही. केवळ नगर परिषदेच्या नावाने बोटे मोडण्याचे काम करीत आहेत. बसस्थानकाजवळ असलेल्या तलावातही अतिक्रमण वाढत चालले आहे. लांझेडा वार्डातील तलावात अलिकडेच नागरिकांनी अतिक्रमण करून घरे बांधली आहेत.सिंचन विभाग सुस्तशहरातील तलावांमध्ये अतिक्रमण करून जागा गिळंकृत केली जात असताना सिंचन विभाग मात्र केवळ बघ्याची भूमिका स्वीकारत आहे. काही नागरिक जागा पकडून ती लाखो रूपयांना विकत आहेत. जागा पकडून विकणे हा काही नागरिकांचा धंदाच बनला आहे. परिणामी अतिक्रमणाची समस्या वाढत चालली आहे. याकडे सिंचन विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.