शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

अर्धवट विंिहरी ठरल्या निरूपयोगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 22:27 IST

एटापल्ली तालुक्यातील दुर्गम भागातील पाण्याची टंचाई सोडविण्यासाठी रोजगार हमी योजनेंतर्गत विहीर बांधण्यात आल्या आहेत. मात्र काही विहिरींचे बांधकाम मागील तीन वर्षांपासून अर्धवट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या विहिरींवरील लाखो रूपयांचा खर्च पाण्यात गेला आहे.

ठळक मुद्देलाखोंचा खर्च वाया : विहिरीत पाणी असूनही ते काढता येत नाही

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : एटापल्ली तालुक्यातील दुर्गम भागातील पाण्याची टंचाई सोडविण्यासाठी रोजगार हमी योजनेंतर्गत विहीर बांधण्यात आल्या आहेत. मात्र काही विहिरींचे बांधकाम मागील तीन वर्षांपासून अर्धवट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या विहिरींवरील लाखो रूपयांचा खर्च पाण्यात गेला आहे.एटापल्ली तालुक्यात लाखो रूपये खर्चून रोहयो अंतर्गत विहिरींचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र गट्टा परिसरातील काही गावांमधील विहिरी अपूर्ण आहेत. काही विहिरींचे बांधकाम अगदी तोंडीपर्यंत पोहोचले आहे. एटापल्ली तालुक्यात पाण्याची पातळी चांगली असल्याने या सर्वच विहिरींना भरपूर पाणी आहे. मात्र विहिरींवर व्यस्थित तोंडी बांधण्यात आली नाही. तोंडीवर पाणी काढण्यासाठी आवश्यक असलेले रॉड बसविण्यात आले नाही. त्याचबरोबर विहिरीच्या सभोवताल चबुतरा सुध्दा बनविण्यात आला नाही. परिणामी विहिरीत पाणी असले तरी ते काढणे शक्य होत नाही. त्यामुळे विहिरीत भरपूर पाणी असूनही गावात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. विहिरींचे बांधकाम नेमके कशामुळे अपूर्ण राहिले. याबाबत ग्रामसेवकांना विचारणा केल्यास विहिरीचे पैसे मिळाले नाही. त्यामुळे बांधकाम अपूर्ण असल्याचे सांगून यासाठी पंचायत समिती जबाबदार असल्याचे सांगितले जाते. पंचायत समितीमध्ये विचारणा केल्यास ग्रामपंचायत जबाबदार असल्याचे सांगितले जात आहे. नेमक्या कोणाच्या चुकीमुळे विहिरींचे बांधकाम अपूर्ण राहिले. किंवा या कामामध्ये भ्रष्टाचार झाला आहे काय? हे कळायला मार्ग नाही. दुर्गम भागातील नागरिक विकास कामांबाबत फारशी तक्रार करीत नाही. याचा गैरफायदा प्रशासनातील अधिकारी उचलत असल्याचे दिसून येत आहे.