शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

२० वर्षांपासून त्यांना वाढीव मोबदल्याची प्रतीक्षा

By admin | Updated: January 12, 2015 22:50 IST

मागील २० वर्षांपासून औद्योगिक वसाहतीसाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना वाढीव मोबदला मिळालेला नाही. या मोबदल्याची प्रतीक्षेतच २९ पैकी २३ शेतकऱ्यांच्या मृत्यूही झाला.

गडचिरोली : मागील २० वर्षांपासून औद्योगिक वसाहतीसाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना वाढीव मोबदला मिळालेला नाही. या मोबदल्याची प्रतीक्षेतच २९ पैकी २३ शेतकऱ्यांच्या मृत्यूही झाला. आपल्याला वाढीव मोबदला कधी मिळणार याची प्रतीक्षा या शेतकऱ्यांना लागून राहिलेली आहे. गडचिरोली येथील औद्योगिक वसाहतीसाठी शासनाने १९८७-८८ मध्ये शेतकऱ्यांकडून जमिनी घेतल्या. त्यावेळी या जमिनीस ३५ हजार रूपये एकर भाव देण्यात आला होता. त्यानंतर ३७ शेतकऱ्यांपैकी ८ शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली. १ सप्टेंबर १९९४ ला न्यायालयाने शेतकऱ्याच्या बाजुने निकाल दिला. या निकालाचा आधार घेऊन जमीन धारण कायद्याच्या कलम २८ अ नुसार वाढीव दर सर्वांना देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. २० वर्षांचा कालावधी उलटला. मात्र या शेतकऱ्यांना वाढीव मोबदला मिळाला नाही. शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना तडजोडीचे अधिकार दिले होते. २०१३ मध्ये शेतकऱ्यांनी महालोक अदालतीत या प्रकरणाची तडजोड घडवून आणू, अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांना केली होती. मात्र शेतकऱ्यांना त्यानंतरही मोबदला मिळाला नाही. मोबदल्याच्या प्रतीक्षेत असलेल्या २९ पैकी २३ शेतकऱ्यांचा आता मृत्यू झाला आहे. उर्वरित सहा शेतकरी वृध्दावस्थेत पोहोचले असून आतातरी शासनाने वाढीव मोबदल्याची रक्कम द्यावी, अशी मागणी राजू भोयर, राजू कोटगले आदी शेतकऱ्यांनी केली आहे.