शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: वडाळा, हिंदमाता, दादर टीटीसह मुंबईतील अनेक भागांत पाणी साचले; वाहतूक मंदावली
2
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
3
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
4
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
5
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
6
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी
7
AI क्राईम प्रिडिक्शन सिस्टम: गुन्हेगारांना पकडण्यासाठी आता 'हा' देश घेणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत
8
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
9
आयटी कंपनीने ८०% कर्मचाऱ्यांना एकाचवेळी कामावरुन काढलं; कारण वाचून हैराण व्हाल
10
Shocking! विवाहबाह्य संबंधातून आमिर खानला आहे एक मुलगा, भावाचा धक्कादायक खुलासा
11
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
12
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
13
रील्स बनवण्याचा नाद, घरमालकाच्या मुलाशी जवळीक, पतीची हत्या करून फरार झालेल्या पत्नीला बॉयफ्रेंडसह अटक 
14
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
15
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
16
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
17
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
18
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
19
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
20
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू

वीर समाज जगतोय यातनामय जीवन

By admin | Updated: November 16, 2014 22:51 IST

रोजगारासाठी तीन पिढ्यांपूर्वीच आंध्रप्रदेशातून विदर्भात स्थलांतरीत झालेल्या वीर समाजाला शासनाने जात प्रमाणपत्र देण्याचे नाकारले आहे. त्याचबरोबर या समाजातील बहुतांश नागरिक भीक मागून

मिलींद मेडपीलवार - तळोधी (मो.)रोजगारासाठी तीन पिढ्यांपूर्वीच आंध्रप्रदेशातून विदर्भात स्थलांतरीत झालेल्या वीर समाजाला शासनाने जात प्रमाणपत्र देण्याचे नाकारले आहे. त्याचबरोबर या समाजातील बहुतांश नागरिक भीक मागून जगत असले तरी त्यांचा बीपीएल यादीमध्ये समावेश नसल्याने शासकीय योजनांचा लाभही मिळत नाही. परिणामी या समाजाला यातनामय जीवन कंठावे लागत आहे. वीर समाज हा मुळचा आंध्रप्रदेशातील निजामाबाद जवळील काटेपल्ली येथील आहे. निजामशाहीच्या काळात या समाजावर फार मोठे अन्याय व अत्याचार करण्यात आले. निजामाच्या अत्याचारांना त्रासून वीर समाजाचे नागरिक आंध्रप्रदेशाच्या सीमेला लागून असलेल्या गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात स्थलांतरीत झाले. वीर समाजाचे सायप्पा, मकेवार, मिरेवार, हजारे, गुंटीवार, मेडपल्लीवार आदी कुटुंब चामोर्शी तालुक्यातील विसापूर येथे स्थायीक झाले. मागील तीन पिढ्यांपासून हे कुटुंब याच ठिकाणी वास्तव्यास आहे. वीरभद्र समाजाचा एनटी प्रवर्गात समावेश आहे. वीरभद्र हे वीर समाजाचे कुलदैवत आहे. मात्र शासनाने वीर व वीरभद्र हे वेगळे समाज असल्याचे शासनाने घोषित करून वीर समाजाला जातीचे प्रमाणपत्र देण्यास नकार दिला आहे. जात प्रमाणपत्र नसल्याने खुल्या प्रवर्गात या समाजातील युवकांना स्पर्धा करणे कठीण जात आहे. परिणामी या समाजातील युवक नोकऱ्यांपासून वंचित आहेत. भीक मागून जगत असले तरी बीपीएलमध्ये या नागरिकांची नावे नाहीत. त्यामुळे एकाही शासकीय योजनेचा लाभ या नागरिकांना मिळत नाही. त्यामुळे जन्मापासून तर मृत्यूपर्यंत गरीबीतच जीवन कंठावे लागत आहे. सकाळी आंघोळ करून कमन कुंडल, घंटा व शंख घेऊन या समाजातील नागरिक भीक्षा मागण्यासाठी बाहेर पडतात. शासनाने या समाजाच्या विकासासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी समाजातील नागरिकांकडून होत आहे.