शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
5
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
6
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
7
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
8
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
9
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
10
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
11
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
12
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
13
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
14
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
15
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
16
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
17
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
18
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
19
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
20
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?

अर्धवट विंिहरी ठरल्या निरूपयोगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 22:27 IST

एटापल्ली तालुक्यातील दुर्गम भागातील पाण्याची टंचाई सोडविण्यासाठी रोजगार हमी योजनेंतर्गत विहीर बांधण्यात आल्या आहेत. मात्र काही विहिरींचे बांधकाम मागील तीन वर्षांपासून अर्धवट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या विहिरींवरील लाखो रूपयांचा खर्च पाण्यात गेला आहे.

ठळक मुद्देलाखोंचा खर्च वाया : विहिरीत पाणी असूनही ते काढता येत नाही

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : एटापल्ली तालुक्यातील दुर्गम भागातील पाण्याची टंचाई सोडविण्यासाठी रोजगार हमी योजनेंतर्गत विहीर बांधण्यात आल्या आहेत. मात्र काही विहिरींचे बांधकाम मागील तीन वर्षांपासून अर्धवट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या विहिरींवरील लाखो रूपयांचा खर्च पाण्यात गेला आहे.एटापल्ली तालुक्यात लाखो रूपये खर्चून रोहयो अंतर्गत विहिरींचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र गट्टा परिसरातील काही गावांमधील विहिरी अपूर्ण आहेत. काही विहिरींचे बांधकाम अगदी तोंडीपर्यंत पोहोचले आहे. एटापल्ली तालुक्यात पाण्याची पातळी चांगली असल्याने या सर्वच विहिरींना भरपूर पाणी आहे. मात्र विहिरींवर व्यस्थित तोंडी बांधण्यात आली नाही. तोंडीवर पाणी काढण्यासाठी आवश्यक असलेले रॉड बसविण्यात आले नाही. त्याचबरोबर विहिरीच्या सभोवताल चबुतरा सुध्दा बनविण्यात आला नाही. परिणामी विहिरीत पाणी असले तरी ते काढणे शक्य होत नाही. त्यामुळे विहिरीत भरपूर पाणी असूनही गावात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. विहिरींचे बांधकाम नेमके कशामुळे अपूर्ण राहिले. याबाबत ग्रामसेवकांना विचारणा केल्यास विहिरीचे पैसे मिळाले नाही. त्यामुळे बांधकाम अपूर्ण असल्याचे सांगून यासाठी पंचायत समिती जबाबदार असल्याचे सांगितले जाते. पंचायत समितीमध्ये विचारणा केल्यास ग्रामपंचायत जबाबदार असल्याचे सांगितले जात आहे. नेमक्या कोणाच्या चुकीमुळे विहिरींचे बांधकाम अपूर्ण राहिले. किंवा या कामामध्ये भ्रष्टाचार झाला आहे काय? हे कळायला मार्ग नाही. दुर्गम भागातील नागरिक विकास कामांबाबत फारशी तक्रार करीत नाही. याचा गैरफायदा प्रशासनातील अधिकारी उचलत असल्याचे दिसून येत आहे.