शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
5
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
6
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
7
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
8
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
9
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
10
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
11
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
12
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
13
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
14
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
15
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
16
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
17
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
18
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
19
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
20
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...

फळबाग आगीत खाक

By admin | Updated: December 29, 2016 23:11 IST

निगडी खुर्दमधील घटना : दहा लाखांचे नुकसान

जत : तालुक्यातील निगडी खुर्द येथील विजय लक्ष्मण जाधव व राजकुमार लक्ष्मण जाधव यांच्या शेतजमिनीतील फळबागेला विद्युतवाहिनीतून ठिणग्या पडून आग लागली. यामध्ये दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना २० डिसेंबररोजी दुपारी एकच्यादरम्यान घडली. याप्रकरणी जाधव बंधूूंनी गुरुवारी (दि. २९) जत पोलिसांत तक्रार दाखल केली.निगडी खुर्द गावापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतजमिनीत आंबा, चिकू व द्राक्षबाग असून, सभोवताली पेरू, अंजीर, नारळ आदी फळझाडे लावली आहेत. फळबाग आणि झाडांना ठिबक सिंचनाद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. या फळबागेवरून पवनऊर्जा कंपनीच्या उच्चदाब विद्युत वाहिनीच्या तारा गेल्या आहेत. २० डिसेंबर रोजी दुपारी एक वाजण्याच्यादरम्यान वीज वाहक तारांमधून ठिणग्या बागेत पडल्याने संपूर्ण आंब्याची, चिकूची बाग व सभोवताली असलेली पेरू, अंजीर, नारळाची झाडे आणि द्राक्षबागेतील दोनशे झाडे जळून भस्मसात झाली. आग लागल्यानंतर ठिबक सिंचनची पाईप वितळून गेली आहे. याप्रकरणी गावकामगार तलाठी निखिल पाटील, कोतवाल विनोद कोळी, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब लांडगे, उपविभागीय कृषी अधिकारी रवींद्र कांबळे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. सुमारे आठ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याचा प्रस्ताव त्यांनी शासनाला सादर केला आहे.शासनाने पंचनामा करून आठ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे, असे दाखविले आहे. मागील आठ-दहा वर्षांपासून फळबागेची जोपासना केली आहे. ठिबक सिंचनची संपूर्ण यंत्रणा भस्मसात झाली आहे. आता नव्याने फळबागेची उभारणी करावी लागणार आहे. त्यामुळे सुमारे पंचवीस लाख रुपये नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी जाधव बंधूूंनी केली आहे. दरम्यान, शेतकरी संघटनांनीही महावितरण कंपनीने शेतकऱ्यांना त्वरित मदत देण्याची मागणी केली आहे. (वार्ताहर)