शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
4
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
5
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
6
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
7
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
8
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
9
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
10
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
11
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
12
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
13
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
14
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
15
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
16
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
17
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
18
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
19
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
20
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!

घर टॅक्स लावण्याचे काम ठप्प

By admin | Updated: June 3, 2017 01:16 IST

पुढील पाच वर्षाचे असेसमेंटचे (मालमत्ता कराचे पुनर्मूल्यांकन) काम झाले नसल्याने मागील पाच महिन्यांपासून

वीज जोडणी घेण्यास अडचण : गडचिरोली नगर परिषदेकडून मूल्यांकनाला सुरूवातच नाही लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : पुढील पाच वर्षाचे असेसमेंटचे (मालमत्ता कराचे पुनर्मूल्यांकन) काम झाले नसल्याने मागील पाच महिन्यांपासून घर टॅक्स लावण्याचे काम पूर्णत: ठप्प पडले आहे. त्यामुळे नवीन घर बांधणाऱ्यांना वीज पुरवठा घेण्यासाठी तसेच इतर शासकीय कामांसाठी फार मोठी अडचण निर्माण होत आहे. गडचिरोली शहरात जवळपास २० हजार घरे आहेत. या घरांवर नगर परिषद मालमत्ता कर आकारते. दरवर्षी नवीन बांधकाम होत असल्याने करामध्ये सुधारणा करणे आवश्यक राहते. दर पाच वर्षाने मालमत्ता कराचे पुनर्मूल्यांकन केले जाते. त्यानुसार २०१७-१८ या वर्षात कराचे पुनर्मूल्यांकन करावे लागणार आहे. या मुल्यांकनादरम्यान ठरविलेले कराचे दर पुढील पाच वर्ष चालणार आहेत. नगर परिषदेकडे कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. त्यामुळे सदर काम स्वयंसेवी संस्थेच्या मार्फत करण्याचा निर्णय नगर परिषदेने घेतला आहे. यासाठी जवळपास ३० ते ४० लाख रूपयांचा खर्च येणार आहे. २०१७-१८ च्या कराचे पुनर्मूल्यांकन करायचे असल्याने त्याची पूर्व तयारी नगर परिषदेने अगोदर करणे आवश्यक होते. मात्र मे महिना उलटला तरी असेसमेंट तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्राथमिक प्रक्रिया सुध्दा नगर परिषदेने पार पाडली नाही. सर्व प्रथम निविदा काढून स्वयंसेवी संस्थेची निवड करावी लागणार आहे. त्यासाठी लागणाऱ्या खर्चाची तरतूद नगर परिषदेला करावी लागणार आहे. खर्चाची तरतूद केली आहे. मात्र अजूनपर्यंत निविदा काढून संस्थेची निवड केली नाही. नवीन घरांना घर टॅक्स पावती देण्याचे काम एप्रिल ते डिसेंबर या कालावधीपर्यंत केले जाते. याचाच अर्थ २०१७ मधील जानेवारी ते मे महिन्यापर्यंत बांधलेल्या घरांना घर टॅक्स देण्यात आला नाही. घर टॅक्स लावण्याच्या माध्यमातून नगर परिषदेला उत्पन्न प्राप्त होते. मात्र या उत्पन्नापासूनही नगर परिषदेला वंचित राहावे लागत आहे. नवीन घराला वीज जोडणी देण्यासाठी महावितरण घराचा पुरवा म्हणून घर टॅक्स पावती मागते. मात्र घर टॅक्स पावती नसल्याने वीज जोडणी सुध्दा थांबली आहे. यामुळे नवीन घर बांधणारे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. त्याचबरोबर विविध दाखल्यांसाठी घर टॅक्स पावती आवश्यक राहते. नगर परिषद तसेच आपल्या वार्डाच्या नगरसेवकांना याबाबत वेळोवेळी विचारणा करीत आहे. मात्र असेसमेंट करण्याविषयी नगर परिषदेने अजूनपर्यंत तयारी सुद्धा केली नसल्याचे दिसून येत आहे. नगर परिषदेच्या या लेटलतीफ कारभाराचा फटका गडचिरोली शहरातील नागरिकांना बसत आहे.