शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

कोरोना रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती शोधताना आरोग्य विभागाची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:51 IST

इतर विषाणूंच्या तुलनेत काेराेनाच्या विषाणूमध्ये संसर्ग घडवून आणण्याची क्षमता सर्वाधिक आहे. संसर्गाची ही साखळी ताेडण्यासाठी काेराेना पाॅझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या ...

इतर विषाणूंच्या तुलनेत काेराेनाच्या विषाणूमध्ये संसर्ग घडवून आणण्याची क्षमता सर्वाधिक आहे. संसर्गाची ही साखळी ताेडण्यासाठी काेराेना पाॅझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शाेध आराेग्य विभागामार्फत घेतला जातो. त्यासाठी संबंधित रुग्ण व त्याचे कुटुंबीय कोणाकोणाच्या संपर्कात आले, कुठे गेले होते आदी माहिती विचारली जाते. मात्र, संबंधितांकडून माहिती लपविली जाते. परिणामी, त्यांच्या संपर्कातील व्यक्तींपर्यंत पाेहाेचणे आराेग्य विभागालाही कठीण झाले आहे. अनेकदा संसर्ग झाल्यानंतरही ती व्यक्ती खुलेआम बाहेर फिरत असल्याने रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

आशावर्कर, एएनएम, एनपीडब्ल्यू यांचे गावस्तरावर पथक तयार करण्यात आले आहे. मागील काही दिवसांमध्ये काेराेना रुग्णांची संख्या घटली हाेती. त्यामुळे पथकांचे काम थंडावले हाेते. आता मात्र रुग्णांची संख्या वाढत असल्याने ही पथके पुन्हा सक्रिय झाली असल्याचे दिसून येते. माहिती दिली जात नसल्याने रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शाेध घेणे कठीण हाेत आहे. नागरिकांनी खरी माहिती दिल्यास संसर्ग झालेल्या व्यक्तीला वेळीच विलगीकरणात ठेवणे शक्य आहे.

बाॅक्स .....

दाेन रुग्णांना पुन्हा काेराेनाची लागण

एकदा काेराेनातून बरे झाल्यानंतर दुसऱ्यांदा काेराेनाची लागण हाेत नाही, असा गैरसमज नागरिकांमध्ये आहे. काेराेनातून बरे झालेले रुग्णसुद्धा आपल्याला काेराेना हाेत नाही, असा गैरसमज बाळगून काेणतीही खबरदारी घेत नव्हते. मात्र, जिल्ह्यातील दाेन व्यक्तींना दाेनदा काेराेनाची लागण झाली असल्याची माहिती आराेग्य विभागाकडे आहे. त्यामुळे आता काेराेना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येकाने खबरदारी घेण्याची गरज आहे.

बाॅक्स .......

आठ नवीन बाधित तर चार काेराेनामुक्त

गुरुवारी जिल्ह्यात आठ नवीन काेराेनाबाधित आढळून आले, तर चार जणांनी काेराेनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी साेडण्यात आले. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या नऊ हजार ४९० झाली आहे. त्यापैकी नऊ हजार ३११ जणांनी काेराेनावर मात केली आहे. ७४ बाधितांवर उपचार सुरू आहेत. १०५ जणांचा काेराेनामुळे मृत्यू झाला आहे. रुग्ण बरे हाेण्याचे प्रमाण ९८.११ टक्के, क्रियाशील रुग्णांचे प्रमाण ०.७८ टक्के, तर मृत्युदर १.११ टक्के झाला आहे. नवीन बाधितांमध्ये गडचिराेली शहरातील गांधी वाॅर्ड १, कन्नमवारनगर १, आयटीआय चाैक १, काेटगल १, चामाेर्शी तालुक्यातील नवाेदय विद्यालय घाेट येथील १ व स्थानिक एका जणाचा समावेश आहे. तसेच मुलचेरा तालुक्यातील विवेकानंदपूर येथील १ रुग्ण व दुसऱ्या एका रुग्णाचा समावेश आहे.