शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
3
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
4
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
5
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
6
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
7
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
8
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
9
गणवेशावरून चिडवलं, घरी येताच चौथीत शिकणाऱ्या प्रशांतने...; आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली
10
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
11
Meesho च्या शेअरला अपर सर्किट; इश्यू प्राईजच्या दुप्पट झाली किंमत, सह-संस्थापक बनले अब्जाधीश
12
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
13
विराट-अनुष्काने घेतली प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा, गळ्यात तुळशी माळ; जाणून घ्या त्याचे महत्व
14
Payal Gaming: कोण आहे पायल गेमिंग? १.२० मिनटांचा MMS लीक झाल्यानंतर आली चर्चेत!
15
Video: BJP आमदाराच्या मुलाचा शाही विवाह सोहळा; तब्बल ७० लाखांच्या फटाक्यांची केली आतषबाजी
16
ओला-उबरला टक्कर! १ जानेवारीपासून 'भारत टॅक्सी' ॲप होणार लाँच; प्रवाशांना स्वस्त प्रवास आणि ड्रायव्हर्सची होणार जास्त कमाई
17
लग्नानंतर एका वर्षात शोभिता धुलिपाला देणार गुडन्यूज? सासरे नागार्जुन म्हणाले, "योग्य वेळ..."
18
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
19
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
20
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘हमण हावण छत्तीसगढिया, बासी खाथन सबले बढिया’; आदिवासी छत्तीसगडी लोकांची ‘बासी’ला पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2023 08:00 IST

Gadchiroli News उन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला थंड ठेवण्यासाठी छत्तीसगड राज्यातील बहुतांश नागरिक आवडीने बासी या अन्नाचे सेवन करतात. कोरची तालुका सीमेलगत असल्यामुळे कोरची तालुक्यातील नागरिक सुद्धा बासीचे सेवन करीत आहेत.

लिकेश अंबादे

गडचिरोली : छत्तीसगड या राज्याला जोडणारा सीमेलगतचा काेरची तालुका आहे. त्यामुळे शेजारील राज्यातील छत्तीसगडी नागरिकांचे वास्तव्य तालुक्यात अधिक आहे. उन्हाळ्याच्या दिवसात बासी या खाद्यपदार्थाचे सेवन करतात. तेच कोरची तालुक्यात शेकडो वर्षांपासून बासीचे सेवन करीत आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला थंड ठेवण्यासाठी छत्तीसगड राज्यातील बहुतांश नागरिक आवडीने बासी या अन्नाचे सेवन करतात. कोरची तालुका सीमेलगत असल्यामुळे कोरची तालुक्यातील नागरिक सुद्धा बासीचे सेवन करीत आहेत.

बासी म्हणजे काय?

बासी म्हणजे रात्र जेवणानंतर जे शिळा भात उरलेला असते किंवा बासी बनविण्यासाठी जास्तीच बनविलेला भात असतो. त्यात भात शिजविताना जे जास्तीचे पाणी आपण बाहेर काढतो ते साधे पाणी घालून व थोडे मीठ घालून रात्रभर भिजवून ठेवलेले खाद्य असते. ते म्हणजे बासी होय. ज्याचे सेवन खास करून उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी तसेच सारखी तहान लागू नये याकरिता व सकाळचे जेवणाचे खर्च व त्रास वाचविण्यासाठी केल्या जाते.

 

बासी खाण्याचे फायदे ...

बासीमुळे जी भूक असते तीही मिटते आणि दुसरे म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात ४० डिग्री सेल्सिअस तापमानाच्या वर पारा चढतो तेव्हा नागरिकांना पाण्याची तहान व थंड पाण्याची सारखी गरज भासते. अशावेळी बासी पाणी पिल्याने ते मिटते, तसेच तहान भागविण्याचे व शरीराला थंड ठेवण्याचे कामही करते.

बासी सेवन करण्याची पद्धत

बासी सोबत आपण आंब्याच्या ठेचा, लोणचं सुद्धा खाऊ शकतो किंवा बासी सोबत आपण हिरवी भाजी खाऊ शकतो. ती खाण्यासाठी अतिशय चविष्ट व पोषक असते. उन्हाळ्याच्या दिवसात श्रीमंत लोक शरीराला थंडावा देण्यासाठी लस्सी, कोल्ड्रिंक्स, लिंबू सरबत, उसाचा रस, आमरस अशा विविध खर्चिक शीतपेयांचे सेवन करतात. याउलट गरीब नागरिक, शेतमजूर, आदिवासी रोजगार हातावर पोट भरणारे लाेक दोन पैशांची बचत करण्यासाठी रात्रीच्या जेवणात अधिकचे अन्न शिजवून त्या अन्नाचे बासीत रूपांतर करून बासी या अन्नाचे सेवन करतात.

होळीचा सण करून बासी खाण्यास सुरुवात करतो कारण उन्हाचा पारा होळी सणापासून चढायला सुरुवात होते. बासी शरीराला थंडावा देते, वारंवार तहान लागत नाही. शरीराला ऊर्जा देते. भात, भाजी-पोळी खाल्यास उन्हाळी लागते. खूप गर्मी जाणवते.

- जोहारी मिलवू घुगवा, वाॅर्ड नंबर ०४, कोरची.

टॅग्स :foodअन्न