शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
3
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
4
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
5
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
6
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
7
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
8
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
9
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
10
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
11
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
12
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
13
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
14
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
15
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
16
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
17
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
18
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
19
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
20
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे

कडधान्य पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 23:57 IST

गडचिरोली जिल्ह्यात प्रामुख्याने धानपिकाची शेती केली जाते. सन २०१९-२० या वर्षातील खरीप हंगामात सर्व पिकांचे मिळून लागवडीचे क्षेत्र दोन लाख हेक्टर इतके होते. यापैकी धानपिकाचे क्षेत्र सव्वालाखांवर होते. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बँका व सहकारी सोसायट्यांकडून कर्ज काढून धानपिकाची रोवणी केली. तसेच कडधान्य पिकाची पेरणी केली. गडचिरोली जिल्ह्यात कापूस व सोयाबीन या पिकात काही शेतकरी तुरीचे आंतरपीक घेतात.

ठळक मुद्देयंदा प्रचंड घट येणार : तूर, तीळ, पोपटसह व इतर पिकांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : यंदाच्या पावसाळ्यात गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वदूर भागात गेल्या २० ते २५ दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असून या पावसाने अद्यापही उसंत घेतली नाही. पाऊस थांबण्याचे चिन्ह दिसत नसून तसेच सततच्या पावसामुळे सखल भागात पाणी साचून तुरीची झाडे कुजत आहेत. त्यामुळे तूर पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीचा फटका, तूर, तीळ, पोपट, वाल, कापूस, सोयाबीन या सर्व पिकांना बसला आहे.गडचिरोली जिल्ह्यात प्रामुख्याने धानपिकाची शेती केली जाते. सन २०१९-२० या वर्षातील खरीप हंगामात सर्व पिकांचे मिळून लागवडीचे क्षेत्र दोन लाख हेक्टर इतके होते. यापैकी धानपिकाचे क्षेत्र सव्वालाखांवर होते. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बँका व सहकारी सोसायट्यांकडून कर्ज काढून धानपिकाची रोवणी केली. तसेच कडधान्य पिकाची पेरणी केली. गडचिरोली जिल्ह्यात कापूस व सोयाबीन या पिकात काही शेतकरी तुरीचे आंतरपीक घेतात. अलिकडे आंतरपिकासह अनेक शेतकरी संपूर्ण शेतात तुरीचे पीक घ्यायला लागले आहे. काही शेतकरी संर्पूण वावरी शेतजमिनीत सोयाबीनची पेरणी करतात. यावर्षी गडचिरोली जिल्ह्यात तूर व सोयाबीन पिकाचा पेरा वाढला. मात्र संततधार पावसामुळे हे पीक धोक्यात आले आहे.पावसाळ्याच्या सुरूवातीला पावसाने उसंत घेतल्याने शेतकऱ्यांची काळजी वाढली होती. त्यानंतर आता संततधा पावसामुळे कडधान्य पिकाची नासाडी होत आहे. अतिवृष्टीमुळे नदी, नाल्यांना पूर येऊन काठालगतच्या शेतजमिनीतील सोयाबीन, तुरी व इतर कडधान्याचे पीक नष्ट झाले. २५ जुलैपासून गडचिरोली जिल्ह्यात पावसाने कहर केला आहे. सतत पाऊस येत असल्याने शेताच्या सखल भागातील तुरी पूर्णत: नष्ट झाल्या आहेत. तर काही शेतातील पीक मुसळधार पावसामुळे वाकले असून त्यांचीही स्थिती बिकट आहे.दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात तुरीचे पीक शेवग्यावर येते. मात्र यावर्षी अतिवृष्टीमुळे पिकांची वाढ खुंटली असून शेतकरी चिंतेत आहे. ज्या शेतकºयांनी तुरीचा पीक विमा काढला, त्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेतून मदत मिळणे अपेक्षित आहे. मात्र उत्पन्नात घट येणार हे निश्चित आहे. सोयाबीन, कापूस पिकाचीही स्थिती अतिपावसामुळे चिंताजनक आहे.शेतकºयांचे बजेट कोलमडणारधानपिकासोबत विविध प्रकारच्या कडधान्याचे उत्पादन घेऊन शेतकरी ही प्रगती करण्याचा प्रयत्न करीत असतो. दोन्ही प्रकारचे पीके घेतले तर त्याला चांगला आर्थिक उत्पन्न मिळते. मात्र यंदा अतिवृष्टी धान या मुख्य पिकासह तूर, तीळ, पोपट, वाल या कडधान्य पिकासह सोयाबीन व कापूस पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्हाभरातील शेतकºयांचे आर्थिक बजेट यावर्षी कोलमडणार आहे. आर्थिक समस्येला सामोरे जावे लागणार आहे.

टॅग्स :agricultureशेती