शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

नुकसानग्रस्तांना मदत देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 22:57 IST

यावषी पूर्व विदर्भातील धानाच्या जिल्ह्यात पावसाच्या कमतरतेमुळे मावा-तुडतुड्याचा प्रादुर्भाव होऊन मोठ्या प्रमाणात शेतकºयांचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देभाजप प्रवक्त्यांची ग्वाही : किडीवर मात करण्यासाठी शत्रूकिडीची उपाययोजना

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : यावषी पूर्व विदर्भातील धानाच्या जिल्ह्यात पावसाच्या कमतरतेमुळे मावा-तुडतुड्याचा प्रादुर्भाव होऊन मोठ्या प्रमाणात शेतकºयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे सर्व्हेक्षण सुरू असून शेतकºयांना मदत देण्यासंदर्भात सरकार गांभीर्याने विचार करीत आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी यांनी येथे पत्रपरिषदेत दिली.राज्य सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सरकारची कामगिरी सांगण्यासाठी भंडारी पूर्व विदर्भाच्या दौºयावर निघाले आहेत. त्यात सोमवारी सायंकाळी त्यांनी गडचिरोलीत पत्रकारांना माहिती दिली.अनियमित आणि कमी पावसामुळे किडीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर कीटकनाशकाची फवारणी हा ठाम उपाय आता राहिलेला नाही. त्याऐवजी इस्रायली तंत्रज्ञानावर आधारित प्रतिकीटकांचा वापर योग्य ठरणार आहे. प्रत्येक किडीला शत्रुकिड असते. त्यामुळे ती किडच उपद्रवी किडीला नष्ट करू शकते. त्यासाठी शास्त्रज्ञांकडून योग्य ती माहिती घेतली जात असून भारतातही हे तंत्रज्ञान विकसित करून किडीच्या प्रादुर्भावर उपायोजना तयार करणे सुरू असल्याचे भंडारी यांनी सांगितले. शेतीच्या क्षेत्रात मुलभूत बदल केल्याने शेतीत गुंतवणूक वाढली. जलयुक्त शिवार, शेततळे यामुळे शेतीच्या पाण्याचे विकेंद्रीकरण झालं. विहिरींच्या पाण्यावरील सिंचन क्षेत्र वाढलं. शेतकºयांना ३४ हजार २२ कोटी रुपयांची कर्जमाफी देताना शेतकºयांना कर्जमुक्त करून त्यांची पत वाढविणे, जेणेकरून त्यांना पुढील कर्ज उपलब्ध होण्यासाठी अडचण जाणार नाही, अशी व्यवस्था केली. आधीच्या आणि आताच्या कर्जमाफीत हा मुख्य फरक असल्याचे त्यांनी सांगितले.या कर्जमाफीसाठी निकषात बसत असलेल्या परंतू विविध कारणांनी वंचित राहिलेल्या शेतकºयांचा फेरआढावा घेण्यासाठी तालुकास्तरावर सहायक निबंधकांच्या नेतृत्वात समित्यांचे गठन करून छाननी केली जाणार असल्याचे यावेळी भंडारी यांनी सांगितले.या पत्रपरिषदेला खा.अशोक नेते, जि.प.अध्यक्ष योगिता भांडेकर, माजी जि.प.अध्यक्ष रवींद्र ओलालवार, विदर्भ विभाग प्रसिद्धी प्रमुख चंदन गोस्वामी, रमेश भुसारी, डॉ.भारत खटी, अनिल कुनघाडकर, आनंद श्रृंगारपवार व इतर पदाधिकारी उपस्थित होते.गडचिरोलीसाठीच्या जीआरची अंमलबजावणी करणारयावेळी माधव भंडारी यांनी राज्य सरकारच्या विविध कामगिरीची माहिती सांगितली. परंतू गडचिरोली जिल्ह्यात अधिकाºयांच्या रिक्त पदांमुळे परिस्थिती विपरित आहे, ही बाब पत्रकारांनी निदर्शनास आणून दिली. त्यावर खा.नेते यांनी गडचिरोली जिल्ह्यात काम करणाºया अधिकाºयांसाठी शासनाने काढलेल्या स्वतंत्र जीआरची आठवण करून दिली. त्या जीआरनुसार गडचिरोलीत दोन वर्षे काम करणाºया अधिकाºयांना नंतर इच्छित ठिकाणी बदली देण्याचे प्रयोजन आहे. परंतू त्या जीआरची अंमलबजावणीच होत नसून ती राज्य शासनाने गांभिर्याने करावी अशी सूचना खा.नेते यांनी केली. त्यावर ही बाब मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवून त्याची अंमलबजावणी केली जाईल, असे भंडारी यांनी सांगितले.३३ टक्के नुकसानीसाठीही मदतयावेळी खासदार अशोक नेते यांनी संपूर्ण गडचिरोली लोकसभा क्षेत्रातील शेतकºयांची परिस्थिती यावर्षी किडीमुळे विदारक असल्याचे सांगून ७० टक्के शेतकºयांचे पीक वाया गेल्याचे सांगितले. त्यामुळे हे क्षेत्र दुष्काळग्रस्त घोषित करावे अशी मागणी सरकारकडे केली आहे. नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी सर्व्हेक्षण सुरू आहे. त्यामुळे शेतकºयांना भरपाई मिळणार असून केवळ ५० टक्केपेक्षा जास्त नाही तर ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान असणाºया शेतकºयांनाही मदत मिळेल, असे खा.नेते म्हणाले.