शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
6
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
7
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
8
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
9
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
10
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
12
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
13
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
14
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
15
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
16
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
17
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
18
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
20
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
Daily Top 2Weekly Top 5

रामाळा मिश्र रोपवनातील निम्मे रोपे नष्ट

By admin | Updated: February 12, 2015 01:08 IST

ज्या ठिकाणी जंगलाची घनता जास्त आहे, त्या ठिकाणचे झुडुपी झाडे तोडून मानवीकृत मिश्र रोपवन तयार करण्याच्या उपक्रमामुळे जंगलाचे संवर्धन होणे आवश्यक होते.

लोकमत विशेषप्रदीप बोडणे वैरागडज्या ठिकाणी जंगलाची घनता जास्त आहे, त्या ठिकाणचे झुडुपी झाडे तोडून मानवीकृत मिश्र रोपवन तयार करण्याच्या उपक्रमामुळे जंगलाचे संवर्धन होणे आवश्यक होते. मात्र पर्यावरणाची हानीच झाली. वडसा वन विभागांतर्गत येणाऱ्या रामाळा मिश्र रोप वनातील निम्मे रोपे वर्षभरात नष्ट झाली. या मिश्र रोपवनात जी झाडे सध्या उभी आहेत, त्या आरक्षीत जंगलात रोज मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड सुरू आहे. मात्र याकडे वन विभागाचे दुर्लक्ष होत आहे.शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत प्रशासनाच्या वतीने जिल्हाभरात अनेक ठिकाणी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम दरवर्षी राबविल्या जातो. या कामात शासनाचा लाखो रूपयांचा खर्चही झाला आहे. मात्र लागवड केलेल्या वृक्षांच्या संवर्धनाकडे वन विभाग तसेच संबंधित सर्व विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने लावलेली रोप मोठी होण्यापूर्वीच नष्ट होत असल्याचे दिसून येत आहे. असाच प्रकार वडसा वन विभागांतर्गत आरमोरी वनपरिक्षेत्राच्या हद्दीत असलेल्या रामाळा मिश्र वनरोपवनात दिसून येत आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत रामाळा बिटात कक्ष क्र. ४० मधील १५ हेक्टर वनक्षेत्रात सन २०१२-१३ या वर्षात १६ हजार ५०० रोपांची लागवड करण्यात आली. मात्र या रोपांच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष झाल्याने या मिश्र रोपवनातील निम्मे रोप नष्ट झाल्याची खात्रीलायक माहिती आहे. कोणतेही रोपवन तयार करण्याचा पाच वर्ष कालावधीचा कार्यक्रम होतो. पहिल्या वर्षात रोपांची लागवड करणे, नंतर ज्या ठिकाणी रोप पाण्याअभावी, गुरांच्या खुराने तसेच वनवे लागल्याने किंवा इतर कारणांनी नष्ट होतात. त्या ठिकाणी नवीन रोपांची लागवड केली जाते. रामाळा येथील मिश्र रोपवनात २०१२ च्या ८ आॅगस्टपासून वृक्ष लागवडीचे काम सुरू झाले. तीन वर्षात या रोपवनातील निम्मे वृक्ष नष्ट झाली, हे विशेष. मिश्ररोप वन क्षेत्र आरक्षित असताना देखील जळाऊ लाकडांची विक्री करणारे लोक या जंगलात मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड करीत आहेत. मात्र या वृक्षतोडीकडे वन विभागाचे पूर्णत: दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. वन विभागाने लाखो रूपये खर्च करून तयार केलेल्या अनेक मानवीकृत रोपवाटिका व मिश्र रोपवनाची अशीच स्थिती आहे. नैसर्गिकरित्या घनदाट जंगले विरळ करून त्यात नव्याने रोपे लावली जातात. यामुळे नैसर्गिकरित्या उभे असलेले जंगलातील झाडे नष्ट होतात. याशिवाय मानवीकृत लावलेले रोपही संवर्धनाअभावी नष्ट होत आहेत. नियोजनाचा अभाव, देखभाल व संवर्धनाकडे पूर्णत: दुर्लक्ष झाल्याने जिल्ह्यातील अनेक भागातील जंगले झपाट्याने नष्ट होत आहेत. शासनाची शतकोटी वृक्ष लागवड योजना फसली असून असाच प्रकार मिश्र रोपवनाच्या बाबतीत घडत आहे. यामुळे वन्यजीव व निसर्ग प्रेमींनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे.