शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

महामार्गाने जोडणार बिनागुंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 23:05 IST

केंद्र शासनाने गडचिरोली जिल्ह्यात आणखी तीन राष्ट्रीय महामार्ग मंजूर केले असून त्यापैैकी १३० डी क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग अहेरी-आलापल्ली-भामरागड-बिनागुंडा व पुढे छत्तीसगड राज्यातील नारायणपुरला जोडणार आहे.

ठळक मुद्देनव्या तीन राष्ट्रीय महामार्गांना मंजुरी : अहेरी-बिनागुंडा, दिंडोरी-कोरची, बल्लारपूर-आष्टी मार्गांची भर

दिगांबर जवादे।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : केंद्र शासनाने गडचिरोली जिल्ह्यात आणखी तीन राष्ट्रीय महामार्ग मंजूर केले असून त्यापैैकी १३० डी क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग अहेरी-आलापल्ली-भामरागड-बिनागुंडा व पुढे छत्तीसगड राज्यातील नारायणपुरला जोडणार आहे. या मार्गामुळे भामरागड तालुक्यातील रस्त्यांची समस्या मार्गी लागण्यास फार मोठी मदत होणार आहे.देशाच्या विकासात रस्ते अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असले तरी गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख समस्यांमध्ये रस्ते ही एक समस्या आहे. संपूर्ण जिल्ह्यात एकही राष्टÑीय महामार्ग नव्हता. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निधीची नेहमीच कमतरता राहत असल्याने येथील राज्य महामार्गांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले राहत होते. रस्त्यांची समस्या मार्गी लावण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाने चंद्रपूर-मूल-गडचिरोली-सावरगाव व साकोली-गडचिरोली-सिरोंचा हे दोन मार्ग राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित केले. या मार्गांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम ३० डिसेंबर २०१६ रोजी पार पडला. दोन्ही मार्ग शेकडो किमी अंतराचे आहेत. या दोन मार्गामुळे जिल्ह्याचा अध्यापेक्षा अधिक भाग व्यापला जात आहे.या दोन मार्गाच्या भूमिपूजनानंतर केंद्र शासनाने गडचिरोली जिल्ह्यातून जाणारे आणखी तीन नवीन महामार्ग मंजूर केले आहेत. त्यामध्ये १३० डी क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग अहेरी-आलापल्ली-भामरागड-बिनागुंडा व पुढे छत्तीसगड राज्यातील नारायणपुरला जोडणार आहे. दुसरा राष्ट्रीय महामार्ग ५४३ क्रमांकाचा आहे. तो मध्यप्रदेश राज्यातील दिंडोरी-शहाडो-बालाघाट-गोंदिया-आमगाव- देवरी मार्गे कोरची व कुरखेडाला जोडणार आहे. तिसरा महामार्ग चंद्रपूर जिल्ह्यातील बल्हारपूर-बामणी-गोंडपिंपरी मार्गे आष्टीला जोडणार आहे. त्याचा क्रमांक ३५३ बी आहे. या तीन नवीन मार्गामुळे गडचिरोली जिल्ह्याचा बहुतांश भाग व्यापला जाणार आहे. विशेष म्हणजे, भामरागड तालुक्यात नक्षलवादाची समस्या गंभीर आहे. त्यामुळे या तालुक्यात मार्ग निर्मितीचे काम करताना शासनाला फार मोठी अडचण निर्माण होत होती. राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ व यंत्रणा असल्याने पोलीस संरक्षणात सदर मार्ग निर्मिती केली जाणार असल्याची शक्यता आहे.गडचिरोली-आष्टी मार्गाचे काम लवकरचराष्ट्रीय महामार्गांची लांबी शेकडो किमी असल्याने महार्गाचे बांधकाम करण्याच्या दृष्टीने महामार्ग विभागाने टप्पे पाडले आहेत. गडचिरोली-आष्टी हा एक टप्पा आहे. त्यासाठी केंद्र शासनाने ३१४ कोटी रूपये मंजूर केले आहेत. या कामाची निविदा काढण्यात आली आहे. लवकरच कामाला सुरूवात होणार आहे. सावरगाव- चंद्रपूर या राष्ट्रीय महामार्गातील गडचिरोली-मूल हा एक टप्पा आहे. या टप्प्यातील मार्गाचे काम सुरू आहे. या टप्प्यातील एकूण ४२ किमी पैैकी ६ किमीवर डांबर तर उर्वरित ३६ किमी सिमेंट काँक्रिटीकरण राहणार आहे. सदर मार्ग टू- लेन राहणार आहे. सावली तालुक्यातील हिरापुरजवळ टोल प्लाझा बसविला जाणार आहे.संपूर्ण मार्गांच्या निर्मितीसाठी जवळपास १ हजार कोटी रूपये खर्च येणार आहे. निधी उपलब्ध होण्यावर कामाची प्रगती राहणार आहे.शहरात २४ मीटरचा रोडमूल मार्गावरील नवेगाव येथील बोरकर पेट्रोलपंप ते धानोरा मार्गावरील स्कूल आॅफ स्कॉलर शाळेपर्यंत फोरलेन मार्ग राहणार आहे. शहरातून २४ मीटरचा मार्ग राहणार आहे. संपूर्ण मार्ग सिमेंंट काँक्रिटचा राहिल. शहराच्या बाजूने १२ किमीचा बायपास तयार करण्यासाठीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविला आहे. मात्र केंद्र शासनाने अजुपर्यंत मंजूरी दिली नाही.