शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर काँग्रेस पक्षाला थेट आरोपी बनवता येईल"; नॅशनल हेराल्ड प्रकरणात EDचा न्यायालयात दावा
2
IND vs ENG: बुमराहवर प्रचंड संतापला रवी शास्त्री; गंभीर-गिल जोडीला म्हणाला- "त्याच्या हातातून..."
3
"एकदा तरी मला माझ्या बहिणीला भेटू द्या"; सोनम रघुवंशीच्या भावाची मागणी, म्हणाला... 
4
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!
5
८ वर्षांनी संधी; आता प्रमोशनही मिळालं! पण तो पुन्हा 'बिनकामाचा' ठरला
6
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
7
कठड्यावर धडकून बाईकखाली पाय अडकला अन...; दुचाकी पेटल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
8
टॉयलेटमध्ये जाणाऱ्या महिलांचे बनवत होता व्हिडीओ; प्रसिद्ध आयटी कंपनीमधील इंजिनियरला अटक
9
आधार कार्ड दिलं नाही म्हणून काढली पँट; कावड यात्रेआधी ओळख पटवणाऱ्या लोकांवर भडकले ओवैसी
10
इन्स्टाग्रामवर सूत जुळलं, कोर्ट मॅरेजनंतर मुलाला दिला जन्म; २२ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य
11
सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारे भारतीय कर्णधार, धोनी दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
12
"लग्न करुन येऊ? घर देणार का मग?", अ‍ॅक्टर असल्यामुळे मिळत नाहीये घर, पूजा कार्तुडे संतापली!
13
...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
14
२०२७ पर्यंत ३ राशींना साडेसाती कायम, २ राशींवर शनि दृष्टी; अशुभ प्रभाव वाढेल? ‘हे’ उपाय कराच
15
“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल
16
ENG vs IND : यशस्वी जैस्वाल इंग्लंडला नडला अन् कॅप्टन बेन स्टोक्सलाही भिडला; नेमकं काय घडलं?
17
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
18
काँग्रेस मजबूत करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सपकाळांचा पुढाकार; ८३ तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या
19
KL राहुलला विश्वासच बसेना! क्रिस वोक्सनं अप्रतिम चेंडूवर उडवला त्रिफळा (VIDEO)
20
मुसळधार पावसात AC सुरू ठेवणं योग्य आहे का? बहुतेक लोक करतात 'ही' चूक

भाजपचे ग्राम स्वराज अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 01:44 IST

स्वस्थ आणि समृद्ध भारत निर्मितीसाठी शासनामार्फत अनेक जनकल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. या योजनांचा लाभ नागरिकांना देण्यासाठी व जनसंपर्क वाढविण्यासाठी भाजपने १४ एप्रिलपासून ग्राम स्वराज अभियान सुरू केले आहे.

ठळक मुद्देपदाधिकाऱ्यांची बैठक : ५ मे पर्यंत शासकीय योजनांची माहिती पोहोचविणार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : स्वस्थ आणि समृद्ध भारत निर्मितीसाठी शासनामार्फत अनेक जनकल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. या योजनांचा लाभ नागरिकांना देण्यासाठी व जनसंपर्क वाढविण्यासाठी भाजपने १४ एप्रिलपासून ग्राम स्वराज अभियान सुरू केले आहे. हे अभियान ५ मे पर्यंत राबविले जाणार आहे.१८ एप्रिलला स्वच्छ भारत पर्व अंतर्गत प्रत्येक गावात स्वच्छता अभियान, हागणदारी मुक्त गावासाठी प्रचार, प्रसार, हागणदारीमुक्त गाव सर्वेक्षण करून सूचि/यादी प्रसिद्ध करणे, जनजागृती करणे, शौचालय बांधकामाला गती देणे, २० एप्रिलला उज्ज्वला पंचायत होईल. या अंतर्गत गॅस कनेक्शन वितरण मेळावा तसेच पात्र ग्राहकांची नोंदणी करून अभियानाची जागृती केली जाईल. २४ एप्रिलला पंचायती राज दिवस पाळला जाईल. या अंतर्गत राष्ट्रीय स्तरावर कार्यक्रम होईल. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबोधन टीव्हीवर थेट दाखविण्यात येईल. याकरिता गावांमध्ये ग्रामसभेचे आयोजन करून संबोधन ऐकविले जाईल. २८ एप्रिलला ग्रामशक्ती अभियान राबविले जाईल. या अभियानांतर्गत मागास गावात प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री सौभाग्य योजना, जनधन, स्वास्थ्य सुरक्षा मिशन, जीवनज्योती, मातृवंदना योजना आदी योजनांचा लाभ घेण्यासाठी समाधान शिबिराचे आयोजन केले जाईल. ३० एप्रिलला आयुष्यमान भारत अभियानांतर्गत ग्राम पंचायतींमध्ये राष्ट्रीय स्वास्थ्य सुरक्षा मिशन व आरोग्य योजनांची माहिती दिली जाईल. २ मे ला किसान कल्याण कार्यशाळेतून शेतकऱ्यांना मार्गदर्शन, ५ मे ला आजिविका व कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत पंतप्रधानांचे थेट संबोधन नागरिकांना ऐकविले जाईल, अशी माहिती खा. अशोक नेते यांनी सर्किट हाऊसमध्ये आयोजित बैठकीत दिली.यावेळी आ. डॉ. देवराव होळी, आ. कृष्णा गजबे, बाबुराव कोहळे, प्रशांत वाघरे, भारत खटी, कुथे, विलास गावंडे, स्वप्नील वरघंटे, प्रकाश गेडाम, दामोधर अरीगेला यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :BJPभाजपा