शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

जि.प.समोर आशांचे धरणे तर आरमोरीत कामगारांचा चक्काजाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:25 IST

महाराष्ट्र राज्य आशा व गट प्रवर्तक कृती समितीच्या वतीने आयटकच्या नेतृत्वात शेकडो आशा वर्कर व गट प्रवर्तकांनी जिल्हा परिषदेसमोर ...

महाराष्ट्र राज्य आशा व गट प्रवर्तक कृती समितीच्या वतीने आयटकच्या नेतृत्वात शेकडो आशा वर्कर व गट प्रवर्तकांनी जिल्हा परिषदेसमोर जमा होऊन नारेबाजी केली. कोरोना काळातील सेवेसाठी प्रतिदिन ५०० रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यासह इतर काही मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

आयटकचे राज्य सचिव विनोद झोडगे, भाकप नेते डॉ.महेश कोपुलवार, आयटकचे जिल्हा सचिव ॲड.जगदीश मेश्राम, आशा वर्कर व गट प्रवर्तक संघटनेच्या जिल्हा सचिव रजनी गेडाम यांच्या नेतृत्वात हे धरणे आंदोलन करण्यात आले.

१५ जूनपासून कोरोना कामासहित सर्वच कामावर बहिष्कार टाकण्याचा इशारा राज्यभरातील आशा व गट प्रवर्तक कर्मचाऱ्यांनी दिला होता. त्याची दखल घेऊन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुंबई येथे आशा व गट प्रवर्तक कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक ११ जून रोजी आयोजित केली होती. त्यात विविध मुद्यांवर चर्चा झाली. आशा व गट प्रवर्तक यांच्याकडून मार्च २०२० पासून कोरोनाचे काम करून घेतले जात आहे. त्यामुळे इतर कामे करण्यात वेळ मिळत नाही. केंद्र सरकार आशांना फक्त दरमहा एक हजार रुपये देत आहे. इतर कर्मचाऱ्यांना ५ हजार रुपये प्रोत्साहन भत्ता देत आहे. कोरोना कामाचा प्रोत्साहन भत्ता म्हणून आशा व गट प्रवर्तक यांना प्रतिदिन ५०० रुपये द्या, अशी मागणी करण्यात आली. त्यावर आरोग्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी बोलून लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावेळी इतरही अनेक मागण्यांवर चर्चा झाली. पण प्रोत्साहन भत्त्याच्या मुद्यावर निर्णय झाला नसल्यामुळे हे आंदोलन करण्यात आले.