शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

विजेसाठी रात्रीच अभियंत्याला घेराव

By admin | Updated: June 14, 2017 01:48 IST

मागील दीड वर्षापासून सातत्याने होत असलेल्या खंडीत वीज पुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या पदेवाही ...

गावात नेऊन दुरूस्त करून घेतली वीज : पदेवाही येथील नागरिक खंडीत वीज पुरवठ्याने त्रस्त लोकमत न्यूज नेटवर्क एटापल्ली : मागील दीड वर्षापासून सातत्याने होत असलेल्या खंडीत वीज पुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या पदेवाही येथील नागरिकांनी सोमवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास वीज अभियंत्यांना घेराव घालून वीज दुरूस्तीसाठी गावाला नेले. एटापल्लीपासून दोन किमी अंतरावर असलेल्या पदेवाही गावातील नागरिकांनी खंडीत वीज पुरवठ्याच्या अनेकवेळा तक्रारी करून कायमस्वरूपी उपाय शोधण्याची मागणी केली होती. मात्र गावकऱ्यांच्या तक्रारींची वीज विभागाने दखलच घेतली नाही. सोमवारी रात्री ८.३० वाजता पदेवाही येथील वीज पुरवठा खंडीत झाला. पदेवाही येथील नागरिकांनी तेव्हाच महावितरणचे कार्यालय गाठले. यावेळी अभियंता आर. बी. रोहणकर उपस्थित होते. त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. त्यानंतर त्यांनाच वीज बिघाड दुरूस्तीसाठी गावाला नेले. वीज विभागाच्या विरोधात नागरिकांमध्ये प्रचंड रोष असल्याचे दिसून येते. आंदोलनाचे नेतृत्व गुरूपल्लीच्या सरपंच सुनिता तलांडे, पं.स. सदस्य जनार्धन नल्लावार, प्रविण आईलवार, बालाजी आत्राम यांनी केले. वीज पुरवठा खंडीत होण्याबाबत अभियंता पोहणकर यांना विचारले असता, एटापल्ली तालुक्यातील बहुतांश विद्युत लाईन जंगलातून गेली आहे. वादळ, पाऊस झाल्यानंतर एखादे झाड पडत असल्याने वीज पुरवठा खंडीत होणे ही समस्या निर्माण होते. एटापल्ली तालुक्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील वीज पुरवठा नेहमीच खंडीत होते. कधीकधी कमी दाबाचा वीज पुरवठा होतो. त्यामुळे अनेक वीज उपकरणे निकामी झाली आहेत. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. शहर व ग्रामीण यामध्ये भेदभाव एटापल्ली येथील वीज कार्यालय गुरूपल्ली ग्रामपंचायतीच्या हद्दित येते. गुरूपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत पदेवाही हे गाव येते. पदेवाही येथील लाईट गेल्याची तक्रार आल्यास वीज विभागाचे अभियंता एटापल्ली शहराची लाईट सुरू ठेवणे गरजेचे आहे. तुमचा खेडेगाव आहे, असे उत्तर देऊन वीज बिघाड दुरूस्त करण्यास दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. शहर आणि खेडे असा भेदबाव केला जात असेल तर एमएसईबीचे कार्यालय आमच्या ग्रामपंचायतीच्या हद्दित आहे, असा प्रश्न पदेवाही येथील नागरिकांनी वीज विभागाच्या अभियंत्यांना आंदोलनादरम्यान केला.