शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
4
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
5
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
8
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
9
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
10
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
11
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
12
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
13
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
14
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
15
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
16
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
17
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
18
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
19
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
20
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले

दु:खाच्या महासागरात तिचे अश्रूही आटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 23:26 IST

जेमतेम तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना तिचे लग्न झाले. काही वर्षातच तिचा संसार चांगला बहरला आणि ती दोन मुले आणि एका मुलीची आई झाली. थोड्याशा मिळकतीतही तिचा संसार समाधानाने सुरू होता. पण मंगळवारची पहाट तिला दु:खाच्या महासागरात लोटणारी ठरली.

रमेश मारगोनवार ।लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : जेमतेम तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना तिचे लग्न झाले. काही वर्षातच तिचा संसार चांगला बहरला आणि ती दोन मुले आणि एका मुलीची आई झाली. थोड्याशा मिळकतीतही तिचा संसार समाधानाने सुरू होता. पण मंगळवारची पहाट तिला दु:खाच्या महासागरात लोटणारी ठरली. नक्षलवाद्यांनी केलेल्या निर्घृण हत्येने तिच्या जीवनाचा आधारच तिच्यापासून कायमचा दूर झाला होता. आपल्या संसारवेलीवर फुललेल्या चिमुकल्यांना घेऊन आता जगायचे कसे, आणि कोणाच्या आधाराने? असा यक्षप्रश्न उभा ठाकलेल्या त्या अभागी मातेच्या डोळ्यातले अश्रूही आटल्याचे हृदयद्रावक चित्र मंगळवारी पहायला मिळाले.कसनासूर या जेमतेम १५० लोकवस्तीच्या गावातील तीन जणांची नक्षलवाद्यांनी हत्या करून त्यांचे मृतदेह गावाजवळ आणून टाकले. त्या तीनही कुटुंबप्रमुखांचे संसार आज उघड्यावर आले. तिघांच्या पत्नी आणि मुलांच्या आयुष्यासमोर आज काळोख दाटला आहे. भेदरलेल्या नजरेने भविष्याचे चित्र पाहताना शून्यात गेलेली त्यांची नजर त्यांच्या अपार दु:खाची कल्पना देत होती. नक्षलींच्या दहशतीने संपूर्ण गाव ताडगाव पोलीस मदत केंद्रात आश्रयाला आले.त्यात तीनही मृतांच्या पत्नी आपल्या मुलांना घेऊन आल्या होत्या. त्यातील कन्ना रैतू मडावी (३०) या मृत युवकाची मुले सर्वात लहान आहेत. पोलिसांनी दिलेल्या जेवणातून कन्नाची पत्नी मन्नी तीनही निरागस मुलांच्या पोटात दोन घास भरवत होती. पण तिच्या घशाखाली एकही घास उतरत नव्हता. हीच अवस्था इतरही दोन मृतांच्या पत्नींची होती.

मदतीसाठी कोण धावणार?गेल्या आठवड्यात एटापल्लीजवळ झालेल्या अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना मदत मिळवून देण्यासाठी अनेक नेत्यांनी पुढाकार घेतला. पण नक्षल दहशतीने जगणे असह्यझालेल्या कसनासूरमधील गावकऱ्यांच्या मदतीसाठी आणि तीनही मृतांच्या कुटुंबीयांना दिलासा देण्यासाठी कोणीही नेतेमंडळी आली नाही. त्यांना सरकारी मदत मिळवून देण्यासाठी कोणी पुढाकार घेणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात होता.