शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
5
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
6
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
7
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
8
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
9
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
10
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
11
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
12
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
13
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
14
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
15
जीएसटी कपातीचा फायदा संपत चालला...! एमजीने पहिली घोषणा केली, जानेवारीपासून कारच्या किंमतीत होणार मोठी वाढ
16
जर्मनी दौऱ्यात राहुल गांधींना Rolls-Royce ची भुरळ; भारतात 'ही' लक्झरी कार कितीला मिळते?
17
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
18
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा
19
"उंच भरारी, पण पाय जमिनीवर!" आजारी असताना एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी केली मदत; अमृता खानविलकर भारावली
20
'३ इडियट्स'च्या सीक्वलचे शीर्षक असेल '४ इडियट्स'! आमिर खानच्या सिनेमासाठी निर्माते चौथ्या अभिनेत्याच्या शोधात
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्री संपूर्ण जिल्ह्याचे की, केवळ अहेरीचे

By admin | Updated: January 8, 2015 22:54 IST

राज्य सरकारने नागपूर हिवाळी अधिवेशनानंतर राज्यातील पालकमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली. गडचिरोलीचे पालकमंत्री म्हणून राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांची वर्णी लागली आहे.

गडचिरोली : राज्य सरकारने नागपूर हिवाळी अधिवेशनानंतर राज्यातील पालकमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली. गडचिरोलीचे पालकमंत्री म्हणून राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांची वर्णी लागली आहे. मात्र पालकमंत्री गडचिरोली जिल्ह्यात सर्व भागात कार्यक्रमांना जाण्याऐवजी केवळ आपल्याच अहेरी विधानसभा क्षेत्रात कार्यक्रमांना हजेरी लावत असल्याने पालकमंत्री अहेरीचे की, गडचिरोलीचे अशी चर्चा प्रशासकीय वर्तुळातही सुरू झाली आहे. २०१० मध्ये आर. आर. पाटील यांच्यासारख्या जबाबदार मंत्र्यांकडे गडचिरोलीच्या पालकमंत्री पदाची धुरा होती. महिन्याला दोनदा ना. पाटील गडचिरोलीच्या दौऱ्यावर येत होते. २०१० ते २०१४ या कालावधीत ना. पाटील यांनी साडेतीनशेवर दौरे गडचिरोली जिल्ह्यात केले. त्यामुळे त्यांची सामान्य माणसाप्रती असलेली आस्था यातून दिसून येत होती. विकासाच्या निधीतही त्यांनी जिल्हा विकास योजनेत प्रचंड मोठी वाढ केली. आता भाजपसेना सरकारच्या काळात अम्ब्रीशराव महाराज यांच्याकडे पालकमंत्री पदाची धुरा आली आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनापासून अम्ब्रीशराव महाराजांनी गडचिरोलीत केवळ तीनवेळा हजेरी लावली. पालकमंत्री होण्यापूर्वी २४ नोव्हेंबर रोजी ते मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी आले. त्यानंतर गृहराज्यमंत्री प्रा. राम शिंदे यांच्यासोबत केवळ पोलीस मुख्यालयाच्या कार्यक्रमासाठी आले. त्यानंतर नागपूर अधिवेशन संपल्यानंतर स्वत:च्या सत्कार कार्यक्रमासाठी पालकमंत्री गडचिरोलीत आले. याचवेळी त्यांनी देसाईगंज, आरमोरी, गडचिरोली, चामोर्शी, घोट या भागाचा धावता दौरा केला. गडचिरोलीचे स्थानिक पालकमंत्री असताना त्यांनी येथे विविध विभागाच्या आढावा बैठका घेण्याची अपेक्षा लोकांना होती. अकाली पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे अनेक ठिकाणी धान्य भिजले. परंतु पालकमंत्री शेतकऱ्यांचे अश्रु पुसण्यासाठीही आले नाही. केवळ अहेरी भागातच आपला दौरा करून आपल्या मतदारसंघावरच लक्ष केंद्रीत करण्याचे काम पालकमंत्री करीत आहेत. सिरोंचा येथे पालकमंत्र्यांची मिरवणुक काढण्यात आली. दवाखान्यासमोर सायलेंट झोन असतांना जोरदार ढोल ताशे बदडण्यात आले. ज्या क्रीडा संमेलनाचे पालकमंत्र्यांच्याहस्ते उद्घाटन आहे. तेथेही तास ते दीड तास विलंबाने ते पोहोचतात, असे लोकप्रतिनिधीही सांगत आहेत. त्यामुळे पालकमंत्र्यांविषयी सध्या प्रचंड चर्चा जनमाणसात आहे. या पालकमंत्र्यांकडून विकासाची फारशी अपेक्षा नाही, अशी प्रतिक्रीया जिल्ह्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. (जिल्हा प्रतिनिधी)