शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
3
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
4
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
5
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
6
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
7
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
8
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
9
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
10
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
11
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
12
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
13
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
14
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
15
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
16
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
17
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
18
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
19
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
20
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत

घर टॅक्स लावण्याचे काम ठप्प

By admin | Updated: June 3, 2017 01:16 IST

पुढील पाच वर्षाचे असेसमेंटचे (मालमत्ता कराचे पुनर्मूल्यांकन) काम झाले नसल्याने मागील पाच महिन्यांपासून

वीज जोडणी घेण्यास अडचण : गडचिरोली नगर परिषदेकडून मूल्यांकनाला सुरूवातच नाही लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : पुढील पाच वर्षाचे असेसमेंटचे (मालमत्ता कराचे पुनर्मूल्यांकन) काम झाले नसल्याने मागील पाच महिन्यांपासून घर टॅक्स लावण्याचे काम पूर्णत: ठप्प पडले आहे. त्यामुळे नवीन घर बांधणाऱ्यांना वीज पुरवठा घेण्यासाठी तसेच इतर शासकीय कामांसाठी फार मोठी अडचण निर्माण होत आहे. गडचिरोली शहरात जवळपास २० हजार घरे आहेत. या घरांवर नगर परिषद मालमत्ता कर आकारते. दरवर्षी नवीन बांधकाम होत असल्याने करामध्ये सुधारणा करणे आवश्यक राहते. दर पाच वर्षाने मालमत्ता कराचे पुनर्मूल्यांकन केले जाते. त्यानुसार २०१७-१८ या वर्षात कराचे पुनर्मूल्यांकन करावे लागणार आहे. या मुल्यांकनादरम्यान ठरविलेले कराचे दर पुढील पाच वर्ष चालणार आहेत. नगर परिषदेकडे कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. त्यामुळे सदर काम स्वयंसेवी संस्थेच्या मार्फत करण्याचा निर्णय नगर परिषदेने घेतला आहे. यासाठी जवळपास ३० ते ४० लाख रूपयांचा खर्च येणार आहे. २०१७-१८ च्या कराचे पुनर्मूल्यांकन करायचे असल्याने त्याची पूर्व तयारी नगर परिषदेने अगोदर करणे आवश्यक होते. मात्र मे महिना उलटला तरी असेसमेंट तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्राथमिक प्रक्रिया सुध्दा नगर परिषदेने पार पाडली नाही. सर्व प्रथम निविदा काढून स्वयंसेवी संस्थेची निवड करावी लागणार आहे. त्यासाठी लागणाऱ्या खर्चाची तरतूद नगर परिषदेला करावी लागणार आहे. खर्चाची तरतूद केली आहे. मात्र अजूनपर्यंत निविदा काढून संस्थेची निवड केली नाही. नवीन घरांना घर टॅक्स पावती देण्याचे काम एप्रिल ते डिसेंबर या कालावधीपर्यंत केले जाते. याचाच अर्थ २०१७ मधील जानेवारी ते मे महिन्यापर्यंत बांधलेल्या घरांना घर टॅक्स देण्यात आला नाही. घर टॅक्स लावण्याच्या माध्यमातून नगर परिषदेला उत्पन्न प्राप्त होते. मात्र या उत्पन्नापासूनही नगर परिषदेला वंचित राहावे लागत आहे. नवीन घराला वीज जोडणी देण्यासाठी महावितरण घराचा पुरवा म्हणून घर टॅक्स पावती मागते. मात्र घर टॅक्स पावती नसल्याने वीज जोडणी सुध्दा थांबली आहे. यामुळे नवीन घर बांधणारे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. त्याचबरोबर विविध दाखल्यांसाठी घर टॅक्स पावती आवश्यक राहते. नगर परिषद तसेच आपल्या वार्डाच्या नगरसेवकांना याबाबत वेळोवेळी विचारणा करीत आहे. मात्र असेसमेंट करण्याविषयी नगर परिषदेने अजूनपर्यंत तयारी सुद्धा केली नसल्याचे दिसून येत आहे. नगर परिषदेच्या या लेटलतीफ कारभाराचा फटका गडचिरोली शहरातील नागरिकांना बसत आहे.