शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

किसान गोष्टी कार्यक्रमातून दुबार पिकाविषयी मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 22:27 IST

ही पिके घेण्यासाठी फारशी मशागत करावी लागत नाही. त्यामुळे उत्पादन खर्च कमी होते. शेतकऱ्यांनी या पिकांची लागवड आधुनिक पध्दतीने करावी.

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : तालुक्यातील दामरंचा येथे किसान गोष्टी कार्यक्रमांतर्गत शेतकरी मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात दुबार पीक कसे घ्यावे, या विषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.दामरंचा परिसरात खरीप हंगामात धानपिकाचे उत्पादन घेतले जाते. धानपीक निघाल्यानंतर त्याच शेतात पुन्हा हरभरा, लाखोळी, जवस, उडीद, मुग, ज्वारी आदी पिकांचे उत्पादन घेतले जाते. ही पिके घेण्यासाठी फारशी मशागत करावी लागत नाही. त्यामुळे उत्पादन खर्च कमी होते. शेतकऱ्यांनी या पिकांची लागवड आधुनिक पध्दतीने करावी. तसेच त्याला सेंद्रीय शेतीची जोड द्यावी, या उद्देशाने दामरंचा येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान परिसरातील शेतकऱ्यांना हरभरा व इतर रबी पिकांची लागवड कशी करावी, याबाबत मार्गर्शन करण्यात आले. त्यानंतर शेतकऱ्यांना हरभरा पिकाचे बियाणे वितरित करण्यात आले. तसेच बियाणे कसे वापरावे, याचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. शेतकऱ्यांची अवजारे बँक गावात स्थापन करण्यात आली. या बँकेमुळे गरजू शेतकऱ्याला वेळेवर अवजारे उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, तालुका कृषी अधिकारी दीपक कांबळे, मंडळ कृषी अधिकारी संदेश खरात, बीटीएम अमोल दहागावकर, कृषी सेविका पल्लवी आतला, कृषी मित्र गोमोस, पंचशील महामंडळ बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या. अशा प्रकारच्या कार्यक्रमांमुळे नागरिकांमध्ये शेतीविषयक जनजागृती निर्माण होऊन दरएकरी उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे.