शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
2
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
3
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
4
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
5
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
6
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
7
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
8
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
9
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
10
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
11
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
12
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
13
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
14
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
15
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
16
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
17
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
18
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
19
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
20
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा

अर्धवट पुलाने रहदारीस अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 01:07 IST

एटापल्ली ते भामरागड या दोन तालुकास्थळातील अंतर ७० ते ७५ किमी आहे. हे ७५ किमीचे अंतर गाठण्यासाठी कोठी ते गट्टादरम्यान दोन पुलाचे बांधकाम हाती घेण्यात आले.

ठळक मुद्देकोठी व गट्टा भागातील वास्तव : एटापल्ली-भामरागड तालुक्याचा थेट संपर्क नाही

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : एटापल्ली ते भामरागड या दोन तालुकास्थळातील अंतर ७० ते ७५ किमी आहे. हे ७५ किमीचे अंतर गाठण्यासाठी कोठी ते गट्टादरम्यान दोन पुलाचे बांधकाम हाती घेण्यात आले. मात्र तब्बल दोन दशकापासून या दोन्ही पुलाचे काम अर्धवट स्थितीत आहे. त्यामुळे या दोन तालुक्याची रहदारी होण्यासाठी प्रचंड अडचण निर्माण झाली आहे. परिणामी या दोन तालुक्याचा थेट संबंध प्रस्तापित होण्यास आडकाठी निर्माण झाली आहे.भामरागड तालुक्यातून एटापल्ली तालुक्यात जाण्यासाठी कोठी व गट्टा हे दोन मोठे गाव पडतात. भामरागडपासून कोठी हे गाव २० किमी अंतरावर आहे. कोठीपर्यंत नियमितपणे अहेरीवरून राज्य परिवहन महामंडळाची बस सेवा सुरू आहे. तर अहेरी, एटापल्लीवरून गट्टापर्यंत ३५ ते ४० किमी अंतरापर्यंत बससेवा नियमितपणे सुरू आहे. केवळ गट्टा-कोठी दरम्यान १५ ते १८ किमी रस्त्यामध्ये दोन पुलाचे बांधकाम रखडले आहे. त्यामुळे एटापल्ली ते भामरागड या दोन तालुक्याचा संपर्क मार्गात वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. उन्हाळ्यात पेपरमिल सुरू होताच रस्त्याची दुरूस्ती केली जाते. अन्यथा १२ महिने सदर रस्त्यावरील वाहतूक बंद राहते. त्यामुळे आलापल्लीवरून एटापल्लीला जाण्यासाठी अधिकचे अंतर कापावे लागते. कोठी व गट्टा या दोन नाल्यावरील पुलाच्या बांधकामास सन १९९६-९७ मध्ये मंजुरी मिळाली. बीआरओच्या माध्यमातून या पुलाचे काम सुरू करण्यात आले. बीआरओ निघून गेल्यानंतर या पुलाचे बांधकाम पुन्हा हाती घेण्यात आले नाही. यानंतर सदर पुलाच्या बांधकामाबाबत प्रशासनाने पुढाकार घेतला नाही. एकूणच रस्ता व पूल निर्मितीच्या कामात भामरागड तालुक्यावर सातत्याने अन्याय होत आहे.नागरिकांवर पडतो आर्थिक भुर्दंडकोठी-गट्टा दरम्यान मार्गावरील दोन्ही पुलाचे काम गेल्या दोन दशकापासून अर्धवट स्थितीत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना भामरागड व एटापल्लीला येण्यासाठी अधिकचे अंतर कापून यावे लागते. यासाठी प्रवासापोटी अधिक पैसे मोजावे लागतात. कोठी ते एटापल्ली मार्गावरील कारमपल्ली, हलवेर, कोयर, पिडमिली आदी परिसरातील नागरिकांना आलापल्लीवरून अधिकचे अंतर कापून तालुका मुख्यालयी यावे लागते. तसेच गट्टा, जांभिया, अडेंगा, सुरजागड, मंगेर, हेडरी, नेंडेर, परसलगोंदी, आलदंडी, तुमरगुंडा, वांगेतुरी, तोडगट्टा, आरेवाडा परिसरातील नागरिकांना एटापल्ली, आलापल्लीवरून भामरागडला यावे लागते.