शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

भूजल पातळीत ०.६४ मीटरने घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 00:11 IST

जिल्ह्यात यावर्षी जमिनीतील पाण्याची पातळी आणखी खोल गेली आहे. गेल्या पाच वर्षाच्या पाणी पातळीच्या तुलनेत यावर्षी सप्टेंबर अखेर पाण्याच्या पातळीत ०.६४ मीटरने घट झाली आहे.

ठळक मुद्देकमी पावसाचा परिणाम : सिरोंचामध्ये पाणी गेले सर्वात खोल

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात यावर्षी जमिनीतील पाण्याची पातळी आणखी खोल गेली आहे. गेल्या पाच वर्षाच्या पाणी पातळीच्या तुलनेत यावर्षी सप्टेंबर अखेर पाण्याच्या पातळीत ०.६४ मीटरने घट झाली आहे. यामुळे उन्हाळ्यात काही भागात ुपाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.जिल्ह्याच्या सर्व क्षेत्रात मिळून ११२ निरीक्षण विहिरींमध्ये भूजल सर्व्हेक्षण व विकास यंत्रणेने केलेल्या पाहणीत भूजल पातळीत घट झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. तरीही टंचाई आराखड्याच्या पहिल्या टप्प्यात (आॅक्टोबर ते डिसेंबर) जिल्ह्यात कुठेही पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता नसल्याचे संबंधित यंत्रणेने स्पष्ट केले. मात्र उपलब्ध पाण्याचे स्त्रोत पुरेशा प्रमाणात नसेल तर दुसºया आणि तिसºया टप्प्यांत काही भागात पाणी टंचाई जाणवणार आहे.जिल्ह्याचे सरासरी वार्षिक पर्जन्यमान १३५४.७८ मिमी आहे. यावर्षी प्रत्यक्ष १०११.३३ मिमी पर्जन्यमान झाले आहे. म्हणजे सरासरीच्या तुलनेत २५.३५ टक्के पाऊस कमी झाला आहे. सर्वात कमी ८०९.९० मिमी पाऊस सिरोंचा तालुक्यात झाला आहे. त्यामुळे या तालुक्यात भूजल पातळी सर्वात जास्त घटली आहे.सिरोंचा तालुक्यात सर्वाधिक १२३५ मिमी पाऊस झाला असला तरी या तालुक्यात ०.८३ मीटरने भूजल पातळी घटली आहे.टंचाईची परिस्थिती आटोक्यातच राहणारशासनाच्या जीआरनुसार ५० टक्केपेक्षा कमी पाऊस झाला आणि भूजल स्तरात १ मीटरपेक्षा जास्त घट झाली असेल तर शासन दुष्काळसदृश परिस्थिती असल्याचे मानते. परंतू यावर्षी जिल्ह्यात जवळपास ७५ टक्के पाऊस झाला आहे. शिवाय भूजल स्तर १ मीटरपेक्षा जास्त घटलेला नाही. तरीही मंडळनिहाय पाऊस आणि भूजल स्तर अपेक्षेपेक्षा कमी आहे असे आढळल्यास त्यांना दुष्काळसदृश परिस्थितीची शासकीय मदत मिळू शकते. जिल्हाभरातील मंडळांचा त्याबाबतचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. तालुकानिहाय भूजल स्तरातील घट पाहता सिरोंचा २.४३ मीटर, मुलचेरा १.६२ मीटर आणि अहेरी तालुक्यात १.४५ मीटरने घट झाली आहे.यावर्षी पाऊस कमी आल्याने भूजल स्तरात घट झाली असली तरी तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्यासारखी स्थिती नाही. जलस्त्रोत किती उपलब्ध आहेत याची जिल्हा परिषदेच्या यंत्रणेकडून तपासणी करून त्यानुसार ते टंचाई आराखडा तयार करतील.- पी.बी.निखाडे,वरिष्ठ भूवैज्ञानिक, गडचिरोली