शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

रेशनधारकांना निकृष्ट गव्हाचा पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 22:30 IST

चालू महिन्याचे नियतन मंजूर करण्यात आले आहे. रेशनधारकांना अत्यंत निकृष्ट दर्जाच्या गव्हाचा पुरवठा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, मागील दोन महिन्यांपासून असाच निकृष्ट गहू पुरविला जात आहे. त्यामुळे रेशनधारकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देदोन महिन्यांपासून स्थिती : कुजलेला व अळ्या लागलेला गहू दुकानात

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : चालू महिन्याचे नियतन मंजूर करण्यात आले आहे. रेशनधारकांना अत्यंत निकृष्ट दर्जाच्या गव्हाचा पुरवठा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, मागील दोन महिन्यांपासून असाच निकृष्ट गहू पुरविला जात आहे. त्यामुळे रेशनधारकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.गरीब कुटुंबांना स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून गहू, तांदळाचा पुरवठा केला जातो. एकूण लोकसंख्येच्या जवळपास ७० टक्के कुटुंबांना स्वस्त धान्याचा लाभ मिळतो. त्यामुळे बहुतांश कुटुंबांची चूल रेशनच्याच भरवशावर पेटते. त्यातही दुर्गम व ग्रामीण भागातील नागरिकांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांना रेशनच्याच धान्यावर अवलंबून राहावे लागते. मागील दोन महिन्यांपासून अत्यंत निकृष्ट दर्जाचा गहू पुरवठा केला जात आहे. काही पोत्यांमधील गहू कुजल्याप्रमाणे आहे. तर काही पोत्यांमधील गव्हाला अळ्या लागल्या आहेत. सदर गहू जनावरांना खाऊ घालण्याच्या दर्जाचे आहेत. मात्र नाईलाजास्तव गरीबांना सदर गहू खरेदी करावे लागत आहे. मागील महिन्यात निकृष्ट दर्जाचा गहू पुरवठा झाला होता. चुकीने अशा प्रकारच्या गहू आला असावा, असे समजून तक्रार केली नाही. मात्र दुसऱ्या महिन्यात तसाच गहू आल्याने नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. पुढील महिन्यात तरी चांगल्या दर्जाच्या गव्हाचा पुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.गव्हाचे प्रमाण वाढलेप्राधान्य कुटुंबाला प्रती व्यक्ती तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ देण्याचा नियम आहे. मात्र गडचिरोली जिल्ह्यातील नागरिक भात जास्त खातात, असा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला. त्यामुळे गव्हाचे प्रमाण कमी करून केवळ एक किलो गहू व चार किलो तांदूळ दिले जात होते. अनेक शेतकºयांकडे तांदूळ पिकत असल्याने त्यांना खºया अर्थाने गव्हाची गरज होती. मात्र गहूच कमी मिळत होते. या महिन्यात नियतनात बदल करण्यात आला आहे. गव्हाचे प्रमाण वाढवून प्रती व्यक्ती दोन किलो गहू व तीन किलो तांदूळ दिले जात आहेत. किमान हे प्रमाण तरी पुढे चालू ठेवावे, अशी मागणी आहे. दिवाळीच्या वेळी चना व उडीद डाळ पुरवठा करण्याची मागणी केली जात आहे.लाभार्थी सत्यापन मोहीम सुरूचमागील महिन्यांपासून सुरू झालेली लाभार्थी सत्यापन मोहीम सुरूच आहे. एक महिन्यात किमान ७० टक्के लाभार्थ्यांचे सत्यापन करायचे होते. मात्र काही दुकानदारांनी ७० टक्केपेक्षा कमी सत्यापन केले आहे. त्यामुळे त्यांना विचारणा केली जात आहे. लाभार्थी जीवंत आहे किंवा नाही, हे शोधण्यासाठी सदर मोहीम आवश्यक आहे.