शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

भूजल पातळीत ०.५२ मीटरने घट

By admin | Updated: May 20, 2015 02:11 IST

२०१४ च्या पावसाळ्यात सरासरी कमी पर्जन्यमान झाल्याने त्याचा सरळ परिणाम भूजल पातळीवर पडला असून जिल्ह्यातील भूजलाची पातळी सरासरी ०.५२ मीटरने घटली आहे.

गडचिरोली : २०१४ च्या पावसाळ्यात सरासरी कमी पर्जन्यमान झाल्याने त्याचा सरळ परिणाम भूजल पातळीवर पडला असून जिल्ह्यातील भूजलाची पातळी सरासरी ०.५२ मीटरने घटली आहे. भूजल पातळीचे मापन करण्यासाठी जिल्हा स्तरावर स्वतंत्र भूजल सर्वेक्षण विभाग स्थापन करण्यात आला आहे. या विभागाच्या वतीने दर तीन महिन्यांनी जिल्हाभरातील काही निवडक विहिरींचे सर्वेक्षण करून भूजल पातळी तपासली जाते. या विभागाच्या वतीने मार्च २०१५ मध्ये बाराही तालुक्यातील १९२ विहिरींची तपासणी झाली. यामध्ये गडचिरोली तालुक्यातील १०, आरमोरी आठ, देसाईगंज सात, कुरखेडा १५, कोरची सहा, धानोरा १२, चामोर्शी ११, मुलचेरा पाच, एटापल्ली १२, अहेरी ११, भामरागड सहा व सिरोंचा तालुक्यातील नऊ विहिरींचा समावेश आहे. गेल्या पाच वर्षात या विहिरींमधील पाण्याची सरासरी पातळी ६.५९ मीटर होती. मार्च २०१५ मध्ये पाण्याची पातळी ६.७ मीटरवर आली आहे. म्हणजेच पाण्याची पातळी ०.५२ मीटरने घटली असल्याचे निदर्शनास येते. सर्वेक्षण करण्यात आलेल्या गडचिरोली तालुक्यातील दहा विहिरींपैकी दोन विहिरीतील पाण्याच्या पातळी घट तर आठ विहिरींतील पाण्याच्या पातळी वाढ झाली आहे. आरमोरी तालुक्यातील आठ पैकी दोन विहिरींमध्ये घट तर सहा विहिरींमध्ये वाढ झाली आहे. देसाईगंज तालुक्यातील तीन विहिरींमध्ये घट तर चार विहिरींमध्ये वाढ, कुरखेडा तालुक्यातील चार विहिरींच्या पाण्याच्या पातळी घट तर ११ मध्ये वाढ झाली आहे. कोरची तालुक्यातील सहा पैकी सर्वच विहिरींत पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. धानोरा तालुक्यातील एक, चामोर्शी तालुक्यातील दोन, अहेरी दोन, एटापल्ली तीन, सिरोंचा तालुक्यातील चार सर्वेक्षण विहिरींतील पाण्याची पातळीमात्र घटली असल्याचे दिसून येते. जिल्ह्याच्या प्रत्येक भागात असमान प्रमाणात पाऊस पडते. त्यामुळे काही तालुक्यांमधील पाण्याची पातळी वाढली आहे. तर काही तालुक्यांमधील मात्र ही पातळी घटली आहे. बहुतांश ठिकाणची पाणी पातळी वाढली असली तरी मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या उन्हाळ्यात सरासरी ०.५२ मीटरने पाण्याची पातळी घटली आहे. (नगर प्रतिनिधी)