शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
3
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
4
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
5
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
6
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
7
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
8
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
9
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
10
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
11
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
12
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
13
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
14
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
15
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
16
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
17
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
18
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
19
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

कडधान्य पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 23:57 IST

गडचिरोली जिल्ह्यात प्रामुख्याने धानपिकाची शेती केली जाते. सन २०१९-२० या वर्षातील खरीप हंगामात सर्व पिकांचे मिळून लागवडीचे क्षेत्र दोन लाख हेक्टर इतके होते. यापैकी धानपिकाचे क्षेत्र सव्वालाखांवर होते. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बँका व सहकारी सोसायट्यांकडून कर्ज काढून धानपिकाची रोवणी केली. तसेच कडधान्य पिकाची पेरणी केली. गडचिरोली जिल्ह्यात कापूस व सोयाबीन या पिकात काही शेतकरी तुरीचे आंतरपीक घेतात.

ठळक मुद्देयंदा प्रचंड घट येणार : तूर, तीळ, पोपटसह व इतर पिकांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : यंदाच्या पावसाळ्यात गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वदूर भागात गेल्या २० ते २५ दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असून या पावसाने अद्यापही उसंत घेतली नाही. पाऊस थांबण्याचे चिन्ह दिसत नसून तसेच सततच्या पावसामुळे सखल भागात पाणी साचून तुरीची झाडे कुजत आहेत. त्यामुळे तूर पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीचा फटका, तूर, तीळ, पोपट, वाल, कापूस, सोयाबीन या सर्व पिकांना बसला आहे.गडचिरोली जिल्ह्यात प्रामुख्याने धानपिकाची शेती केली जाते. सन २०१९-२० या वर्षातील खरीप हंगामात सर्व पिकांचे मिळून लागवडीचे क्षेत्र दोन लाख हेक्टर इतके होते. यापैकी धानपिकाचे क्षेत्र सव्वालाखांवर होते. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बँका व सहकारी सोसायट्यांकडून कर्ज काढून धानपिकाची रोवणी केली. तसेच कडधान्य पिकाची पेरणी केली. गडचिरोली जिल्ह्यात कापूस व सोयाबीन या पिकात काही शेतकरी तुरीचे आंतरपीक घेतात. अलिकडे आंतरपिकासह अनेक शेतकरी संपूर्ण शेतात तुरीचे पीक घ्यायला लागले आहे. काही शेतकरी संर्पूण वावरी शेतजमिनीत सोयाबीनची पेरणी करतात. यावर्षी गडचिरोली जिल्ह्यात तूर व सोयाबीन पिकाचा पेरा वाढला. मात्र संततधार पावसामुळे हे पीक धोक्यात आले आहे.पावसाळ्याच्या सुरूवातीला पावसाने उसंत घेतल्याने शेतकऱ्यांची काळजी वाढली होती. त्यानंतर आता संततधा पावसामुळे कडधान्य पिकाची नासाडी होत आहे. अतिवृष्टीमुळे नदी, नाल्यांना पूर येऊन काठालगतच्या शेतजमिनीतील सोयाबीन, तुरी व इतर कडधान्याचे पीक नष्ट झाले. २५ जुलैपासून गडचिरोली जिल्ह्यात पावसाने कहर केला आहे. सतत पाऊस येत असल्याने शेताच्या सखल भागातील तुरी पूर्णत: नष्ट झाल्या आहेत. तर काही शेतातील पीक मुसळधार पावसामुळे वाकले असून त्यांचीही स्थिती बिकट आहे.दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात तुरीचे पीक शेवग्यावर येते. मात्र यावर्षी अतिवृष्टीमुळे पिकांची वाढ खुंटली असून शेतकरी चिंतेत आहे. ज्या शेतकºयांनी तुरीचा पीक विमा काढला, त्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेतून मदत मिळणे अपेक्षित आहे. मात्र उत्पन्नात घट येणार हे निश्चित आहे. सोयाबीन, कापूस पिकाचीही स्थिती अतिपावसामुळे चिंताजनक आहे.शेतकºयांचे बजेट कोलमडणारधानपिकासोबत विविध प्रकारच्या कडधान्याचे उत्पादन घेऊन शेतकरी ही प्रगती करण्याचा प्रयत्न करीत असतो. दोन्ही प्रकारचे पीके घेतले तर त्याला चांगला आर्थिक उत्पन्न मिळते. मात्र यंदा अतिवृष्टी धान या मुख्य पिकासह तूर, तीळ, पोपट, वाल या कडधान्य पिकासह सोयाबीन व कापूस पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्हाभरातील शेतकºयांचे आर्थिक बजेट यावर्षी कोलमडणार आहे. आर्थिक समस्येला सामोरे जावे लागणार आहे.

टॅग्स :agricultureशेती