शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

पडिक जमिनीवर बहरली हिरवी वनराई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2020 05:00 IST

वाढत्या लोकसंख्येमुळे वृक्षतोड व वनजमिनीवर अतिक्रमण करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. भविष्यात यामुळे जंगले संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. देसाईगंज तालुक्यात आजमितीस शेकडो हेक्टर वनजमिनीवर अतिक्रमण करुन अनेक ठिकाणची वन जमीन व्यावसायिक प्रयोजनार्थ वापरण्यात येऊ लागल्याचे चित्र दिसून येताच वन विभागाने खबरदारी घेतली.

ठळक मुद्देवन विभागाचे नियोजन : नैनपूर, शिवराजपूर, विहीरगाव, कसारी, पिंपळगाव व एकलपुरातील झुडपी जंगल

पुरूषोत्तम भागडकर ।लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : तालुक्यात वन विभागाची शेकडो हेक्टर वन जमीन ओसाड होती. या जागेवर अतिक्रमणधारकांची करडी नजर होती. मात्र वनविभागाने अशा पडिक जागेवर वृक्षारोपण करण्याचे ठरविले. त्यानुसार गत पाच ते सात वर्षापूर्वी या जागेवर वृक्षारोपण केल्याने सध्या पडिक जमिनीवर हिरवी वनराई बहरली आहे.देसाईगंज तालुक्यात नैनपूर शिवराजपूर, विहीरगाव, कसारी, पिंपळगाव (हलबी) एकलपूर टोला परिसरात मोठ्या प्रमाणात झुडपी जंगलाची जमीन आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे वृक्षतोड व वनजमिनीवर अतिक्रमण करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. भविष्यात यामुळे जंगले संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. देसाईगंज तालुक्यात आजमितीस शेकडो हेक्टर वनजमिनीवर अतिक्रमण करुन अनेक ठिकाणची वन जमीन व्यावसायिक प्रयोजनार्थ वापरण्यात येऊ लागल्याचे चित्र दिसून येताच वन विभागाने खबरदारी घेतली. अनेक वर्षांपासून काही लोकांनी अतिक्रमण केले असताना त्या लोकांना डावलून महसूल व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना हाताशी घेऊन बनावट कागदेपत्रांच्या आधारे वनहक्क पट्टे प्राप्त केल्याची प्रकरणे आहेत. याबाबत तक्रारीही झाल्या आहेत. असे प्रकार तालुक्यात घडल्याने यापुढे झुडपी जंगलाच्या पडिक जागेवर अतिक्रमण होऊ नये, यासाठी वडसा वन विभागाने पुढाकार घेऊन शतकोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत वृक्षारोपण केले होते. याची प्रचिती आता समोर आली असून पडिक जागेवर हिरवीगार वनराई डोलत आहे.हडपलेली जमीन परत घेण्याची गरजदेसाईगंज तालुक्यातील तत्कालीन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून पडिक जमिनीवर वृक्ष लागवड केल्याने सध्या शेकडो हेक्टर जमिनीवर घनदाट जंगल आकार घेत आहे. उपलब्ध पाणीसाठा व गर्द हिवराईमुळे येथे प्राण्यांचाही वावर वाढला आहे. नैसर्गिक अन्नसाखळी टिकवून ठेवण्यास हे जंगल उपयोगी येणार आहे. याची मौलिक मदत होणार आहे. पारंपारिकरित्या अतिक्रमण करून उपजीविका करणाऱ्या लोकांना डावलल्याची अनेक प्रकरणे आहेत. अशा बनावट दस्तावेज सादर करून वन विभागाची शेकडो एकर जागा हडपणाऱ्या तालुक्यातील अनेक अतिक्रमणधारकांवर कारवाई होणे गरजेचे आहे. वन विभागाने अशाचप्रकारे जागा ताब्यात घेऊन या जागेवर वृक्ष लागवड करावी, अशी मागणी वनप्रेमींकडून केली जात आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग