शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
2
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
3
एका महिलेचा कॉल अन् करोडपती बँकरला २३ कोटींचा गंडा; एक महिन्यासाठी केले डिजिटल अरेस्ट
4
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
5
Video - हायव्होल्टेज ड्रामा! लग्नाचं वेड, जीवाशी खेळ; गर्लफ्रेंड न भेटल्याने 'तो' टॉवरवर चढला
6
Health Tips: पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? जेवण करण्यापूर्वी, जेवण करताना की जेवणानंतर? 
7
"ऑपरेशन सिंदूरचा पार्ट २, पार्ट ३ अजून बाकी"; राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला 'मेसेज', मोरक्कोमध्ये काय बोलले?
8
खेळण्यातली बंदूक वापरली अन् ३ बँकांवर डल्ला मारला! पोलिसांनी दरोडेखोराला पकडताच समोर आलं धक्कादायक सत्य
9
सणासुदीच्या काळात कार खरेदी करणे झाले स्वस्त! जीएसटीमध्ये मोठी कपात, कर्जही झाले स्वस्त
10
पाकिस्ताननं कर्जाच्या आकडेवारीत असं काय लपवलं की, अमेरिकेनं दिला अल्टिमेटम; भारताशी तर कनेक्शन नाही ना?
11
दणदणीत विजयानंतर गंभीरने पाकिस्तानला डिवचले, खेळाडूंना अशी सूचना देत जखमेवर मीठ चोळले
12
ब्रेकअपचं खोटं अन् हत्येनंतरचा बनाव...कानपूर सुटकेस 'कांड' प्रकरणात ट्विस्ट, २ आरोपींना अटक
13
Accident: पाण्याचा टँकर आणि दुचाकीत भीषण धडक; तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू
14
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
15
VIRAL: रिक्षात बसलेल्या विदेशी तरुणाला रिक्षाचालकाने फ्रेंचमध्ये विचारला प्रश्न; त्यानंतर जे झालं ते...
16
'या' ग्राहकांना हेल्थ इन्शुरन्सवर GST माफीचा फायदा नाही; आरोग्य विम्या कंपन्यांनी केलं स्पष्ट
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमात मराठी मालिकाविश्वातील 'या' अभिनेत्याची लागली वर्णी, स्वतः दिली माहिती
18
"पैसे कमावतो, टॅक्स भरतो; चोरी करत नाही...", तगड्या कमाईवरुन अक्षय कुमारचं स्पष्टीकरण
19
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
20
फक्त गरबाच खेळा...हुल्लडबाजी नको; दांडियामध्ये साध्या वेशात महिला पोलीस सहभागी होणार

हेल्मेटसक्ती असायलाच हवी

By admin | Updated: February 4, 2016 01:22 IST

राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी औरंगाबाद येथे बुधवारी एका कार्यक्रमात राज्यभर हेल्मेटसक्ती करण्याबाबत संकेत दिले आहेत.

सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया : औरंगाबादनंतर राज्यातही सक्ती लागू करण्याचे संकेतगडचिरोली : राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी औरंगाबाद येथे बुधवारी एका कार्यक्रमात राज्यभर हेल्मेटसक्ती करण्याबाबत संकेत दिले आहेत. दरवर्षी देशात हजारो नागरिकांचा दुचाकी अपघातात हेल्मेट नसल्याच्या कारणावरून मृत्यू होतो. हेल्मेट सक्तीचे झाल्यास अपघातात मृत्यूचे प्रमाण कमी करण्यास मदत होईल, अशी प्रतिक्रीया या निर्णयावर सर्वसामान्यांमध्ये उमटली आहे. गडचिरोली येथील प्रगतशील शेतकरी चंद्रशेखर भडांगे म्हणाले, हेल्मेट हे वाहनचालकांना सक्तीचे असायलाच हवे, नव्हे तर हेल्मेट घातल्याने वाहनचालकाच्या सुरक्षेचे चांगले कवच निर्माण होईल, आज अपघातात अनेक जण दगावतात. डोक्याला जबर दुखापत होऊन काहींना आयुष्यभर अधू जीवन जगावे लागते. यासाठी हेल्मेट सक्तीचे व्हायलाच हवे, असे ते म्हणाले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी म्हणाले, राज्याच्या परिवहन मंत्र्यांनी औरंगाबाद येथे हेल्मेट सक्तीच्या निर्णयाचे संकेत दिले. हेल्मेटमुळे अपघाताचे प्रमाण कमी होईल. अपघात झालाही तरी संबंधित वाहनचालकांना जास्त प्रमाणात धोका पोहोचणार नाही, या निर्णयाची गडचिरोली जिल्ह्यातही अंमलबजावणी व्हावी. शिवसेना जिल्हाध्यक्ष सुरेंद्रसिंह चंदेल म्हणाले, गडचिरोली जिल्ह्यात वाहनचालक हेल्मेट वापरत नसल्यामुळे आजवर अनेक अपघात घडले आहेत. या अपघातात बरेचजण दगावले. अपघातातील बळींची संख्या कमी करून सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हेल्मेटसक्ती आवश्यक आहे. हेल्मेट न घालणाऱ्या वाहनचालकांविरोधात पोलीस व परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करावी. यासोबतच राज्य शासनाने जिल्ह्यातील रस्त्याच्या स्थितीबाबत गांभीर्याने विचार करावा. जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. माधुरी किलनाके म्हणाल्या, हेल्मेटअभावी, वाहनांचा प्रवास जीवघेणा व धोक्याचा आहे. अपघातात डोक्याला दुखापत झाल्यावर बचावण्याची शक्यता कमी असते. अपघातात डोक्याला मार लागल्यावर दुरूस्तीनंतरही संबंधित वाहनचालकाला लकवा व इतर आजार होऊ शकतात. हेल्मेटच्या वापरामुळे मृत्यू टळू शकतो, त्यामुळे हेल्मेट घालणे आवश्यक आहे. गोंडवाना सैनिकी विद्यालयाचे प्राचार्य संजय भांडारकर म्हणाले, गडचिरोली जिल्ह्यात वाहनचालकांना हेल्मेटसक्ती आवश्यक आहे. याशिवाय चारचाकी वाहनचालकांनी सिटबेल्ट आवर्जून लावावे, या नियमाचे भंग करणाऱ्या वाहनचालकांवर परिवहन व पोलीस विभागामार्फत कारवाई व्हावी. जिल्हा महिला कॉँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष भावना वानखेडे म्हणाल्या, जिल्ह्यात महिला व युवती वाहनचालकांचेही अपघात वाढले आहेत. महिला युवतींसह सर्वच वाहनचालकांना हेल्मेटसक्ती करणे आवश्यक आहे. यातून संरक्षण चांगल्या प्रकारे होते. गडचिरोलीचे नगरसेवक संजय मेश्राम म्हणाले, गेल्या दोन- तीन वर्षांत जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. यात अनेकांचा बळीही गेला. वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट घालणे आवश्यक आहे. राज्याच्या परिवहन मंत्र्यांच्या या निर्णयाचे आपण स्वागत करीत असून गडचिरोली जिल्ह्यात प्रत्येक वाहनचालकांना हेल्मेटसक्ती करावी. (स्थानिक प्रतिनिधी)