शहरं
Join us  
Trending Stories
1
महसूल मंत्र्यांचा दुय्यम निबंधक कार्यालयातच छापा; अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये आढळले पैसे
2
संपादकीय: ...आता थेट मुकाबला ! आनंदाचा शिधा देणार नसले, तरी... 
3
आजचे राशीभविष्य- ७ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस शुभ फलदायी, 'या' राशींची होणार भरभराट!
4
सरन्यायाधीशांवर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न ; ‘सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही’ अशा घोषणा देत कोर्ट सुरू असतानाच केला हल्ला 
5
कोणत्या नगरपरिषद, नगरपंचायतीसाठी कोणते आरक्षण; सोडत निकाल वाचा एका क्लिकवर... 
6
वांगचूक यांना अटक; केंद्र सरकार, लडाखला नोटीस; तत्काळ सुटका करण्याची सर्वोच्च न्यायालयात मागणी 
7
बिहार विधानसभेचा बिगुल अखेर वाजला; दोन टप्प्यांत मतदान, तर १४ नोव्हेंबरला निकाल   
8
मुंबई महापालिकेची अंतिम प्रभागरचना मंजूर; निवडणूक प्रक्रियेला वेग, मतदार याद्यांची प्रतीक्षा 
9
२४७ नगरपरिषदांमध्ये १२५ नगराध्यक्षपदे महिलांसाठी; तर १४७ नगरपंचायतींमध्ये ७३ महिलांसाठी राखीव 
10
ब्रुनको, रॅम्सडेल व साकागुची यांना मेडिसिनचे नोबेल; टी-पेशींचा शोध, कर्करोग आणि मधुमेहावर उपयुक्त
11
७ कोटींच्या घरांना ग्राहक मिळाले नाहीत, तर म्हाडा घरे भाड्याने देणार
12
अमेरिकन गरुड, चिनी ड्रॅगन आणि भारतीय हत्ती!
13
लादेनच्या डोक्यात अमेरिकी नेव्ही सीलनेच गोळी झाडली होती, हे इतिहास विसरणार नाही : ट्रम्प
14
चंद्रभ्रमंती करून ‘स्पेस फ्लाइट’ने घरी परत याल, तेव्हा...
15
तरुणाई ठरवणार बिहारचा मुख्यमंत्री?
16
विशेष न्यायालयाचा दोघांची सुटका करण्यास नकार; बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण, सरकारी वकिलांची माहिती  
17
अपहरण केले, पण चांगले खायला दिले; दिलीप खेडकरचा असाही बचावात्मक पवित्रा
18
परप्लेक्सिटीचा तांत्रिक बिघाड सोडवला, १ कोटीची नोकरी मिळाली; पालघर जिल्ह्यातल्या जितेंद्रची झाली निवड
19
पालकांचा सांभाळ मुलांनी केलाच पाहिजे; बक्षिसपत्राविषयी उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
20
अतिवृष्टीचे निकष बदलून शेतकऱ्यांना करणार मदत; बुजलेल्या विहिरींनाही मदतीचा प्रस्ताव

२० वर्षांपासून त्यांना वाढीव मोबदल्याची प्रतीक्षा

By admin | Updated: January 12, 2015 22:50 IST

मागील २० वर्षांपासून औद्योगिक वसाहतीसाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना वाढीव मोबदला मिळालेला नाही. या मोबदल्याची प्रतीक्षेतच २९ पैकी २३ शेतकऱ्यांच्या मृत्यूही झाला.

गडचिरोली : मागील २० वर्षांपासून औद्योगिक वसाहतीसाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना वाढीव मोबदला मिळालेला नाही. या मोबदल्याची प्रतीक्षेतच २९ पैकी २३ शेतकऱ्यांच्या मृत्यूही झाला. आपल्याला वाढीव मोबदला कधी मिळणार याची प्रतीक्षा या शेतकऱ्यांना लागून राहिलेली आहे. गडचिरोली येथील औद्योगिक वसाहतीसाठी शासनाने १९८७-८८ मध्ये शेतकऱ्यांकडून जमिनी घेतल्या. त्यावेळी या जमिनीस ३५ हजार रूपये एकर भाव देण्यात आला होता. त्यानंतर ३७ शेतकऱ्यांपैकी ८ शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली. १ सप्टेंबर १९९४ ला न्यायालयाने शेतकऱ्याच्या बाजुने निकाल दिला. या निकालाचा आधार घेऊन जमीन धारण कायद्याच्या कलम २८ अ नुसार वाढीव दर सर्वांना देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. २० वर्षांचा कालावधी उलटला. मात्र या शेतकऱ्यांना वाढीव मोबदला मिळाला नाही. शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना तडजोडीचे अधिकार दिले होते. २०१३ मध्ये शेतकऱ्यांनी महालोक अदालतीत या प्रकरणाची तडजोड घडवून आणू, अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांना केली होती. मात्र शेतकऱ्यांना त्यानंतरही मोबदला मिळाला नाही. मोबदल्याच्या प्रतीक्षेत असलेल्या २९ पैकी २३ शेतकऱ्यांचा आता मृत्यू झाला आहे. उर्वरित सहा शेतकरी वृध्दावस्थेत पोहोचले असून आतातरी शासनाने वाढीव मोबदल्याची रक्कम द्यावी, अशी मागणी राजू भोयर, राजू कोटगले आदी शेतकऱ्यांनी केली आहे.