शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

वेळेपूर्वीच कापूस करपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 21:51 IST

आॅगस्ट महिन्यापासून पावसाने उसंत घेतल्याने याचा फार मोठा परिणाम कापूस पिकावर झाला आहे. वेळेपूर्वीच कापूस करपण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ठळक मुद्देउत्पादनावर होणार परिणाम : मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी वाढले होते क्षेत्र

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आॅगस्ट महिन्यापासून पावसाने उसंत घेतल्याने याचा फार मोठा परिणाम कापूस पिकावर झाला आहे. वेळेपूर्वीच कापूस करपण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.गडचिरोली जिल्ह्यात धान पिकाची सर्वाधिक लागवड केली जाते. मात्र ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही, असे शेतकरी कापूस व सोयाबिन या पिकांची लागवड करतात. पाच वर्षांपूर्वी कोरडवाहू जमिनीत सोयाबिन पिकाचीच लागवड केली जात होती. मात्र सोयाबिनचे उत्पादन कमी होऊन दरवर्षी शेतकºयांना तोटा सहन करावा लागत होता. त्यामुळे सोयाबिन उत्पादक शेतकरी आता कापूस पिकाकडे वळला आहे. विशेष करून गडचिरोली, चामोर्शी, मुलचेरा, सिरोंचा या तालुक्यातील शेतकरी कापूस पिकाची लागवड करीत आहे. मागील वर्षी कापूस पिकासाठी चांगले वातावरण होते. त्यामुळे अपेक्षेपेक्षा अधिक उत्पादन झाले होते. यामुळे इतरही शेतकऱ्यांना प्रेरणा मिळून त्यांनी इतर सर्व पिकांना फाटा देत कापूस पिकाची लागवड केली होती. मात्र यावर्षी कापसानेही दगा दिला आहे.पावसाळ्याच्या सुरूवातीला दरदिवशी पाऊस पडत असल्याने कापूस पिकाची वाढ खुंटली होती. त्यानंतर आॅगस्ट महिन्यानंतर पावसाने कायमची उसंत घेतली आहे. आॅगस्ट महिन्यापासून कापसाला बोंड येण्यास सुरूवात झाली होती.सप्टेंबर किंवा आॅक्टोबर महिन्यात एखादा पाऊस येणे आवश्यक होते. मात्र पाऊस झाला नाही. परिणामी जमिनीतील ओलावा कमी होऊन कापूस करपण्यास सुरूवात झाली आहे. कापसाचे जवळपास तीन तोडे केले जातात. शेवटचा तोडा फेब्रुवारी ते मार्च महिन्यात केला जातो. यावर्षी मात्र नोव्हेंबर महिन्यातच पाऊस करपण्यास सुरूवात झाली आहे. डिसेंबर महिन्यात कापूस पूर्णपणे करपणार आहे.परिणामी तिसरा तोडा होणार नसल्याने कापसाच्या उत्पादनात कमालीची घट येणार आहे. काही शेतकऱ्यांचा तर खर्चही भरून निघणे कठीण होणार असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.कापूस खरेदी केंद्र आवश्यकगडचिरोली जिल्ह्यात जवळपास १० हजार पेक्षा अधिक हेक्टर क्षेत्रावर कापूस पिकाची लागवड केली जाते. आधुनिक तंत्रज्ञान व साधन सामग्रीचा वापर करून शेती केली जात असल्याने दरवर्षी कापसाखालील क्षेत्र वाढत चालले आहे. मात्र कापूस विक्रीची कोणतीच सुविधा गडचिरोली जिल्ह्यात उपलब्ध नाही. परिणामी कापूस खासगी व्यापाऱ्याला विकावे लागते. बाजारपेठेतील कापसाचा भाव व व्यापाऱ्याकडून दिला जाणारा कापसाचा भाव यामध्ये फार मोठी तफावत राहते. मात्र पर्याय नसल्याने व्यापाऱ्यालाच कापूस विकावा लागते. चामोर्शी, सिरोंचा तालुक्यातील शेतकरी तेलंगणा राज्यात विक्री करतात. तेलंगणा राज्यातील व्यापारी कापूस खरेदीसाठी सिरोंचा तालुक्यात दाखल होतात. शासनाने धान खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून होत असली तरी याकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे.

टॅग्स :cottonकापूस