शहरं
Join us  
Trending Stories
1
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
4
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?
5
केएल राहुलचा 'डबल' धमाका! विराट कोहली आणि रोहित शर्माचा कसोटीतील मोठा विक्रम मोडला
6
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
7
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
8
World Smile Day: ज्याला मिम मटेरिअल समजता, त्याने नुसतं हसून कमावले ३ मिलियन डॉलर!
9
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
10
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
11
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...
12
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
13
दसरा मेळाव्यानंतर नवा वाद! रामदास कदमांचा धक्कादायक दावा, संजय राऊतांचं संतप्त प्रत्युत्तर
14
माणसाचं तारुण्यच 'संकटात', नवीन विषाणुमुळे...; बाबा वेंगाची हादरवून टाकणारी भविष्यवाणी काय?
15
ITR चुकला? घाबरू नका, 'या' तारखेपर्यंत भरा बिलिटेड रिटर्न; पण, इतका दंड आणि व्याज भरावे लागणार
16
"भारतीय कंपन्या 'क्रोनीझम'ने नाही, तर..", राहुल गांधींचे कोलंबियातून भाजपवर टीकास्त्र
17
Video - अग्निकल्लोळ! लॉस एंजेलिसमध्ये रिफायनरीला भीषण आग, परिसरात धुराचं साम्राज्य
18
मारुतीचं साम्राज्य धोक्यात...? ह्यूंदाई-महिंद्राला पछाडत 'ही' कंपनी बनली देशातली No.2 ब्रँड! 'MS' पासून फक्त एक पाऊल दूर
19
हृदयद्रावक! कफ सिरप पिऊन झोपला अन् उठलाच नाही; मोफत औषधामुळे मुलाचा मृत्यू
20
Bigg Boss 19: आता खरी मजा येणार! भारतीय क्रिकेटरची बहीण 'बिग बॉस'च्या घरात येणार, कोण आहे ती?

रूग्णालय आजारी

By admin | Updated: July 27, 2014 00:07 IST

अतिदुर्गम, नक्षल प्रभावित सर्वसामान्य तसेच गोरगरीब नागरिकांसाठी आरोग्य सुविधा पुरविण्याच्या हेतूने अहेरी येथे उपजिल्हा रूग्णालय उभारण्यात आले. मात्र या रूग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांचे पद

अहेरी उपजिल्हा : रिक्त पदांमुळे आरोग्य सेवेवर परिणामअहेरी : अतिदुर्गम, नक्षल प्रभावित सर्वसामान्य तसेच गोरगरीब नागरिकांसाठी आरोग्य सुविधा पुरविण्याच्या हेतूने अहेरी येथे उपजिल्हा रूग्णालय उभारण्यात आले. मात्र या रूग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांचे पद गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त आहे. प्रयोगशाळा तंत्रज्ञाची या रूग्णालयात वानवा आहे. यामुळे वेळेवर आरोग्य तपासणी होत नसल्याचे वास्तव उजेडात आले आहे. यामुळे हे रूग्णालय स्वत:च आजारी असल्याचे दिसून येते.अहेरीच्या उपजिल्हा रूग्णालयात सिरोंचा, भामरागड, एटापल्ली या तालुक्यातील अतिदुर्गम भागातून अनेक रूग्ण उपचारासाठी येतात. मात्र या रूग्णालयात पुरेसे डॉक्टर नसल्यामुळे रूग्णांची गैरसोय होताना दिसते. या रूग्णालयात सध्या एक वैद्यकीय अधीक्षक, बालरोग तज्ज्ञ व दोन वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. सद्यस्थितीत या रूग्णालयात बधिरीकरण तज्ज्ञ, भाषक, पूर्णवेळ स्त्रीरोग तज्ज्ञ, नेत्र चिकित्सक, अस्थिरोग तज्ज्ञ, रेडिओलॉयजीस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, अधिसेविका व दोन अधिपरिचारिका आदी पदे रिक्त आहेत. यामुळे रूग्णांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. कार्यरत डॉक्टरांवर कामाचा अतिरिक्त भार पडत आहे. परिणामी त्यांनाही तारेवरची कसरत करून रूग्णांना आरोग्य सेवा द्यावी लागत आहे. या रूग्णालयात प्रयोगशाळा तंत्रज्ञ नसल्यामुळे मलेरिया, सिकलसेल, हिमोग्लोबीन व इतर रक्ताच्या चाचण्या वेळेवर होत नाही. रूग्णांचे रक्त घेऊन ते परिश्रमासाठी गडचिरोलीला पाठविले जाते. या तपासणीचे रिपोर्ट येण्यासाठी ८ ते १० दिवसाचा कालावधी लागतो. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहे. यामुळे डेंग्यू, मलेरिया व इतर साथीच्या आजाराचे प्रमाण वाढले असून या आजाराचे रूग्ण मोठ्या संख्या या रूग्णालयात दाखल होत आहेत. दाखल रूग्णांच्या रोगाचे निदान वेळेवर होत नसल्याने येथील रूग्णांची प्रकृती खालावत असल्याचेही दिसून येत आहे. या रूग्णालयातून ऐन वेळेवर रूग्णांना नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली येथे हलविले जात आहे. दूरवरून आलेल्या गरीब रूग्णांकडे पैसे नसल्यामुळे त्यांची अशावेळी चांगलीच पंचाईत होत आहे. पूर्णवेळ बधीरीकरण तज्ज्ञ नसल्यामुळे एखाद्या शस्त्रक्रियेसाठी बराच वेळ जात आहे. या रूग्णालयात पूर्णवेळ स्त्रीरोग तज्ज्ञ नसल्यामुळे प्रसूतीसाठी आलेल्या गरोदर महिला रूग्णांचे हेळसांड होत आहे. रिक्त पदे भरून आरोग्य व्यवस्था सुरळीत करण्याची मागणी होत आहे.