शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

नुकसानग्रस्तांना मदत देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 22:57 IST

यावषी पूर्व विदर्भातील धानाच्या जिल्ह्यात पावसाच्या कमतरतेमुळे मावा-तुडतुड्याचा प्रादुर्भाव होऊन मोठ्या प्रमाणात शेतकºयांचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देभाजप प्रवक्त्यांची ग्वाही : किडीवर मात करण्यासाठी शत्रूकिडीची उपाययोजना

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : यावषी पूर्व विदर्भातील धानाच्या जिल्ह्यात पावसाच्या कमतरतेमुळे मावा-तुडतुड्याचा प्रादुर्भाव होऊन मोठ्या प्रमाणात शेतकºयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे सर्व्हेक्षण सुरू असून शेतकºयांना मदत देण्यासंदर्भात सरकार गांभीर्याने विचार करीत आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी यांनी येथे पत्रपरिषदेत दिली.राज्य सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सरकारची कामगिरी सांगण्यासाठी भंडारी पूर्व विदर्भाच्या दौºयावर निघाले आहेत. त्यात सोमवारी सायंकाळी त्यांनी गडचिरोलीत पत्रकारांना माहिती दिली.अनियमित आणि कमी पावसामुळे किडीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर कीटकनाशकाची फवारणी हा ठाम उपाय आता राहिलेला नाही. त्याऐवजी इस्रायली तंत्रज्ञानावर आधारित प्रतिकीटकांचा वापर योग्य ठरणार आहे. प्रत्येक किडीला शत्रुकिड असते. त्यामुळे ती किडच उपद्रवी किडीला नष्ट करू शकते. त्यासाठी शास्त्रज्ञांकडून योग्य ती माहिती घेतली जात असून भारतातही हे तंत्रज्ञान विकसित करून किडीच्या प्रादुर्भावर उपायोजना तयार करणे सुरू असल्याचे भंडारी यांनी सांगितले. शेतीच्या क्षेत्रात मुलभूत बदल केल्याने शेतीत गुंतवणूक वाढली. जलयुक्त शिवार, शेततळे यामुळे शेतीच्या पाण्याचे विकेंद्रीकरण झालं. विहिरींच्या पाण्यावरील सिंचन क्षेत्र वाढलं. शेतकºयांना ३४ हजार २२ कोटी रुपयांची कर्जमाफी देताना शेतकºयांना कर्जमुक्त करून त्यांची पत वाढविणे, जेणेकरून त्यांना पुढील कर्ज उपलब्ध होण्यासाठी अडचण जाणार नाही, अशी व्यवस्था केली. आधीच्या आणि आताच्या कर्जमाफीत हा मुख्य फरक असल्याचे त्यांनी सांगितले.या कर्जमाफीसाठी निकषात बसत असलेल्या परंतू विविध कारणांनी वंचित राहिलेल्या शेतकºयांचा फेरआढावा घेण्यासाठी तालुकास्तरावर सहायक निबंधकांच्या नेतृत्वात समित्यांचे गठन करून छाननी केली जाणार असल्याचे यावेळी भंडारी यांनी सांगितले.या पत्रपरिषदेला खा.अशोक नेते, जि.प.अध्यक्ष योगिता भांडेकर, माजी जि.प.अध्यक्ष रवींद्र ओलालवार, विदर्भ विभाग प्रसिद्धी प्रमुख चंदन गोस्वामी, रमेश भुसारी, डॉ.भारत खटी, अनिल कुनघाडकर, आनंद श्रृंगारपवार व इतर पदाधिकारी उपस्थित होते.गडचिरोलीसाठीच्या जीआरची अंमलबजावणी करणारयावेळी माधव भंडारी यांनी राज्य सरकारच्या विविध कामगिरीची माहिती सांगितली. परंतू गडचिरोली जिल्ह्यात अधिकाºयांच्या रिक्त पदांमुळे परिस्थिती विपरित आहे, ही बाब पत्रकारांनी निदर्शनास आणून दिली. त्यावर खा.नेते यांनी गडचिरोली जिल्ह्यात काम करणाºया अधिकाºयांसाठी शासनाने काढलेल्या स्वतंत्र जीआरची आठवण करून दिली. त्या जीआरनुसार गडचिरोलीत दोन वर्षे काम करणाºया अधिकाºयांना नंतर इच्छित ठिकाणी बदली देण्याचे प्रयोजन आहे. परंतू त्या जीआरची अंमलबजावणीच होत नसून ती राज्य शासनाने गांभिर्याने करावी अशी सूचना खा.नेते यांनी केली. त्यावर ही बाब मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवून त्याची अंमलबजावणी केली जाईल, असे भंडारी यांनी सांगितले.३३ टक्के नुकसानीसाठीही मदतयावेळी खासदार अशोक नेते यांनी संपूर्ण गडचिरोली लोकसभा क्षेत्रातील शेतकºयांची परिस्थिती यावर्षी किडीमुळे विदारक असल्याचे सांगून ७० टक्के शेतकºयांचे पीक वाया गेल्याचे सांगितले. त्यामुळे हे क्षेत्र दुष्काळग्रस्त घोषित करावे अशी मागणी सरकारकडे केली आहे. नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी सर्व्हेक्षण सुरू आहे. त्यामुळे शेतकºयांना भरपाई मिळणार असून केवळ ५० टक्केपेक्षा जास्त नाही तर ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान असणाºया शेतकºयांनाही मदत मिळेल, असे खा.नेते म्हणाले.