शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

वेळेपूर्वीच कापूस करपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 21:51 IST

आॅगस्ट महिन्यापासून पावसाने उसंत घेतल्याने याचा फार मोठा परिणाम कापूस पिकावर झाला आहे. वेळेपूर्वीच कापूस करपण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ठळक मुद्देउत्पादनावर होणार परिणाम : मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी वाढले होते क्षेत्र

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आॅगस्ट महिन्यापासून पावसाने उसंत घेतल्याने याचा फार मोठा परिणाम कापूस पिकावर झाला आहे. वेळेपूर्वीच कापूस करपण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.गडचिरोली जिल्ह्यात धान पिकाची सर्वाधिक लागवड केली जाते. मात्र ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही, असे शेतकरी कापूस व सोयाबिन या पिकांची लागवड करतात. पाच वर्षांपूर्वी कोरडवाहू जमिनीत सोयाबिन पिकाचीच लागवड केली जात होती. मात्र सोयाबिनचे उत्पादन कमी होऊन दरवर्षी शेतकºयांना तोटा सहन करावा लागत होता. त्यामुळे सोयाबिन उत्पादक शेतकरी आता कापूस पिकाकडे वळला आहे. विशेष करून गडचिरोली, चामोर्शी, मुलचेरा, सिरोंचा या तालुक्यातील शेतकरी कापूस पिकाची लागवड करीत आहे. मागील वर्षी कापूस पिकासाठी चांगले वातावरण होते. त्यामुळे अपेक्षेपेक्षा अधिक उत्पादन झाले होते. यामुळे इतरही शेतकऱ्यांना प्रेरणा मिळून त्यांनी इतर सर्व पिकांना फाटा देत कापूस पिकाची लागवड केली होती. मात्र यावर्षी कापसानेही दगा दिला आहे.पावसाळ्याच्या सुरूवातीला दरदिवशी पाऊस पडत असल्याने कापूस पिकाची वाढ खुंटली होती. त्यानंतर आॅगस्ट महिन्यानंतर पावसाने कायमची उसंत घेतली आहे. आॅगस्ट महिन्यापासून कापसाला बोंड येण्यास सुरूवात झाली होती.सप्टेंबर किंवा आॅक्टोबर महिन्यात एखादा पाऊस येणे आवश्यक होते. मात्र पाऊस झाला नाही. परिणामी जमिनीतील ओलावा कमी होऊन कापूस करपण्यास सुरूवात झाली आहे. कापसाचे जवळपास तीन तोडे केले जातात. शेवटचा तोडा फेब्रुवारी ते मार्च महिन्यात केला जातो. यावर्षी मात्र नोव्हेंबर महिन्यातच पाऊस करपण्यास सुरूवात झाली आहे. डिसेंबर महिन्यात कापूस पूर्णपणे करपणार आहे.परिणामी तिसरा तोडा होणार नसल्याने कापसाच्या उत्पादनात कमालीची घट येणार आहे. काही शेतकऱ्यांचा तर खर्चही भरून निघणे कठीण होणार असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.कापूस खरेदी केंद्र आवश्यकगडचिरोली जिल्ह्यात जवळपास १० हजार पेक्षा अधिक हेक्टर क्षेत्रावर कापूस पिकाची लागवड केली जाते. आधुनिक तंत्रज्ञान व साधन सामग्रीचा वापर करून शेती केली जात असल्याने दरवर्षी कापसाखालील क्षेत्र वाढत चालले आहे. मात्र कापूस विक्रीची कोणतीच सुविधा गडचिरोली जिल्ह्यात उपलब्ध नाही. परिणामी कापूस खासगी व्यापाऱ्याला विकावे लागते. बाजारपेठेतील कापसाचा भाव व व्यापाऱ्याकडून दिला जाणारा कापसाचा भाव यामध्ये फार मोठी तफावत राहते. मात्र पर्याय नसल्याने व्यापाऱ्यालाच कापूस विकावा लागते. चामोर्शी, सिरोंचा तालुक्यातील शेतकरी तेलंगणा राज्यात विक्री करतात. तेलंगणा राज्यातील व्यापारी कापूस खरेदीसाठी सिरोंचा तालुक्यात दाखल होतात. शासनाने धान खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून होत असली तरी याकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे.

टॅग्स :cottonकापूस