शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
3
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
5
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
6
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
7
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
8
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
9
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
10
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
11
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
12
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
13
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
14
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
15
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
16
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
17
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
18
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
19
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
20
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचे ग्राम स्वराज अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 01:44 IST

स्वस्थ आणि समृद्ध भारत निर्मितीसाठी शासनामार्फत अनेक जनकल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. या योजनांचा लाभ नागरिकांना देण्यासाठी व जनसंपर्क वाढविण्यासाठी भाजपने १४ एप्रिलपासून ग्राम स्वराज अभियान सुरू केले आहे.

ठळक मुद्देपदाधिकाऱ्यांची बैठक : ५ मे पर्यंत शासकीय योजनांची माहिती पोहोचविणार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : स्वस्थ आणि समृद्ध भारत निर्मितीसाठी शासनामार्फत अनेक जनकल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. या योजनांचा लाभ नागरिकांना देण्यासाठी व जनसंपर्क वाढविण्यासाठी भाजपने १४ एप्रिलपासून ग्राम स्वराज अभियान सुरू केले आहे. हे अभियान ५ मे पर्यंत राबविले जाणार आहे.१८ एप्रिलला स्वच्छ भारत पर्व अंतर्गत प्रत्येक गावात स्वच्छता अभियान, हागणदारी मुक्त गावासाठी प्रचार, प्रसार, हागणदारीमुक्त गाव सर्वेक्षण करून सूचि/यादी प्रसिद्ध करणे, जनजागृती करणे, शौचालय बांधकामाला गती देणे, २० एप्रिलला उज्ज्वला पंचायत होईल. या अंतर्गत गॅस कनेक्शन वितरण मेळावा तसेच पात्र ग्राहकांची नोंदणी करून अभियानाची जागृती केली जाईल. २४ एप्रिलला पंचायती राज दिवस पाळला जाईल. या अंतर्गत राष्ट्रीय स्तरावर कार्यक्रम होईल. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबोधन टीव्हीवर थेट दाखविण्यात येईल. याकरिता गावांमध्ये ग्रामसभेचे आयोजन करून संबोधन ऐकविले जाईल. २८ एप्रिलला ग्रामशक्ती अभियान राबविले जाईल. या अभियानांतर्गत मागास गावात प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री सौभाग्य योजना, जनधन, स्वास्थ्य सुरक्षा मिशन, जीवनज्योती, मातृवंदना योजना आदी योजनांचा लाभ घेण्यासाठी समाधान शिबिराचे आयोजन केले जाईल. ३० एप्रिलला आयुष्यमान भारत अभियानांतर्गत ग्राम पंचायतींमध्ये राष्ट्रीय स्वास्थ्य सुरक्षा मिशन व आरोग्य योजनांची माहिती दिली जाईल. २ मे ला किसान कल्याण कार्यशाळेतून शेतकऱ्यांना मार्गदर्शन, ५ मे ला आजिविका व कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत पंतप्रधानांचे थेट संबोधन नागरिकांना ऐकविले जाईल, अशी माहिती खा. अशोक नेते यांनी सर्किट हाऊसमध्ये आयोजित बैठकीत दिली.यावेळी आ. डॉ. देवराव होळी, आ. कृष्णा गजबे, बाबुराव कोहळे, प्रशांत वाघरे, भारत खटी, कुथे, विलास गावंडे, स्वप्नील वरघंटे, प्रकाश गेडाम, दामोधर अरीगेला यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :BJPभाजपा