शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

अर्धवट विंिहरी ठरल्या निरूपयोगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 22:27 IST

एटापल्ली तालुक्यातील दुर्गम भागातील पाण्याची टंचाई सोडविण्यासाठी रोजगार हमी योजनेंतर्गत विहीर बांधण्यात आल्या आहेत. मात्र काही विहिरींचे बांधकाम मागील तीन वर्षांपासून अर्धवट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या विहिरींवरील लाखो रूपयांचा खर्च पाण्यात गेला आहे.

ठळक मुद्देलाखोंचा खर्च वाया : विहिरीत पाणी असूनही ते काढता येत नाही

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : एटापल्ली तालुक्यातील दुर्गम भागातील पाण्याची टंचाई सोडविण्यासाठी रोजगार हमी योजनेंतर्गत विहीर बांधण्यात आल्या आहेत. मात्र काही विहिरींचे बांधकाम मागील तीन वर्षांपासून अर्धवट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या विहिरींवरील लाखो रूपयांचा खर्च पाण्यात गेला आहे.एटापल्ली तालुक्यात लाखो रूपये खर्चून रोहयो अंतर्गत विहिरींचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र गट्टा परिसरातील काही गावांमधील विहिरी अपूर्ण आहेत. काही विहिरींचे बांधकाम अगदी तोंडीपर्यंत पोहोचले आहे. एटापल्ली तालुक्यात पाण्याची पातळी चांगली असल्याने या सर्वच विहिरींना भरपूर पाणी आहे. मात्र विहिरींवर व्यस्थित तोंडी बांधण्यात आली नाही. तोंडीवर पाणी काढण्यासाठी आवश्यक असलेले रॉड बसविण्यात आले नाही. त्याचबरोबर विहिरीच्या सभोवताल चबुतरा सुध्दा बनविण्यात आला नाही. परिणामी विहिरीत पाणी असले तरी ते काढणे शक्य होत नाही. त्यामुळे विहिरीत भरपूर पाणी असूनही गावात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. विहिरींचे बांधकाम नेमके कशामुळे अपूर्ण राहिले. याबाबत ग्रामसेवकांना विचारणा केल्यास विहिरीचे पैसे मिळाले नाही. त्यामुळे बांधकाम अपूर्ण असल्याचे सांगून यासाठी पंचायत समिती जबाबदार असल्याचे सांगितले जाते. पंचायत समितीमध्ये विचारणा केल्यास ग्रामपंचायत जबाबदार असल्याचे सांगितले जात आहे. नेमक्या कोणाच्या चुकीमुळे विहिरींचे बांधकाम अपूर्ण राहिले. किंवा या कामामध्ये भ्रष्टाचार झाला आहे काय? हे कळायला मार्ग नाही. दुर्गम भागातील नागरिक विकास कामांबाबत फारशी तक्रार करीत नाही. याचा गैरफायदा प्रशासनातील अधिकारी उचलत असल्याचे दिसून येत आहे.