शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पडिक जमिनीवर बहरली हिरवी वनराई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2020 05:00 IST

वाढत्या लोकसंख्येमुळे वृक्षतोड व वनजमिनीवर अतिक्रमण करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. भविष्यात यामुळे जंगले संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. देसाईगंज तालुक्यात आजमितीस शेकडो हेक्टर वनजमिनीवर अतिक्रमण करुन अनेक ठिकाणची वन जमीन व्यावसायिक प्रयोजनार्थ वापरण्यात येऊ लागल्याचे चित्र दिसून येताच वन विभागाने खबरदारी घेतली.

ठळक मुद्देवन विभागाचे नियोजन : नैनपूर, शिवराजपूर, विहीरगाव, कसारी, पिंपळगाव व एकलपुरातील झुडपी जंगल

पुरूषोत्तम भागडकर ।लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : तालुक्यात वन विभागाची शेकडो हेक्टर वन जमीन ओसाड होती. या जागेवर अतिक्रमणधारकांची करडी नजर होती. मात्र वनविभागाने अशा पडिक जागेवर वृक्षारोपण करण्याचे ठरविले. त्यानुसार गत पाच ते सात वर्षापूर्वी या जागेवर वृक्षारोपण केल्याने सध्या पडिक जमिनीवर हिरवी वनराई बहरली आहे.देसाईगंज तालुक्यात नैनपूर शिवराजपूर, विहीरगाव, कसारी, पिंपळगाव (हलबी) एकलपूर टोला परिसरात मोठ्या प्रमाणात झुडपी जंगलाची जमीन आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे वृक्षतोड व वनजमिनीवर अतिक्रमण करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. भविष्यात यामुळे जंगले संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. देसाईगंज तालुक्यात आजमितीस शेकडो हेक्टर वनजमिनीवर अतिक्रमण करुन अनेक ठिकाणची वन जमीन व्यावसायिक प्रयोजनार्थ वापरण्यात येऊ लागल्याचे चित्र दिसून येताच वन विभागाने खबरदारी घेतली. अनेक वर्षांपासून काही लोकांनी अतिक्रमण केले असताना त्या लोकांना डावलून महसूल व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना हाताशी घेऊन बनावट कागदेपत्रांच्या आधारे वनहक्क पट्टे प्राप्त केल्याची प्रकरणे आहेत. याबाबत तक्रारीही झाल्या आहेत. असे प्रकार तालुक्यात घडल्याने यापुढे झुडपी जंगलाच्या पडिक जागेवर अतिक्रमण होऊ नये, यासाठी वडसा वन विभागाने पुढाकार घेऊन शतकोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत वृक्षारोपण केले होते. याची प्रचिती आता समोर आली असून पडिक जागेवर हिरवीगार वनराई डोलत आहे.हडपलेली जमीन परत घेण्याची गरजदेसाईगंज तालुक्यातील तत्कालीन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून पडिक जमिनीवर वृक्ष लागवड केल्याने सध्या शेकडो हेक्टर जमिनीवर घनदाट जंगल आकार घेत आहे. उपलब्ध पाणीसाठा व गर्द हिवराईमुळे येथे प्राण्यांचाही वावर वाढला आहे. नैसर्गिक अन्नसाखळी टिकवून ठेवण्यास हे जंगल उपयोगी येणार आहे. याची मौलिक मदत होणार आहे. पारंपारिकरित्या अतिक्रमण करून उपजीविका करणाऱ्या लोकांना डावलल्याची अनेक प्रकरणे आहेत. अशा बनावट दस्तावेज सादर करून वन विभागाची शेकडो एकर जागा हडपणाऱ्या तालुक्यातील अनेक अतिक्रमणधारकांवर कारवाई होणे गरजेचे आहे. वन विभागाने अशाचप्रकारे जागा ताब्यात घेऊन या जागेवर वृक्ष लागवड करावी, अशी मागणी वनप्रेमींकडून केली जात आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग