शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
3
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
4
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
5
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
6
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
7
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
9
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
10
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
11
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
12
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
13
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
14
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
15
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
16
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
17
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
18
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
19
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
20
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...

अंगणवाड्या होणार हायटेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 22:41 IST

अंगणवाडीची माहिती आॅनलाईन सादर करण्यासाठी शासनाकडून प्रत्येक अंगणवाडीला स्मार्ट फोन उपलब्ध करून दिला जाणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकूण २३७८ अंगणवाड्या आहेत. या सर्व अंगणवाड्यांना लवकरच स्मार्ट फोन दिला जाणार आहे.

ठळक मुद्देप्रत्येक नोंद होणार आॅनलाईन : २३७८ अंगणवाड्यांना मिळणार स्मार्ट फोन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : अंगणवाडीची माहिती आॅनलाईन सादर करण्यासाठी शासनाकडून प्रत्येक अंगणवाडीला स्मार्ट फोन उपलब्ध करून दिला जाणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकूण २३७८ अंगणवाड्या आहेत. या सर्व अंगणवाड्यांना लवकरच स्मार्ट फोन दिला जाणार आहे.प्रशासनाच्या कारभाराला गती देण्यासाठी शासन आॅनलाईन माहितीवर विशेष भर दिले जात आहे. मुलांना पूर्व प्राथमिक शिक्षण देण्यापासून त्यांचे आरोग्य व पोषण आहार उपलब्ध करून देण्याची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी अंगणवाडीकडून पार पाडली जाते. विविध विभागामार्फत अंगणवाडी सेविकेला माहिती मागितली जाते. या सर्व माहितीची रजिस्टरवर नोंद केली जाते. अंगणवाडी कर्मचाऱ्याच्या बराचसा वेळ माहिती भरण्यामध्येच जात होता. अंगणवाडी कर्मचारी सततच्या माहितीमुळे त्रस्त झाले होते. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा वेळ वाचून त्यांना बालकांच्या शिक्षण व आरोग्याकडे लक्ष देता यावे, यासाठी शासनाने प्रत्येक अंगणवाडीला स्मार्ट फोन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.गडचिरोली जिल्ह्यात १ हजार ७७१ अंगणवाड्या, ५१८ मिनी अंगणवाड्या, ८९ नागरी भागातील अंगणवाड्या अशा एकूण २ हजार ३७८ अंगणवाड्या आहेत. या सर्व अंगणवाड्यांना स्मार्ट फोन उपलब्ध करून दिला जाणार आहे. माहिती भरण्यासाठी एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयाने स्वतंत्र अ‍ॅप तयार केला आहे.लसीकरण, गृहभेट याबाबतचा दरदिवशीचा रिपोर्ट व इतर माहिती भरता येणार आहे. वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांना एका क्लिकवर माहिती उपलब्ध होणार आहे. मोबाईलचा खर्च म्हणून प्रत्येकी तीन महिन्याला ४०० रूपये दिले जाणार आहेत.सततची माहिती भरण्यामुळे अंगणवाडी कर्मचारी आजपर्यंत त्रस्त होत्या. अ‍ॅप उपलब्ध झाल्याने माहिती भरण्याच्या त्रासापासून त्यांची मुक्तता होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. स्मार्ट फोन उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने एक महिन्यापूर्वी घेतला आहे. प्रत्येक जिल्हास्तरावरून किती मागणी आहे. याची माहिती मागविण्यात आली होती. मात्र अजुनपर्यंत स्मार्ट फोन उपलब्ध झाले नाही.इंटरनेटच्या गंभीर समस्येचे काय?गडचिरोली जिल्ह्यातील जवळपास ३० टक्के भागातच इंटरनेटची सुविधा उपलब्ध आहे. त्यातही बहुतांश ठिकाणी टू-जी सेवा असल्याने इंटरनेट व्यवस्थित काम करीत नाही. स्मार्टफोनसाठी इंटरनेटची स्पीड अधिक असणे आवश्यक आहे. शिक्षण, रोहयो व इतर विभागांनी आॅनलाईन माहिती सादर करण्यासाठी स्वतंत्र अ‍ॅप तयार केले. मात्र दुर्गम भागात इंटरनेट काम करीत नसल्याने ते कर्मचारी कमालीचे त्रस्त आहेत. हाच कटूअनुभव अंगणवाडी कर्मचाºयांनाही येण्याची शक्यता नाकारता येत नाही.