शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

सर्वाधिक पाऊस भामरागडात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 23:07 IST

यंदाच्या खरीप हंगामात गडचिरोली जिल्ह्यात सुरूवातीचे तीन नक्षत्र कोरडे गेले. मात्र त्यानंतर पावसाने जोर पकडला. गेल्या १० दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस बरसत आहे. कधी मुसळधार तर कधी रिमझिम पावसाने जनजीवन प्रभावित झाले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात १ जूनपासून आतापर्यंत सर्वाधिक पर्जन्यमान भामरागड तालुक्यात झाले आहे. आजपर्यंत भामरागड तालुक्यात १३०६.४ मिमी पाऊस झाल्याची नोंद जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने घेतली आहे.

ठळक मुद्देतालुक्यात १३०६.४ मिमी : सर्वात कमी पर्जन्यमान सिरोंचा तालुक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : यंदाच्या खरीप हंगामात गडचिरोली जिल्ह्यात सुरूवातीचे तीन नक्षत्र कोरडे गेले. मात्र त्यानंतर पावसाने जोर पकडला. गेल्या १० दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस बरसत आहे. कधी मुसळधार तर कधी रिमझिम पावसाने जनजीवन प्रभावित झाले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात १ जूनपासून आतापर्यंत सर्वाधिक पर्जन्यमान भामरागड तालुक्यात झाले आहे. आजपर्यंत भामरागड तालुक्यात १३०६.४ मिमी पाऊस झाल्याची नोंद जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने घेतली आहे.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, वार्षिक सरासरीच्या तुलनेत ५ आॅगस्टपर्यंत भामरागड तालुक्यात १०० टक्के पाऊस बरसरला. जिल्ह्यात संततधार पावसामुळे नदी, नाले, तलाव, बोड्यांमध्ये जलसाठा वाढला आहे. मुसळधार पावसामुळे भामरागड तालुक्याचा गडचिरोली जिल्हा मुख्यालयाशी आतापर्यंत तीन वेळा संपर्क तुटला आहे.१ जूनपासून आतापर्यंत अहेरी तालुक्यात सरासरी ९०१ मिमी पाऊस बरसला असून पर्जन्यमानात अहेरी तालुका दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर पर्जन्यमानाच्या आकडेवारी मुलचेरा व एटापल्ली तालुक्याचा क्रमांक लागतो. मुलचेरा तालुक्यात ८९० मिमी व एटापल्ली तालुक्यात ८५३ मिमी पाऊस झाल्याची नोंद प्रशासनाने घेतली आहे. सिरोंचा तालुक्यात सर्वाधिक ६०६ मिमी पाऊस झाला आहे.संततधार पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यात अनेक घरांची अंशत: व काही घरांची पूर्णत: पडझड झाली आहे. प्रशासनाच्या वतीने पडझड झालेल्या घर व जनावरांच्या गोठ्यांचे पंचनामे केले जात आहे. मात्र प्रत्यक्षात प्रशासनाकडून नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत मिळाली नाही. वैरागडजवळून वाहणाºया वैलोचना नदीलाही दोनदा पूर आला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद होती. पावसाचा जोर अद्यापही कायम असल्याने धानपीक रोवणीचे काम काही भागात थांबले आहे. कारण बºयाच ठिकाणच्या शेतजमिनी पूर्णत: पाण्याखाली आल्या आहेत. एकूणच पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.१ जूनपासून आजपर्यंत जिल्ह्यात झालेला पाऊसतालुका पाऊस (मिमी)भामरागड १३०६.४अहेरी ९०१.०मुलचेरा ८९०.२एटापल्ली ८५३.०धानोरा ८१०.९कुरखेडा ७९७.०आरमोरी ७९३.६कोरची ७२८.०गडचिरोली ७२६.१देसाईगंज ७२२.४चामोर्शी ६८८.९सिरोंचा ६०६.०सरासरी ८१८.६