शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
2
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; जन्मदात्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
3
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
4
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
5
CJI BR Gavai Oath Ceremony : महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
6
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
7
'या' दिग्गज कंपनीतून बाहेर पडण्याच्या तयारीत Reliance; ५०० कोटींची केलेली गुंतवणूक, मिळणार ११,१४१ कोटी रुपये
8
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
9
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
11
रितेश देशमुखनं विचारलं 'मोठं होऊन काय होणार?' लहानग्याचं उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान!
12
बर्फ वितळेल, जास्त पाऊस पडेल, गंगा नदीचा प्रवाह ५० टक्क्यांनी वाढेल..; IIT रुरकीचा रिपोर्ट
13
विराटशिवाय 'टेस्ट' झाली फिकी; प्रीती झिंटानं बोलून दाखवली मनातली गोष्ट
14
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
15
अनुष्का सेनवर चिडला नील नितीन मुकेश? आगामी सीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल
16
एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
17
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
18
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर टाकण्याची धमकी: कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
19
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
20
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू

मुसळधार पावसाने जिल्हा जलमय

By admin | Updated: July 10, 2016 00:59 IST

गेल्या दोन दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात संततधार पाऊस होत आहे. गेल्या २४ तासात गडचिरोली जिल्ह्यात

