शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

ग्रामसभांचा बांबू थेट कंपनीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 00:52 IST

पेसा कायद्यांतर्गत ग्रामसभांमार्फत बांबूची तोडणी करून कंत्राटदारांना दिले जात होते. परंतु मागील तीन वर्षांपासून ग्रामसभा बांबू तोडून त्याचा थेट पुरवठा संबंधित कंपनीला करीत आहेत. टनप्रमाणे बांबूची विक्री होत असल्याने ग्रामसभा मालामाल झाल्या आहेत.

ठळक मुद्देलाहेरी परिसर : तीन वर्षांपासून ग्रामसभांमार्फत तोडणी व विक्री

लोकमत न्यूज नेटवर्कलाहेरी : पेसा कायद्यांतर्गत ग्रामसभांमार्फत बांबूची तोडणी करून कंत्राटदारांना दिले जात होते. परंतु मागील तीन वर्षांपासून ग्रामसभा बांबू तोडून त्याचा थेट पुरवठा संबंधित कंपनीला करीत आहेत. टनप्रमाणे बांबूची विक्री होत असल्याने ग्रामसभा मालामाल झाल्या आहेत. सध्या ग्रामसभांना एका बंडलवर पूर्वीच्या १८ रूपयांऐवजी ९० रूपये मिळत आहेत.अनेक वर्षांपासून पेपर मिल कंपन्यांकडून बांबूची तोडणी मजुरांकरवी केली जात होती. येथील लोकांना रोजगार मिळत होता. परंतु पेसा व वनहक्क कायद्यामुळे ग्रामसभांना ९० रूपये प्रतिबंडल एवढा भाव मिळत असल्याने मागील तीन वर्षांपासून ग्रामसभाच बांबूची विक्री थेट कंपनीला करीत आहेत. यामध्ये कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप दिसून येत नाही.तालुक्यातील कोयर, आलदंडी, हितापाडी, कृष्णार, कोस्फुंडी, तिरकामेटा, कोडके व कोठी आदी ग्रामसभांनी कंत्राटदारांना बांबू विकला. कुचेर ग्रामसभेने मात्र वजनाप्रमाणे बांबूविक्री करण्याचा निर्णय घेतला. ग्रामसभांच्या पुढाकाराने बांबू विक्री केली जात आहे. सध्या दोन मीटरचा बांबूचा तुकडा पाडून बंडल तयार केले जात आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग