शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
2
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
3
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
4
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
5
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
6
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
7
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
8
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
9
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
10
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
11
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
12
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
13
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
14
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
15
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
16
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
17
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
18
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
19
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
20
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले

गुरूदेवभक्तांची राष्ट्रसंतांना आदरांजली

By admin | Updated: November 1, 2015 01:51 IST

अखिल भारतीय गुरूदेव सेवा मंडळाच्या वतीने शनिवारी पहाटे ५.३० वाजता सामूहिक ध्यानाचा कार्यक्रम गुरूदेव सेवा मंडळाच्या शाखेत पार पडला.

शहरातून काढली रामधून : विविध धर्मांचे प्रतिनिधी कार्यक्रमाला उपस्थितगडचिरोली : अखिल भारतीय गुरूदेव सेवा मंडळाच्या वतीने शनिवारी पहाटे ५.३० वाजता सामूहिक ध्यानाचा कार्यक्रम गुरूदेव सेवा मंडळाच्या शाखेत पार पडला. यावेळी सामूदायिक ध्यानावर अड्याळटेकडीचे प्रा. रतनलाल मौर्य महाराज यांनी आपले विचार प्रगट केले. त्यानंतर सकाळी ६.३० वाजता गडचिरोली शहरातून रामधून काढण्यात आली. दुपारी ३ वाजता सर्वधर्म परिषद घेण्यात आली. यात प्रमुख वक्ते म्हणून शीख समाजाचे प्रतिनिधी मंगलसिंग पटवा, मुस्लीम समाजाचे प्रतिनिधी मौलाना रहिम शेख यांच्यासह गुरूदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. सायंकाळी ४.५८ वाजता राष्ट्रसंतांना मौन आदरांजली वाहण्यात आली. व सर्व संतांचे पुण्यस्मरण यावेळी गुरूदेव भक्तांनी केली. यावेळी भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनाही आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून गुरूदेव सेवा मंडळाचे उपाध्यक्ष अरविंद वासेकर, प्रा. रतनलाल महाराज मौर्य, गुरूदेव सेवा मंडळाचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिवनाथ कुंभारे, डॉ. मुरलीधर बद्दलवार, प्रा. करकाडे, विवेक चडगुलवार, नरेंद्र भरडकर, बी. डी. धकाते, महागुजी बारापात्रे येरमे, गेडाम, राऊत, सुरेश मांडवगडे, पुडके, मांडवगडे यांच्यासह गुरूदेव सेवा मंडळाच्या शाळेचे विद्यार्थी, शहरातील नागरिक, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन पंडित पुडके यांनी केले. गेल्या दोन दिवसांपासून गुरूदेव सेवा मंडळाच्या मुख्य शाखेत कार्यक्रम सुरू आहेत. शहरातही गुरूदेवांना आदरांजली वाहणारे फलक लावण्यात आले आहे. (प्रतिनिधी)