शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

भूजल पातळीत ०.६४ मीटरने घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 00:11 IST

जिल्ह्यात यावर्षी जमिनीतील पाण्याची पातळी आणखी खोल गेली आहे. गेल्या पाच वर्षाच्या पाणी पातळीच्या तुलनेत यावर्षी सप्टेंबर अखेर पाण्याच्या पातळीत ०.६४ मीटरने घट झाली आहे.

ठळक मुद्देकमी पावसाचा परिणाम : सिरोंचामध्ये पाणी गेले सर्वात खोल

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात यावर्षी जमिनीतील पाण्याची पातळी आणखी खोल गेली आहे. गेल्या पाच वर्षाच्या पाणी पातळीच्या तुलनेत यावर्षी सप्टेंबर अखेर पाण्याच्या पातळीत ०.६४ मीटरने घट झाली आहे. यामुळे उन्हाळ्यात काही भागात ुपाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.जिल्ह्याच्या सर्व क्षेत्रात मिळून ११२ निरीक्षण विहिरींमध्ये भूजल सर्व्हेक्षण व विकास यंत्रणेने केलेल्या पाहणीत भूजल पातळीत घट झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. तरीही टंचाई आराखड्याच्या पहिल्या टप्प्यात (आॅक्टोबर ते डिसेंबर) जिल्ह्यात कुठेही पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता नसल्याचे संबंधित यंत्रणेने स्पष्ट केले. मात्र उपलब्ध पाण्याचे स्त्रोत पुरेशा प्रमाणात नसेल तर दुसºया आणि तिसºया टप्प्यांत काही भागात पाणी टंचाई जाणवणार आहे.जिल्ह्याचे सरासरी वार्षिक पर्जन्यमान १३५४.७८ मिमी आहे. यावर्षी प्रत्यक्ष १०११.३३ मिमी पर्जन्यमान झाले आहे. म्हणजे सरासरीच्या तुलनेत २५.३५ टक्के पाऊस कमी झाला आहे. सर्वात कमी ८०९.९० मिमी पाऊस सिरोंचा तालुक्यात झाला आहे. त्यामुळे या तालुक्यात भूजल पातळी सर्वात जास्त घटली आहे.सिरोंचा तालुक्यात सर्वाधिक १२३५ मिमी पाऊस झाला असला तरी या तालुक्यात ०.८३ मीटरने भूजल पातळी घटली आहे.टंचाईची परिस्थिती आटोक्यातच राहणारशासनाच्या जीआरनुसार ५० टक्केपेक्षा कमी पाऊस झाला आणि भूजल स्तरात १ मीटरपेक्षा जास्त घट झाली असेल तर शासन दुष्काळसदृश परिस्थिती असल्याचे मानते. परंतू यावर्षी जिल्ह्यात जवळपास ७५ टक्के पाऊस झाला आहे. शिवाय भूजल स्तर १ मीटरपेक्षा जास्त घटलेला नाही. तरीही मंडळनिहाय पाऊस आणि भूजल स्तर अपेक्षेपेक्षा कमी आहे असे आढळल्यास त्यांना दुष्काळसदृश परिस्थितीची शासकीय मदत मिळू शकते. जिल्हाभरातील मंडळांचा त्याबाबतचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. तालुकानिहाय भूजल स्तरातील घट पाहता सिरोंचा २.४३ मीटर, मुलचेरा १.६२ मीटर आणि अहेरी तालुक्यात १.४५ मीटरने घट झाली आहे.यावर्षी पाऊस कमी आल्याने भूजल स्तरात घट झाली असली तरी तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्यासारखी स्थिती नाही. जलस्त्रोत किती उपलब्ध आहेत याची जिल्हा परिषदेच्या यंत्रणेकडून तपासणी करून त्यानुसार ते टंचाई आराखडा तयार करतील.- पी.बी.निखाडे,वरिष्ठ भूवैज्ञानिक, गडचिरोली