शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेची डोकेदुखी

By admin | Updated: July 21, 2016 01:20 IST

राज्याच्या समाजकल्याण आयुक्तालयाने गेल्या तीन वर्षांपासून मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया आॅनलाईन केली आहे.

लिंक फेलचा फटका : समाजकल्याण विभाग गडचिरोलीत झाला हतबल गडचिरोली : राज्याच्या समाजकल्याण आयुक्तालयाने गेल्या तीन वर्षांपासून मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया आॅनलाईन केली आहे. मात्र गडचिरोली जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे इंटरनेट कनेक्टिव्हीटीचा पूर्णत: बोजवारा उडाला होता. आताही इंटरनेट कनेक्टिव्हीटीमध्ये गती नाही. त्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांना वसतिगृह प्रवेशाचे आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. एकूणच जिल्ह्याच्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी समाजकल्याणच्या वसतिगृहाची सदर आॅनलाईन प्रक्रिया प्रचंड डोकेदुखी ठरली आहे. समाजकल्याण आयुक्त पुणे यांच्या अधिनस्त जिल्हा समाजकल्याण विभागाच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यात एकूण ७ वसतिगृह आहेत. यापैकी ५ वसतिगृहाची प्रवेश क्षमता १०० व २ वसतिगृहाची विद्यार्थी प्रवेश क्षमता प्रत्येकी ७५ आहे. समाजकल्याणच्या सातही वसतिगृहात एकूण ६५० विद्यार्थी प्रवेश क्षमता आहे. समाजकल्याण विभागाच्या वतीने आरमोरी, अहेरी, चामोर्शी येथे प्रत्येकी १ व गडचिरोली शहरात ४ वसतिगृह आहेत. गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण व दुर्गम भागात विज्ञान शाखा व उच्च शिक्षणाची सुविधा नाही. त्यामुळे गरीब, होतकरू व हुशार विद्यार्थ्यांना निवासी राहून शिक्षण घेता यावे, या उद्देशाने राज्य सरकारने समाजकल्याण विभागामार्फत गडचिरोली जिल्ह्यात मागासवर्गीय मुलांसाठी वसतिगृह सुरू केले. तीन वर्षांपूर्वी या वसतिगृहासाठी जिल्हास्तरावरून थेट प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत होती. मात्र सदर प्रवेश प्रक्रियेत अनेक त्रूट्या आढळून आल्या. तसेच काही जणांनी शासनस्तरावर आक्षेपही घेतले. त्यामुळे राज्य सरकारने सन २०१४-१५ पासून वसतिगृहांची प्रवेश प्रक्रिया आॅनलाईन केली. या प्रक्रियेत विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी पुण्यावरूनच जाहीर केली जाते. त्यानंतर समाजकल्याण विभागामार्फत थेट वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. (स्थानिक प्रतिनिधी) कायम निवासी व्यवस्थेअभावी विद्यार्थ्यांची पंचाईत मागासवर्गीय प्रवर्गातील अनेक गुणवंत, होतकरू व हुशार विद्यार्थ्यांनी गडचिरोली शहराच्या नामांकित महाविद्यालयात विज्ञान शाखेला इयत्ता ११ वीत प्रवेश घेतला आहे. काही विद्यार्थी पदवीच्या शिक्षणाला प्रवेश घेतले आहे. मात्र या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती कमजोर असल्याने अनेक विद्यार्थी नातेवाईकांच्या घरी राहून सध्या शिक्षण घेत आहेत. तर ऐपत नसतानाही काही विद्यार्थी भाड्याची खोली करून समुहाने राहत आहेत. सदर प्रवेशित विद्यार्थी वसतिगृह प्रवेशासाठी आॅनलाईन अर्ज करण्याकरिता धावपळ करीत आहेत. वसतिगृह प्रवेशाच्या प्रक्रियेत दिरंगाई होत असल्याने हुशार व गरीब मागासवर्गीय विद्यार्थ्यांची ससेहोलपट होत आहे. नव्या वसतिगृहाला अधीक्षिका व लिपिक हवे राज्य शासनाने गतवर्षी मागासवर्गीय विद्यार्थिनींसाठी गडचिरोली येथे १०० प्रवेश क्षमतेच्या नव्या वसतिगृहास मंजुरी प्रदान केली. गतवर्षी मार्च महिन्यात नव्या वसतिगृहाला भाडे तत्त्वावरील इमारत विसापूर मार्गावर उपलब्ध झाली आहे. त्यानंतर दुसऱ्या शैक्षणिक सत्रापासून या ठिकाणी वसतिगृह सुरू करण्यात आले आहे. सहायक आयुक्त समाजकल्याण यांनी या वसतिगृहात शिपाई व इतर कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. मात्र या वसतिगृहासाठी शासनाने स्वतंत्र अधीक्षक व लिपिकाचे पद मंजूर केले नाही. त्यामुळे या वसतिगृहाच्या अधीक्षिकेचा कारभार गडचिरोली येथील वसतिगृहाच्या एका अधीक्षिकांकडे सोपविण्यात आला आहे. येथे स्वतंत्र अधीक्षिका व लिपिकाची नियुक्ती करणे आवश्यक आहे.