शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

दु:खाच्या महासागरात तिचे अश्रूही आटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 23:26 IST

जेमतेम तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना तिचे लग्न झाले. काही वर्षातच तिचा संसार चांगला बहरला आणि ती दोन मुले आणि एका मुलीची आई झाली. थोड्याशा मिळकतीतही तिचा संसार समाधानाने सुरू होता. पण मंगळवारची पहाट तिला दु:खाच्या महासागरात लोटणारी ठरली.

रमेश मारगोनवार ।लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : जेमतेम तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना तिचे लग्न झाले. काही वर्षातच तिचा संसार चांगला बहरला आणि ती दोन मुले आणि एका मुलीची आई झाली. थोड्याशा मिळकतीतही तिचा संसार समाधानाने सुरू होता. पण मंगळवारची पहाट तिला दु:खाच्या महासागरात लोटणारी ठरली. नक्षलवाद्यांनी केलेल्या निर्घृण हत्येने तिच्या जीवनाचा आधारच तिच्यापासून कायमचा दूर झाला होता. आपल्या संसारवेलीवर फुललेल्या चिमुकल्यांना घेऊन आता जगायचे कसे, आणि कोणाच्या आधाराने? असा यक्षप्रश्न उभा ठाकलेल्या त्या अभागी मातेच्या डोळ्यातले अश्रूही आटल्याचे हृदयद्रावक चित्र मंगळवारी पहायला मिळाले.कसनासूर या जेमतेम १५० लोकवस्तीच्या गावातील तीन जणांची नक्षलवाद्यांनी हत्या करून त्यांचे मृतदेह गावाजवळ आणून टाकले. त्या तीनही कुटुंबप्रमुखांचे संसार आज उघड्यावर आले. तिघांच्या पत्नी आणि मुलांच्या आयुष्यासमोर आज काळोख दाटला आहे. भेदरलेल्या नजरेने भविष्याचे चित्र पाहताना शून्यात गेलेली त्यांची नजर त्यांच्या अपार दु:खाची कल्पना देत होती. नक्षलींच्या दहशतीने संपूर्ण गाव ताडगाव पोलीस मदत केंद्रात आश्रयाला आले.त्यात तीनही मृतांच्या पत्नी आपल्या मुलांना घेऊन आल्या होत्या. त्यातील कन्ना रैतू मडावी (३०) या मृत युवकाची मुले सर्वात लहान आहेत. पोलिसांनी दिलेल्या जेवणातून कन्नाची पत्नी मन्नी तीनही निरागस मुलांच्या पोटात दोन घास भरवत होती. पण तिच्या घशाखाली एकही घास उतरत नव्हता. हीच अवस्था इतरही दोन मृतांच्या पत्नींची होती.

मदतीसाठी कोण धावणार?गेल्या आठवड्यात एटापल्लीजवळ झालेल्या अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना मदत मिळवून देण्यासाठी अनेक नेत्यांनी पुढाकार घेतला. पण नक्षल दहशतीने जगणे असह्यझालेल्या कसनासूरमधील गावकऱ्यांच्या मदतीसाठी आणि तीनही मृतांच्या कुटुंबीयांना दिलासा देण्यासाठी कोणीही नेतेमंडळी आली नाही. त्यांना सरकारी मदत मिळवून देण्यासाठी कोणी पुढाकार घेणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात होता.