शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

किसान गोष्टी कार्यक्रमातून दुबार पिकाविषयी मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 22:27 IST

ही पिके घेण्यासाठी फारशी मशागत करावी लागत नाही. त्यामुळे उत्पादन खर्च कमी होते. शेतकऱ्यांनी या पिकांची लागवड आधुनिक पध्दतीने करावी.

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : तालुक्यातील दामरंचा येथे किसान गोष्टी कार्यक्रमांतर्गत शेतकरी मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात दुबार पीक कसे घ्यावे, या विषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.दामरंचा परिसरात खरीप हंगामात धानपिकाचे उत्पादन घेतले जाते. धानपीक निघाल्यानंतर त्याच शेतात पुन्हा हरभरा, लाखोळी, जवस, उडीद, मुग, ज्वारी आदी पिकांचे उत्पादन घेतले जाते. ही पिके घेण्यासाठी फारशी मशागत करावी लागत नाही. त्यामुळे उत्पादन खर्च कमी होते. शेतकऱ्यांनी या पिकांची लागवड आधुनिक पध्दतीने करावी. तसेच त्याला सेंद्रीय शेतीची जोड द्यावी, या उद्देशाने दामरंचा येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान परिसरातील शेतकऱ्यांना हरभरा व इतर रबी पिकांची लागवड कशी करावी, याबाबत मार्गर्शन करण्यात आले. त्यानंतर शेतकऱ्यांना हरभरा पिकाचे बियाणे वितरित करण्यात आले. तसेच बियाणे कसे वापरावे, याचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. शेतकऱ्यांची अवजारे बँक गावात स्थापन करण्यात आली. या बँकेमुळे गरजू शेतकऱ्याला वेळेवर अवजारे उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, तालुका कृषी अधिकारी दीपक कांबळे, मंडळ कृषी अधिकारी संदेश खरात, बीटीएम अमोल दहागावकर, कृषी सेविका पल्लवी आतला, कृषी मित्र गोमोस, पंचशील महामंडळ बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या. अशा प्रकारच्या कार्यक्रमांमुळे नागरिकांमध्ये शेतीविषयक जनजागृती निर्माण होऊन दरएकरी उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे.