शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

रेशनधारकांना निकृष्ट गव्हाचा पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 22:30 IST

चालू महिन्याचे नियतन मंजूर करण्यात आले आहे. रेशनधारकांना अत्यंत निकृष्ट दर्जाच्या गव्हाचा पुरवठा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, मागील दोन महिन्यांपासून असाच निकृष्ट गहू पुरविला जात आहे. त्यामुळे रेशनधारकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देदोन महिन्यांपासून स्थिती : कुजलेला व अळ्या लागलेला गहू दुकानात

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : चालू महिन्याचे नियतन मंजूर करण्यात आले आहे. रेशनधारकांना अत्यंत निकृष्ट दर्जाच्या गव्हाचा पुरवठा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, मागील दोन महिन्यांपासून असाच निकृष्ट गहू पुरविला जात आहे. त्यामुळे रेशनधारकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.गरीब कुटुंबांना स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून गहू, तांदळाचा पुरवठा केला जातो. एकूण लोकसंख्येच्या जवळपास ७० टक्के कुटुंबांना स्वस्त धान्याचा लाभ मिळतो. त्यामुळे बहुतांश कुटुंबांची चूल रेशनच्याच भरवशावर पेटते. त्यातही दुर्गम व ग्रामीण भागातील नागरिकांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांना रेशनच्याच धान्यावर अवलंबून राहावे लागते. मागील दोन महिन्यांपासून अत्यंत निकृष्ट दर्जाचा गहू पुरवठा केला जात आहे. काही पोत्यांमधील गहू कुजल्याप्रमाणे आहे. तर काही पोत्यांमधील गव्हाला अळ्या लागल्या आहेत. सदर गहू जनावरांना खाऊ घालण्याच्या दर्जाचे आहेत. मात्र नाईलाजास्तव गरीबांना सदर गहू खरेदी करावे लागत आहे. मागील महिन्यात निकृष्ट दर्जाचा गहू पुरवठा झाला होता. चुकीने अशा प्रकारच्या गहू आला असावा, असे समजून तक्रार केली नाही. मात्र दुसऱ्या महिन्यात तसाच गहू आल्याने नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. पुढील महिन्यात तरी चांगल्या दर्जाच्या गव्हाचा पुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.गव्हाचे प्रमाण वाढलेप्राधान्य कुटुंबाला प्रती व्यक्ती तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ देण्याचा नियम आहे. मात्र गडचिरोली जिल्ह्यातील नागरिक भात जास्त खातात, असा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला. त्यामुळे गव्हाचे प्रमाण कमी करून केवळ एक किलो गहू व चार किलो तांदूळ दिले जात होते. अनेक शेतकºयांकडे तांदूळ पिकत असल्याने त्यांना खºया अर्थाने गव्हाची गरज होती. मात्र गहूच कमी मिळत होते. या महिन्यात नियतनात बदल करण्यात आला आहे. गव्हाचे प्रमाण वाढवून प्रती व्यक्ती दोन किलो गहू व तीन किलो तांदूळ दिले जात आहेत. किमान हे प्रमाण तरी पुढे चालू ठेवावे, अशी मागणी आहे. दिवाळीच्या वेळी चना व उडीद डाळ पुरवठा करण्याची मागणी केली जात आहे.लाभार्थी सत्यापन मोहीम सुरूचमागील महिन्यांपासून सुरू झालेली लाभार्थी सत्यापन मोहीम सुरूच आहे. एक महिन्यात किमान ७० टक्के लाभार्थ्यांचे सत्यापन करायचे होते. मात्र काही दुकानदारांनी ७० टक्केपेक्षा कमी सत्यापन केले आहे. त्यामुळे त्यांना विचारणा केली जात आहे. लाभार्थी जीवंत आहे किंवा नाही, हे शोधण्यासाठी सदर मोहीम आवश्यक आहे.