शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

माणिकगड पहाडावरून गारगोट्यांची तस्करी

By admin | Updated: September 21, 2014 23:51 IST

जिवती तालुक्यातील माणिकगड पहाडावरील जंगल परिसरातून गारगोट्या गोळा करून तस्करी केली जात असल्याची माहिती आहे. सदर गारगोट्या जयपूर, औरंगाबाद आदी मोठ्या शहरांमध्ये नेल्या जात आहे.

पाटण : जिवती तालुक्यातील माणिकगड पहाडावरील जंगल परिसरातून गारगोट्या गोळा करून तस्करी केली जात असल्याची माहिती आहे. सदर गारगोट्या जयपूर, औरंगाबाद आदी मोठ्या शहरांमध्ये नेल्या जात आहे. या परिसरात सोनापूर येथे तपासणी नाका असूनही ही तस्करी सुरूच असल्याने तपासणी नाक्यावरील कर्मचारी करतात तरी काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.तालुक्यातील तुमरीकुडा, नाईकनगर, पाटण, पुन्नागुडा, गणेरी, भाईठार, महाराजगुडा, सेवादासनगर, जिवती आदी परिसरातील जंगलात मोठ्या प्रमाणात गारगोट्या आढळून येतात. या जंगलातील गारगोट्याची अवैधरित्या उचल करून ट्रकद्वारे वाहतूक केली जात आहे. जंगलातील गारगोट्या जमा करण्याकरिता शाळकरी मुलांचाही वापर केला जात असून त्यांना १५० ते २०० रुपये मजुरी दिली जात असल्याची माहिती आहे. जंगल परिसरातील काही नागरिक गारगोट्या गोळा करण्याचे काम करतात. अशा नागरिकांकडून अत्यल्प दराने गारगोट्यांची खरेदी करून ती मोठ्या व्यापाऱ्यांना विक्री केली जात असून याचा मुख्य दलाल गडचांदूर येथील असल्याची माहिती आहे.या परिसरात सोनापूर येथे वनविभागाचा तपासणी नाका आहे. गौणखनिज व वनातील मौल्यवान वस्तूंची तस्करी रोखण्यासाठी येथे कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, याच रस्त्याने गारगोट्यांची तस्करी राजरोसपणे सुरू आहे. ट्रकद्वारे गारगोट्यांची तस्करी सुरू असून पहिल्यांदा गडचांदूर व नंतर तेथून औरंगाबाद, जयपूरसारख्या ठिकाणी या गारगोट्या नेल्या जात आहे. या भागातील बहुतांश वनाधिकारी व कर्मचारी मुख्यालयी न राहता गडचांदूर, राजुरा अथवा चंद्रपूरसारख्या ठिकाणी राहून सेवा बजावत असल्याने या तस्करीवर आळा घालण्यात त्यांना अपयश येत असल्याचे दिसून येत आहे. सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंतच या भागात वनाधिकारी व कर्मचारी कर्तव्यावर राहात असल्याने या तस्करांचे चांगलेच फावत आहे.