शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
4
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
5
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
6
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
7
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
8
गणेश मंडळे दंड भरणार नाही, खड्यावर सरकारलाच दंड लावा
9
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
10
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
11
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
12
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
13
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
15
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
16
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
17
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
18
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
19
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
20
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं

पालकमंत्री संपूर्ण जिल्ह्याचे की, केवळ अहेरीचे

By admin | Updated: January 8, 2015 22:54 IST

राज्य सरकारने नागपूर हिवाळी अधिवेशनानंतर राज्यातील पालकमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली. गडचिरोलीचे पालकमंत्री म्हणून राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांची वर्णी लागली आहे.

गडचिरोली : राज्य सरकारने नागपूर हिवाळी अधिवेशनानंतर राज्यातील पालकमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली. गडचिरोलीचे पालकमंत्री म्हणून राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांची वर्णी लागली आहे. मात्र पालकमंत्री गडचिरोली जिल्ह्यात सर्व भागात कार्यक्रमांना जाण्याऐवजी केवळ आपल्याच अहेरी विधानसभा क्षेत्रात कार्यक्रमांना हजेरी लावत असल्याने पालकमंत्री अहेरीचे की, गडचिरोलीचे अशी चर्चा प्रशासकीय वर्तुळातही सुरू झाली आहे. २०१० मध्ये आर. आर. पाटील यांच्यासारख्या जबाबदार मंत्र्यांकडे गडचिरोलीच्या पालकमंत्री पदाची धुरा होती. महिन्याला दोनदा ना. पाटील गडचिरोलीच्या दौऱ्यावर येत होते. २०१० ते २०१४ या कालावधीत ना. पाटील यांनी साडेतीनशेवर दौरे गडचिरोली जिल्ह्यात केले. त्यामुळे त्यांची सामान्य माणसाप्रती असलेली आस्था यातून दिसून येत होती. विकासाच्या निधीतही त्यांनी जिल्हा विकास योजनेत प्रचंड मोठी वाढ केली. आता भाजपसेना सरकारच्या काळात अम्ब्रीशराव महाराज यांच्याकडे पालकमंत्री पदाची धुरा आली आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनापासून अम्ब्रीशराव महाराजांनी गडचिरोलीत केवळ तीनवेळा हजेरी लावली. पालकमंत्री होण्यापूर्वी २४ नोव्हेंबर रोजी ते मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी आले. त्यानंतर गृहराज्यमंत्री प्रा. राम शिंदे यांच्यासोबत केवळ पोलीस मुख्यालयाच्या कार्यक्रमासाठी आले. त्यानंतर नागपूर अधिवेशन संपल्यानंतर स्वत:च्या सत्कार कार्यक्रमासाठी पालकमंत्री गडचिरोलीत आले. याचवेळी त्यांनी देसाईगंज, आरमोरी, गडचिरोली, चामोर्शी, घोट या भागाचा धावता दौरा केला. गडचिरोलीचे स्थानिक पालकमंत्री असताना त्यांनी येथे विविध विभागाच्या आढावा बैठका घेण्याची अपेक्षा लोकांना होती. अकाली पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे अनेक ठिकाणी धान्य भिजले. परंतु पालकमंत्री शेतकऱ्यांचे अश्रु पुसण्यासाठीही आले नाही. केवळ अहेरी भागातच आपला दौरा करून आपल्या मतदारसंघावरच लक्ष केंद्रीत करण्याचे काम पालकमंत्री करीत आहेत. सिरोंचा येथे पालकमंत्र्यांची मिरवणुक काढण्यात आली. दवाखान्यासमोर सायलेंट झोन असतांना जोरदार ढोल ताशे बदडण्यात आले. ज्या क्रीडा संमेलनाचे पालकमंत्र्यांच्याहस्ते उद्घाटन आहे. तेथेही तास ते दीड तास विलंबाने ते पोहोचतात, असे लोकप्रतिनिधीही सांगत आहेत. त्यामुळे पालकमंत्र्यांविषयी सध्या प्रचंड चर्चा जनमाणसात आहे. या पालकमंत्र्यांकडून विकासाची फारशी अपेक्षा नाही, अशी प्रतिक्रीया जिल्ह्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. (जिल्हा प्रतिनिधी)