शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

वीर समाज जगतोय यातनामय जीवन

By admin | Updated: November 16, 2014 22:51 IST

रोजगारासाठी तीन पिढ्यांपूर्वीच आंध्रप्रदेशातून विदर्भात स्थलांतरीत झालेल्या वीर समाजाला शासनाने जात प्रमाणपत्र देण्याचे नाकारले आहे. त्याचबरोबर या समाजातील बहुतांश नागरिक भीक मागून

मिलींद मेडपीलवार - तळोधी (मो.)रोजगारासाठी तीन पिढ्यांपूर्वीच आंध्रप्रदेशातून विदर्भात स्थलांतरीत झालेल्या वीर समाजाला शासनाने जात प्रमाणपत्र देण्याचे नाकारले आहे. त्याचबरोबर या समाजातील बहुतांश नागरिक भीक मागून जगत असले तरी त्यांचा बीपीएल यादीमध्ये समावेश नसल्याने शासकीय योजनांचा लाभही मिळत नाही. परिणामी या समाजाला यातनामय जीवन कंठावे लागत आहे. वीर समाज हा मुळचा आंध्रप्रदेशातील निजामाबाद जवळील काटेपल्ली येथील आहे. निजामशाहीच्या काळात या समाजावर फार मोठे अन्याय व अत्याचार करण्यात आले. निजामाच्या अत्याचारांना त्रासून वीर समाजाचे नागरिक आंध्रप्रदेशाच्या सीमेला लागून असलेल्या गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात स्थलांतरीत झाले. वीर समाजाचे सायप्पा, मकेवार, मिरेवार, हजारे, गुंटीवार, मेडपल्लीवार आदी कुटुंब चामोर्शी तालुक्यातील विसापूर येथे स्थायीक झाले. मागील तीन पिढ्यांपासून हे कुटुंब याच ठिकाणी वास्तव्यास आहे. वीरभद्र समाजाचा एनटी प्रवर्गात समावेश आहे. वीरभद्र हे वीर समाजाचे कुलदैवत आहे. मात्र शासनाने वीर व वीरभद्र हे वेगळे समाज असल्याचे शासनाने घोषित करून वीर समाजाला जातीचे प्रमाणपत्र देण्यास नकार दिला आहे. जात प्रमाणपत्र नसल्याने खुल्या प्रवर्गात या समाजातील युवकांना स्पर्धा करणे कठीण जात आहे. परिणामी या समाजातील युवक नोकऱ्यांपासून वंचित आहेत. भीक मागून जगत असले तरी बीपीएलमध्ये या नागरिकांची नावे नाहीत. त्यामुळे एकाही शासकीय योजनेचा लाभ या नागरिकांना मिळत नाही. त्यामुळे जन्मापासून तर मृत्यूपर्यंत गरीबीतच जीवन कंठावे लागत आहे. सकाळी आंघोळ करून कमन कुंडल, घंटा व शंख घेऊन या समाजातील नागरिक भीक्षा मागण्यासाठी बाहेर पडतात. शासनाने या समाजाच्या विकासासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी समाजातील नागरिकांकडून होत आहे.