शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
2
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
3
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
4
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
5
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
6
Vijay Hazare Trophy: थोरल्या भावाने दिली धाकट्याला पदार्पणाची कॅप; दोघांच्यातील शतकी भागीदारीनंतर जे घडलं ते कमालच!
7
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
8
मनसेचं ‘नऊ’निर्माण होईल? १६-०१-२०२६ ची ‘बेरीज’ राज ठाकरेंसाठी ठरेल का ‘मंगल’? काय सांगते अंक-ज्योतिषशास्त्राची युती?
9
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
10
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
11
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा, तो प्रत्येक 'बिग बजेट'...", राम गोपाल वर्मा यांची पोस्ट चर्चेत; नेमकं काय म्हणाले?
12
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
13
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
14
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
15
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
16
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
17
Malegaon Municipal Corporation Election : दोन्ही ठाकरे बंधूंची झाली युती; मालेगाव पालिकेत प्रभाव किती? मनोमिलनानंतर शांतता
18
"ते माझं भवितव्य बरबाद करतील...", 'इंडियन आयडल' जिंकल्यानंतर अभिजीत सावंतने केलेला मोठा गौप्यस्फोट
19
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
20
अरे हे काय! मुंबईच्या संघात दोन-दोन रोहित; व्हायरल फोटो पाहून चाहते थक्क, हिटमॅनचा 'ड्युप्लिकेट' कोण?
Daily Top 2Weekly Top 5

पीक पंचनाम्यांबाबत शासनाचे वरातीमागून घोडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 00:50 IST

यावर्षी जिल्ह्यात धान पिकावर आलेल्या मावा, तुडतुड्यांच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात पीक हातचे जाऊन शेतकºयांचे नुकसान झाले. मात्र आता संपूर्ण शेतातील पीक कापणी झाल्यानंतर शासनाने पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

ठळक मुद्देकापणीनंतर आला आदेश : महसूल विभागापुढे पेच

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : यावर्षी जिल्ह्यात धान पिकावर आलेल्या मावा, तुडतुड्यांच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात पीक हातचे जाऊन शेतकºयांचे नुकसान झाले. मात्र आता संपूर्ण शेतातील पीक कापणी झाल्यानंतर शासनाने पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. वरातीमागून घोडे चालविण्याच्या या प्रकाराने संबंधित यंत्रणाही चक्रावून गेली आहे. या सर्व्हेक्षणाचा शेतकºयांना लाभ होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.यावर्षी खरीप हंगामात धानासोबत कापसावरही मोठ्या प्रमाणात बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे शेतकºयांना अपेक्षेपेक्षा बरेच कमी उत्पन्न होत आहे. याबाबत स्थानिक आमदारांसह खासदारांनीही पीकांचे पंचनामे, सर्व्हेक्षण करण्याची विनंती शासनाकडे केली होती. पण प्रत्यक्षात वरिष्ठांकडून निर्देश आल्याशिवाय जिल्हास्तरावर प्रशासनाने हालचाल केली नाही. दि.५ डिसेंबरच्या मंत्रिमंडळ बैठकीत पीक बाधित शेतकºयांना मदत देण्यासाठी नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचा निर्णय घेण्यात आला. विभागीय आयुक्तांनी याबाबतची माहिती जिल्हाधिकाºयांना पाठविल्यानंतर जिल्हाधिकाºयांनी ८ डिसेंबरला सर्व तहसीलदारांना तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश दिले. या पंचनाम्यांमध्ये ३३ टक्के पेक्षा अधिक नुकसान असणाºया शेतकºयांना मदतीस पात्र ठरविले जाणार आहे. मात्र आता शेतात पिकच नाही तर पंचनामे काय करणार? असा प्रश्न समोर उभा ठाकला आहे.