कन्नमवार जलाशय ओव्हरफ्लो : नद्या फुगल्या, अनेक मार्ग बंद; जनजीवन प्रभावितगडचिरोली : गेल्या दोन दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात संततधार पाऊस होत आहे. गेल्या २४ तासात गडचिरोली जिल्ह्यात एकूण १ हजार १४९.६ मिमी पाऊस झाल्याची नोंद जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाने घेतली आहे. सर्वच नद्या फुगल्या असून पुलावरून पाणी वाहत आहे. पूर परिस्थितीमुळे जिल्ह्यातील अनेक मार्गावरील वाहतूक बंद झाली असून २०० वर गावांचा संपर्क जिल्हा मुख्यालयाशी तुटलेला आहे. चामोर्शी तालुक्यातील रेगडी जलाशय १०० टक्के भरला असून पाणी ओव्हरफ्लो होत आहे. या धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता ६७.५४ क्युबीक मीटर एवढी आहे. भामरागडनजीकच्या पर्लकोटा नदीच्या पुलावर पाणी चढल्यामुळे शनिवारी पहाटेपासूनच भामरागड-आलापल्ली मार्ग बंद झाला असून या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. अहेरी नजीकच्या गडअहेरी नाल्यावर पाच ते सात फूट पाणी वाहत असल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. शिवाय अहेरी तालुक्यातील ३० वर गावांचा संपर्क अहेरी तालुका मुख्यालयाशी तुटला आहे. दिना नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने आलापल्ली-आष्टी मार्गावरील वाहतूक बंद आहे. दरम्यान या भागातील लोकांचा गडचिरोली व चंद्रपूर या दोन्ही जिल्ह्याशी संपर्क तुटला आहे. गडचिरोली तालुक्यातील मौशी-वडधा मार्गावरील नाल्यावर एक फूट पाणी वाहत असल्याने या मार्गावरील जड वाहतूक बंद आहे. वैलोचना नदीच्या पुलावर पाणी चढल्याने शनिवारी सकाळी ६ वाजतापासून वैरागड-देलनवाडी या मार्गावरील वाहतूक बंद आहे. धानोरा तालुक्यातील मुस्का-तळेगाव दरम्यानच्या नाल्यावर पाणी चढल्याने हा मार्ग सुध्दा बंद आहे. तसेच इरूपधोडरी-सुरसुंडी दरम्यानच्या नाल्यावर पाणी असल्याने सदर मार्ग बंद आहे. मुलचेरा तालुक्यातही जोरदार पाऊस झाल्याने नजीकच्या गोमणी नाल्याला पूर येण्याची शक्यता आहे.गोसेखुर्द धरणाचे २६ गेट ०.५० मीटरने व सात गेट एक मीटरने उघडण्यात आले असून यातून ३ हजार ७९३ क्युमेक्स इतका पाण्याचा विसर्ग आहे. तसेच गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडल्यामुळे जिल्ह्यातील वैनगंगा, प्राणहिता, दिना, पर्लकोटा, बांडे, वैलोचना, कठाणी आदीसह बहुतांश नद्या दुथडी भरून वाहत आहे. मोसम नदी गाव नाल्यावरून तीन फूट पाणी वाहत असल्याने सिरोंचाकडे जाणारी वाहतूक ठप्प पडली आहे. अहेरी-मुलचेरा मार्गावरील अहेरी-बोटलाचेरू गावाजवळ झाड पडल्याने मार्ग बंद होता. अहेरीचे वन परिक्षेत्राधिकारी यांनी सदर झाड हटविण्याच्या सूचना केल्या. एटापल्ली-गट्टा मार्गावरील आलदंडी नदी पुलावरून सात ते आठ फूट पाणी वाहत असल्याने सुरजागड पट्ट्यातील ७० गावांचा संपर्क तुटला आहे. एटापल्ली-जारावंडी मार्गावरील देवदा ते हालेवारा दरम्यान असलेल्या झुरी नाल्यांमुळे सदर मार्ग बंद आहे. एटापल्ली-मुलचेरा मार्गावरील रेगडी धरणाच्या दाबामुळे बोलेपल्ली ते हेटलकसा दरम्यान नाल्यावरून पाणी जात असल्याने सदर मार्ग बंद आहे. एटापल्लीलगतच्या डुम्मी नाल्याला पूर असल्याने एटापल्लीपासून चार ते पाच किमी अंतरावरील डुम्मी, जव्हेली, मरपल्लीसह इतर गावांचा संपर्क तुटला आहे. मुलचेरा-बोलेपल्ली, कोपरअल्ली-आष्टी, लगाम-मुलचेरा मार्ग बंद आहे. एटापल्ली येथे अनेक ठिकाणी झाडे कोसळली. देचलीपेठा मार्गावरील नाले भरून वाहत असल्याने २० गावांचा संपर्क तुटला आहे. रेखेगाव-भाडभिडी-घोट मार्गावर रेखेगावनजीक रामजी नरोटे यांच्या शेताजवळ झाड कोसळले. त्यामुळे सदर मार्ग बंद होता. अनंतपूर-रेखेगाव मार्गावर पाणी आहे. दिना धरण ओव्हरफ्लो होऊन वाहत असल्याने आष्टी-अहेरी मार्गावरील दिना नदी पुलावर शनिवारी रात्रीपर्यंत पाणी चढण्याची शक्यता आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)२० हून अधिक घरांची पडझड४धानोरा तालुक्यातील इरूपधोडरी, सुरसुंडी, मोहल्ली व धानोरा येथे पावसामुळे चार घरांची अशंत: पडझड झाली. तसेच जिल्ह्याच्या दुर्गम भागांमध्येही अनेक घरांची पडझड झाल्याने नागरिकांचे नुकसान झाले.चामोर्शी, आरमोरी जलमय४गेल्या दोन-तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने चामोर्शी शहरातील सखल भागात पाणी साचले आहे. नाल्या तुडूंब भरून वाहत आहे. नालीतील सांडपाणी व पावसाचे पाणी अनेक घरांमध्ये शिरले आहे. चामोर्शी शहरातील शिवाजी हायस्कूल यशोधरा विद्यालय जा. कृ. बोमनवार शाळेच्या पटांगणात पाणी साचले. गडचिरोली-चामोर्शी रस्त्यावरून पाणी वाहत आहे. चामोर्शी मुख्य मार्गावरील पोर नदी दुथडी भरून वाहत आहे. तालुक्यातील शेती पाण्याखाली आली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रोडवर व पुलावरून पाणी वाहत आहे. आरमोरी तालुक्यातही संततधार पाऊस बरसला. तालुक्यातील नदी, नाले दुथडी भरून वाहत आहे.अहेरी तहसीलदारांनी केली पाहणी४अहेरीचे तहसीलदार एस. एम. सिलमवार, नायब तहसीलदार एन. एल. गुरनुले, सी. एल. किरमे, आपत्ती व्यवस्थापन समितीचे लिपीक व्ही. बी. दुधबळे, तलाठी जे. जी. अनलदेवार यांनी गडअहेरी नाला व दिना नदीवरील पूर परिस्थितीची पाहणी करून आढावा घेतला. तहसीलदार सिलमवार यांनी आवश्यक त्या सूचना कर्मचाऱ्यांना केल्या. वैलोचना नदीच्या पुलावरून विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवासगेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस होत असल्याने वैरागडजवळून वाहणाऱ्या वैरागड-मानापूर मार्गावरील वैलोचना नदी पुलावर रात्रीपासून पाणी चढला आहे. त्यामुळे वैरागड-मानापूर मार्ग बंद झाला असून वैरागडपलीकडील १० गावांचा संपर्क तुटला आहे. शनिवारी सकाळी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागला. या मार्गावरील बसफेऱ्या परतल्या. पूर परिस्थितीमुळे नदी पलिकडील मेंढेबोळी, सुकाळा, मोहझरी, शिवणी बुज, मानापूर, देलनवाडी व नागरवाही या गावांचा संपर्क तुटला. पुरामुळे नदी पलिकडील शेतातील रोवणीचे काम पूर्णपणे ठप्प पडले.चौडमपल्ली पुलावर दिवसभर पाणी४आष्टी-अहेरी मार्गावरील चौडमपल्ली नाल्यावरील पुलावर शनिवारी सकाळी ९ वाजता पाणी चढले. दिवसभर तीन फूट पाणी पुलावरून वाहत असल्याने आष्टी-अहेरी मार्गावरील वाहतूक दिवसभर ठप्प पडली होती. सायंकाळी मार्ग सुरू झाला.