शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
2
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
3
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
4
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
5
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
6
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
7
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
8
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
9
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
10
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
11
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
12
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
13
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
14
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
15
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
16
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
17
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
18
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
19
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
20
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 01:06 IST

अल्प पाऊस व कीड रोगांच्या प्रादुर्भावामुळे खरीप हंगामातील ५० टक्के धानपीक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हातून गेले. आता गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या अवकाळी वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील पिकांना तडाखा बसला.

ठळक मुद्देनामदेव उसेंडी यांची मागणी : प्रसंगी तीव्र आंदोलन छेडणार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : अल्प पाऊस व कीड रोगांच्या प्रादुर्भावामुळे खरीप हंगामातील ५० टक्के धानपीक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हातून गेले. आता गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या अवकाळी वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील पिकांना तडाखा बसला. शासनाने नुकसानग्रस्त शेतीचे तत्काळ सर्वेक्षण करून आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी काँगे्रसचे जिल्हाध्यक्ष माजी आ.डॉ.नामदेव उसेंडी यांनी केली आहे.गडचिरोली जिल्ह्यात धान हे मुख्य पीक आहे. येथील शेतकरी धानाची लागवड मोठ्या प्रमाणात करतात. मात्र यंदाच्या खरीप हंगामात धानपीक ऐन गर्भात असताना मावा, तुडतुडा, लष्कर अळी, खोडकिडा व इतर रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला. शेतकºयांनी तीन ते चारदा कीटकनाशकाची फवारणी केली. मात्र धानपिकावरील कीड व रोग आटोक्यात आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे खरीप हंगामात मोठे नुकसान झाले. आता रब्बी हंगामातील तूर, हरभरा, गहू, उडीद, मूग, मक्का, मिरची आदी पिके उंबरठ्यावर आली होती. तसेच भाजीपाला पिकही फुलले होते. मात्र १२ व १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास झालेल्या अवकाळी वादळी पावसाने या पिकांचे मोठे नुकसान झाले.नुकसानग्रस्त भागाचे सर्वेक्षण करून शासनाने आर्थिक मदत जाहीर करावी, अन्यथा जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे शासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा डॉ. उसेंडी यांनी दिला आहे.