शहरं
Join us  
Trending Stories
1
नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर, सोमय्यांच्या पुत्राला भाजपकडून उमेदवारी; वॉर्डही ठरले, एबी फॉर्मचे वाटप सुरू
2
अखेर ठरलं! दोन्ही राष्ट्रवादी महापालिकेत एकत्र लढणार; अजित पवार यांची घोषणा
3
काळजाचा थरकाप! पती-पत्नीने जंगलात प्रवास थांबविला; ५ वर्षांचा चिमुरडा रात्रभर मृतदेहांपाशी बसून राखण करत होता
4
नव्या वर्षात लोकलप्रवास होणार अधिक वेगवान; ७४९ नव्या लोकल फेऱ्या; १३३ मेल-एक्सप्रेस धावणार
5
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex मध्ये १०० अंकांची तेजी; Hindustan Copper सुस्साट
6
बांगलादेशात आंदोलकांना मोठा धक्का! सेव्हन सिस्टर्सच्या मास्टरमाईंडनेच साथ सोडली, विद्यार्थी नेते सत्तेसाठी हपापले...
7
थंडीत बाईक चालवताय, मग अँटी-फॉग वाइझर हेल्मेट वापरुन पाहा ना; काय आहे खास, जाणून घ्या
8
तुम्ही तुमचा स्मार्टफोन कसा ठेवता? उलटा की सुलटा... ९९ टक्के भारतीय अनभिज्ञ...
9
मंगेश काळोखे हत्या; चोवीस तासांत नऊ जेरबंद; सर्व आरोपींना ४ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी
10
हात-पाय बांधले, हत्या केली अन् चेहरा जाळला; नोएडातील डंपिंग ग्राऊंडवर तरुणीचा छिन्नविच्छिन्न देह सापडला!
11
Gold Silver Price: खिशाला लागणार कात्री! नवीन वर्ष २०२६ मध्ये चांदी ₹३ लाख आणि सोनं ₹१.६० लाखांच्या पार जाणार?
12
मुस्लिम कार्यकर्त्याचं स्वागत करणं ब्रिटीश पंतप्रधानांना पडलं महागात; कीर स्टार्मर यांच्यावर चहुबाजूंनी टीकेची झोड!
13
काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, पण वर्षा गायकवाड कुठे दिसल्या नाहीत; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
14
‘वंचित’ला ठाकरेंची साथ, भाजपा वगळून शिंदे-अजितदादा एकत्र; राज्यात युती, आघाडीचे काय चित्र?
15
‘ते मरावेत’, असं झेलेन्स्की यांना का वाटतं?
16
भीषण काळरात्र! टाटा नगर-एर्नाकुलम एक्स्प्रेसमध्ये आग; एकाचा होरपळून मृत्यू, दोन डबे खाक!
17
आजचा दिवस रेल्वे अपघातांचा! जेव्हा टाटानगर एक्स्प्रेस जळत होती, तेव्हा जगाच्या या कोपऱ्यात ट्रेन घसरली, १३ जणांचा मृत्यू
18
'ऑपरेशन सिंदूर' वेळी भारताला समजावण्यासाठी हे दोन देश आले होते, युद्धविरामवर पाकिस्तानचा दावा
19
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी; DCM एकनाथ शिंदेंनी दिले आदेश
20
भारतासाठी इशाऱ्याची घंटा; बांगलादेश हा केवळ शेजारी देश नाही, तर... 
Daily Top 2Weekly Top 5

वीज बिलात सवलत घ्या

By admin | Updated: June 29, 2014 23:55 IST

शेतकऱ्यांवरील थकबाकीचा बोजा कमी करण्याच्या दृष्टीने व थकबाकीची वसूली प्रभावीरित्या करण्याकरिता शासन विद्युत वितरण कंपनीच्या माध्यमातून गरीब व पीडित शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन

कृषी संजीवनी योजना : बिल थकबाकी शेतकऱ्यांना कृषी सभापतींचे आवाहनगडचिरोली : शेतकऱ्यांवरील थकबाकीचा बोजा कमी करण्याच्या दृष्टीने व थकबाकीची वसूली प्रभावीरित्या करण्याकरिता शासन विद्युत वितरण कंपनीच्या माध्यमातून गरीब व पीडित शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन वीज बिल थकबाकीत सवलत देत आहे. त्यानुसार कृषी संजीवनी योजना राज्यात लागू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी वीज बिल थकबाकीत सवलत घ्यावी, असे आवाहन जि. प. चे कृषी सभापती अतुल गण्यारपवार यांनी केले. कृषी संजीवनी योजनेअंतर्गत मार्च २०१४ पर्यंत मूळ रक्क मेची ५० टक्के रक्कम एकरकमी किंवा ३ मासिक हप्त्यात उरलेली ५० टक्के मूळ थकीत रक्कम शासनातर्फे अदा करण्यात येते. तसेच योजनेत भाग घेणाऱ्या कृषी ग्राहकांचे मार्च २०१४ रोजी थकीत असलेले पूर्ण व्याज व दंड महावितरणतर्फे माफ केले जाते. कृषी ग्राहकांना ५० टक्के मूळ थकबाकीची रक्कम, आॅगस्ट पर्यंत २० टक्के, सप्टेंबर २० तर आॅक्टोबर २०१४ पर्यंत १० टक्के कमीतकमी रक्कम भरावी लागणार आहे किंवा ५० टक्के मुळ थकबाकी रक्कम एकरक्कमी आॅगस्टपूर्वी भरता येऊ शक ते. योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना एप्रिलनंतर चालू बिल पूर्णपणे भरणे आवश्यक करण्यात आले आहे.मार्च २०१४ रोजी जे ग्राहक थकबाकीदार राहणार नाही. अशांना पुढील २ त्रैमासिक बिले ५० टक्के माफ करण्यात येतील व माफ केलेली रक्कम शासनातर्फे विद्युत कंपनीला अदा केली जाईल. ज्या शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घेतला नाही किंवा योजनेअंतर्गत ठरविण्यात आलेल्या रक्कमेचा भरणा केला नाही अशा ग्राहकांना अपात्र ठरविले जाते. ग्रामसभा, ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती जिल्हा परिषदेचे लोकप्रतिनिधींकडून सदर योजनेची माहिती शेतकऱ्यांना मिळू शकते. शेतकऱ्यांना कृषी संजीवनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जि.प. चे कृषी, पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती सभापती अतुल गण्यारपवार यांनी केले. (शहर प्रतिनिधी)