शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

२० वर्षांपासून त्यांना वाढीव मोबदल्याची प्रतीक्षा

By admin | Updated: January 12, 2015 22:50 IST

मागील २० वर्षांपासून औद्योगिक वसाहतीसाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना वाढीव मोबदला मिळालेला नाही. या मोबदल्याची प्रतीक्षेतच २९ पैकी २३ शेतकऱ्यांच्या मृत्यूही झाला.

गडचिरोली : मागील २० वर्षांपासून औद्योगिक वसाहतीसाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना वाढीव मोबदला मिळालेला नाही. या मोबदल्याची प्रतीक्षेतच २९ पैकी २३ शेतकऱ्यांच्या मृत्यूही झाला. आपल्याला वाढीव मोबदला कधी मिळणार याची प्रतीक्षा या शेतकऱ्यांना लागून राहिलेली आहे. गडचिरोली येथील औद्योगिक वसाहतीसाठी शासनाने १९८७-८८ मध्ये शेतकऱ्यांकडून जमिनी घेतल्या. त्यावेळी या जमिनीस ३५ हजार रूपये एकर भाव देण्यात आला होता. त्यानंतर ३७ शेतकऱ्यांपैकी ८ शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली. १ सप्टेंबर १९९४ ला न्यायालयाने शेतकऱ्याच्या बाजुने निकाल दिला. या निकालाचा आधार घेऊन जमीन धारण कायद्याच्या कलम २८ अ नुसार वाढीव दर सर्वांना देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. २० वर्षांचा कालावधी उलटला. मात्र या शेतकऱ्यांना वाढीव मोबदला मिळाला नाही. शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना तडजोडीचे अधिकार दिले होते. २०१३ मध्ये शेतकऱ्यांनी महालोक अदालतीत या प्रकरणाची तडजोड घडवून आणू, अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांना केली होती. मात्र शेतकऱ्यांना त्यानंतरही मोबदला मिळाला नाही. मोबदल्याच्या प्रतीक्षेत असलेल्या २९ पैकी २३ शेतकऱ्यांचा आता मृत्यू झाला आहे. उर्वरित सहा शेतकरी वृध्दावस्थेत पोहोचले असून आतातरी शासनाने वाढीव मोबदल्याची रक्कम द्यावी, अशी मागणी राजू भोयर, राजू कोटगले आदी शेतकऱ्यांनी केली आहे.