शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

भूजल पातळीत ०.६४ मीटरने घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 00:11 IST

जिल्ह्यात यावर्षी जमिनीतील पाण्याची पातळी आणखी खोल गेली आहे. गेल्या पाच वर्षाच्या पाणी पातळीच्या तुलनेत यावर्षी सप्टेंबर अखेर पाण्याच्या पातळीत ०.६४ मीटरने घट झाली आहे.

ठळक मुद्देकमी पावसाचा परिणाम : सिरोंचामध्ये पाणी गेले सर्वात खोल

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात यावर्षी जमिनीतील पाण्याची पातळी आणखी खोल गेली आहे. गेल्या पाच वर्षाच्या पाणी पातळीच्या तुलनेत यावर्षी सप्टेंबर अखेर पाण्याच्या पातळीत ०.६४ मीटरने घट झाली आहे. यामुळे उन्हाळ्यात काही भागात ुपाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.जिल्ह्याच्या सर्व क्षेत्रात मिळून ११२ निरीक्षण विहिरींमध्ये भूजल सर्व्हेक्षण व विकास यंत्रणेने केलेल्या पाहणीत भूजल पातळीत घट झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. तरीही टंचाई आराखड्याच्या पहिल्या टप्प्यात (आॅक्टोबर ते डिसेंबर) जिल्ह्यात कुठेही पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता नसल्याचे संबंधित यंत्रणेने स्पष्ट केले. मात्र उपलब्ध पाण्याचे स्त्रोत पुरेशा प्रमाणात नसेल तर दुसºया आणि तिसºया टप्प्यांत काही भागात पाणी टंचाई जाणवणार आहे.जिल्ह्याचे सरासरी वार्षिक पर्जन्यमान १३५४.७८ मिमी आहे. यावर्षी प्रत्यक्ष १०११.३३ मिमी पर्जन्यमान झाले आहे. म्हणजे सरासरीच्या तुलनेत २५.३५ टक्के पाऊस कमी झाला आहे. सर्वात कमी ८०९.९० मिमी पाऊस सिरोंचा तालुक्यात झाला आहे. त्यामुळे या तालुक्यात भूजल पातळी सर्वात जास्त घटली आहे.सिरोंचा तालुक्यात सर्वाधिक १२३५ मिमी पाऊस झाला असला तरी या तालुक्यात ०.८३ मीटरने भूजल पातळी घटली आहे.टंचाईची परिस्थिती आटोक्यातच राहणारशासनाच्या जीआरनुसार ५० टक्केपेक्षा कमी पाऊस झाला आणि भूजल स्तरात १ मीटरपेक्षा जास्त घट झाली असेल तर शासन दुष्काळसदृश परिस्थिती असल्याचे मानते. परंतू यावर्षी जिल्ह्यात जवळपास ७५ टक्के पाऊस झाला आहे. शिवाय भूजल स्तर १ मीटरपेक्षा जास्त घटलेला नाही. तरीही मंडळनिहाय पाऊस आणि भूजल स्तर अपेक्षेपेक्षा कमी आहे असे आढळल्यास त्यांना दुष्काळसदृश परिस्थितीची शासकीय मदत मिळू शकते. जिल्हाभरातील मंडळांचा त्याबाबतचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. तालुकानिहाय भूजल स्तरातील घट पाहता सिरोंचा २.४३ मीटर, मुलचेरा १.६२ मीटर आणि अहेरी तालुक्यात १.४५ मीटरने घट झाली आहे.यावर्षी पाऊस कमी आल्याने भूजल स्तरात घट झाली असली तरी तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्यासारखी स्थिती नाही. जलस्त्रोत किती उपलब्ध आहेत याची जिल्हा परिषदेच्या यंत्रणेकडून तपासणी करून त्यानुसार ते टंचाई आराखडा तयार करतील.- पी.बी.निखाडे,वरिष्ठ भूवैज्ञानिक, गडचिरोली