शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
2
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
3
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
4
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
5
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
6
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
7
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
10
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
11
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
12
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
13
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
14
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
15
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
16
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
17
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
18
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
19
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
20
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी

दु:खाच्या महासागरात तिचे अश्रूही आटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 23:26 IST

जेमतेम तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना तिचे लग्न झाले. काही वर्षातच तिचा संसार चांगला बहरला आणि ती दोन मुले आणि एका मुलीची आई झाली. थोड्याशा मिळकतीतही तिचा संसार समाधानाने सुरू होता. पण मंगळवारची पहाट तिला दु:खाच्या महासागरात लोटणारी ठरली.

रमेश मारगोनवार ।लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : जेमतेम तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना तिचे लग्न झाले. काही वर्षातच तिचा संसार चांगला बहरला आणि ती दोन मुले आणि एका मुलीची आई झाली. थोड्याशा मिळकतीतही तिचा संसार समाधानाने सुरू होता. पण मंगळवारची पहाट तिला दु:खाच्या महासागरात लोटणारी ठरली. नक्षलवाद्यांनी केलेल्या निर्घृण हत्येने तिच्या जीवनाचा आधारच तिच्यापासून कायमचा दूर झाला होता. आपल्या संसारवेलीवर फुललेल्या चिमुकल्यांना घेऊन आता जगायचे कसे, आणि कोणाच्या आधाराने? असा यक्षप्रश्न उभा ठाकलेल्या त्या अभागी मातेच्या डोळ्यातले अश्रूही आटल्याचे हृदयद्रावक चित्र मंगळवारी पहायला मिळाले.कसनासूर या जेमतेम १५० लोकवस्तीच्या गावातील तीन जणांची नक्षलवाद्यांनी हत्या करून त्यांचे मृतदेह गावाजवळ आणून टाकले. त्या तीनही कुटुंबप्रमुखांचे संसार आज उघड्यावर आले. तिघांच्या पत्नी आणि मुलांच्या आयुष्यासमोर आज काळोख दाटला आहे. भेदरलेल्या नजरेने भविष्याचे चित्र पाहताना शून्यात गेलेली त्यांची नजर त्यांच्या अपार दु:खाची कल्पना देत होती. नक्षलींच्या दहशतीने संपूर्ण गाव ताडगाव पोलीस मदत केंद्रात आश्रयाला आले.त्यात तीनही मृतांच्या पत्नी आपल्या मुलांना घेऊन आल्या होत्या. त्यातील कन्ना रैतू मडावी (३०) या मृत युवकाची मुले सर्वात लहान आहेत. पोलिसांनी दिलेल्या जेवणातून कन्नाची पत्नी मन्नी तीनही निरागस मुलांच्या पोटात दोन घास भरवत होती. पण तिच्या घशाखाली एकही घास उतरत नव्हता. हीच अवस्था इतरही दोन मृतांच्या पत्नींची होती.

मदतीसाठी कोण धावणार?गेल्या आठवड्यात एटापल्लीजवळ झालेल्या अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना मदत मिळवून देण्यासाठी अनेक नेत्यांनी पुढाकार घेतला. पण नक्षल दहशतीने जगणे असह्यझालेल्या कसनासूरमधील गावकऱ्यांच्या मदतीसाठी आणि तीनही मृतांच्या कुटुंबीयांना दिलासा देण्यासाठी कोणीही नेतेमंडळी आली नाही. त्यांना सरकारी मदत मिळवून देण्यासाठी कोणी पुढाकार घेणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात होता.