शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

विजेसाठी रात्रीच अभियंत्याला घेराव

By admin | Updated: June 14, 2017 01:48 IST

मागील दीड वर्षापासून सातत्याने होत असलेल्या खंडीत वीज पुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या पदेवाही ...

गावात नेऊन दुरूस्त करून घेतली वीज : पदेवाही येथील नागरिक खंडीत वीज पुरवठ्याने त्रस्त लोकमत न्यूज नेटवर्क एटापल्ली : मागील दीड वर्षापासून सातत्याने होत असलेल्या खंडीत वीज पुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या पदेवाही येथील नागरिकांनी सोमवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास वीज अभियंत्यांना घेराव घालून वीज दुरूस्तीसाठी गावाला नेले. एटापल्लीपासून दोन किमी अंतरावर असलेल्या पदेवाही गावातील नागरिकांनी खंडीत वीज पुरवठ्याच्या अनेकवेळा तक्रारी करून कायमस्वरूपी उपाय शोधण्याची मागणी केली होती. मात्र गावकऱ्यांच्या तक्रारींची वीज विभागाने दखलच घेतली नाही. सोमवारी रात्री ८.३० वाजता पदेवाही येथील वीज पुरवठा खंडीत झाला. पदेवाही येथील नागरिकांनी तेव्हाच महावितरणचे कार्यालय गाठले. यावेळी अभियंता आर. बी. रोहणकर उपस्थित होते. त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. त्यानंतर त्यांनाच वीज बिघाड दुरूस्तीसाठी गावाला नेले. वीज विभागाच्या विरोधात नागरिकांमध्ये प्रचंड रोष असल्याचे दिसून येते. आंदोलनाचे नेतृत्व गुरूपल्लीच्या सरपंच सुनिता तलांडे, पं.स. सदस्य जनार्धन नल्लावार, प्रविण आईलवार, बालाजी आत्राम यांनी केले. वीज पुरवठा खंडीत होण्याबाबत अभियंता पोहणकर यांना विचारले असता, एटापल्ली तालुक्यातील बहुतांश विद्युत लाईन जंगलातून गेली आहे. वादळ, पाऊस झाल्यानंतर एखादे झाड पडत असल्याने वीज पुरवठा खंडीत होणे ही समस्या निर्माण होते. एटापल्ली तालुक्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील वीज पुरवठा नेहमीच खंडीत होते. कधीकधी कमी दाबाचा वीज पुरवठा होतो. त्यामुळे अनेक वीज उपकरणे निकामी झाली आहेत. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. शहर व ग्रामीण यामध्ये भेदभाव एटापल्ली येथील वीज कार्यालय गुरूपल्ली ग्रामपंचायतीच्या हद्दित येते. गुरूपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत पदेवाही हे गाव येते. पदेवाही येथील लाईट गेल्याची तक्रार आल्यास वीज विभागाचे अभियंता एटापल्ली शहराची लाईट सुरू ठेवणे गरजेचे आहे. तुमचा खेडेगाव आहे, असे उत्तर देऊन वीज बिघाड दुरूस्त करण्यास दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. शहर आणि खेडे असा भेदबाव केला जात असेल तर एमएसईबीचे कार्यालय आमच्या ग्रामपंचायतीच्या हद्दित आहे, असा प्रश्न पदेवाही येथील नागरिकांनी वीज विभागाच्या अभियंत्यांना आंदोलनादरम्यान केला.