लोकमत न्यूज नेटवर्कमानापूर/देलनवाडी : जिल्ह्याच्या शेकडो हेक्टर शेतातील धानपीक रोग व किडीच्या कचाट्यात सापडले असल्याने कृषी विभागाचे कर्मचारी आता थेट बांधावर जाऊन शेताची पाहणी करीत आहेत. दरम्यान शेतकऱ्यांना कीड व रोगाचे नियंत्रण कसे करावे, याबाबतचा सल्ला देत आहेत.आरमोरी तालुक्याच्या मानापूर, देलनवाडी परिसरात प्रामुख्याने धानपिकाची लागवड केली जाते. या भागातील शेतकºयांनी मोठी धडपड करून यंदा धानपिकाच्या रोवणीचे काम आटोपले. मात्र संततधार पाऊस, वातावरणातील दमटपणा यामुळे अनेक ठिकाणच्या धानपिकावर लष्कर अळी तसेच कडाकरपा व इतर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे जाणवत आहे. सुरूवातीच्या टप्प्यात रोवणी झालेल्या शेतातील धानपीक आता भरण्याच्या मागण्यावर आहेत. मात्र रोगांमुळे त्यावर परिणाम होत आहे. दरम्यान मानापूर, देलनवाडी भागातील कृषी सहायक ज्ञानेश्वर मसराम यांच्यासह इतर कर्मचारी शेताच्या बांधावर जाऊन शेतकºयांना मार्गदर्शन करीत आहेत.शेतकºयांनी रासायनिक खताचा वापर अधिक करू नये, रासायनिक खताच्या वापराला आवर घालावा, तसेच कीड व रोगाच्या नायनाटासाठी कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार कीटकनाशकाची फवारणी करावी, असे कृषी सहायक ज्ञानेश्वर मसराम यांनी शेतकºयांना सांगितले. लष्कर अळीचे पतंग कामगंध सापड्यात आढळून येत असल्याने धानपीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे.
शेतकऱ्यांना थेट बांधावर मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 05:00 IST
आरमोरी तालुक्याच्या मानापूर, देलनवाडी परिसरात प्रामुख्याने धानपिकाची लागवड केली जाते. या भागातील शेतकºयांनी मोठी धडपड करून यंदा धानपिकाच्या रोवणीचे काम आटोपले. मात्र संततधार पाऊस, वातावरणातील दमटपणा यामुळे अनेक ठिकाणच्या धानपिकावर लष्कर अळी तसेच कडाकरपा व इतर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे जाणवत आहे.
शेतकऱ्यांना थेट बांधावर मार्गदर्शन
ठळक मुद्देरासायनिक खत कमी वापरा : धानपिकावरील रोग व कीड नियंत्रणाबाबत सल्ला