शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

अन्यायाविरोधात ग्रामसभा व्यापक आंदोलन छेडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 22:30 IST

तालुक्यातील जुव्वी येथे संयुक्त ग्रामसभा बैठक घेण्यात आली. या बैठकीत आगामी वर्षात बांबू व तेंदू विक्री व्यवहार तसेच वनकायद्यानुसार सामूहिक वनहक्क संनियंत्रण समितीचे बँक खाते काढणे, याच खात्यातून आर्थिक व्यवहार करण्याचा ठराव घेण्यात आला. या ठरावावर चर्चाही करण्यात आली.

ठळक मुद्देजुव्वी गावात बैठक : बांबू, तेंदू विक्री, बँक खात्यांवर चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : तालुक्यातील जुव्वी येथे संयुक्त ग्रामसभा बैठक घेण्यात आली. या बैठकीत आगामी वर्षात बांबू व तेंदू विक्री व्यवहार तसेच वनकायद्यानुसार सामूहिक वनहक्क संनियंत्रण समितीचे बँक खाते काढणे, याच खात्यातून आर्थिक व्यवहार करण्याचा ठराव घेण्यात आला. या ठरावावर चर्चाही करण्यात आली. तसेच जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवर अन्याय, अत्याचाराच्या विरोधात व्यापक आंदोलन छेडण्याचा ठराव या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला.या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी चुक्कू पुंगाटी होते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प.सदस्य अ‍ॅड.लालसू नगोटी, पं.स.सभापती सुखराम मडावी, प्रेमिला कुड्यामी उपस्थित होते. सदर बैठकीत ग्रामसभांच्या आंदोलनामध्ये महिलांचा सहभाग वाढविणे, ग्रामसभांचे अध्यक्ष व सचिव पदावर महिलांना सामावून घेणे, ग्रामपंचायतस्तरावर ग्रामसभा आढावा बैठक घेऊन विविध विषयांवर चर्चा करणे, दर महिन्याला एकदा तालुकास्तरावर ग्रामसभा आढावा बैठक घेणे आदी बाबींवर चर्चा करण्यात आली. याशिवाय आदिवासी व इतर पारंपरिक वननिवासी वने अधिकार मान्यता कायद्यात देऊ केलेल्या परिसर हक्का दाव्याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.सूरजसागडसह जिल्ह्यात ठिकठिकाणी सुरू असलेल्या व प्रस्तावित सर्व खदानींना विरोध करणाऱ्या इतर ग्रामसभांच्या वतीने समर्थन देणे गरजेचे आहे. त्यादृष्टिकोनातून ग्रामसभेच्या पदाधिकाºयांनी पुढाकार घेतले पाहिजे, असेही उपस्थित मान्यवरांनी यावेळी सांगितले.भामरागड तालुक्यातील ज्या गावांना महसूल गाव म्हणून अद्यापही घोषित करण्यात आले नाही, अशी गावे महसुली गाव म्हणून घोषित होण्यासाठी ग्रामसभांनी पाठपुरावा करावा, असा ठराव या बैठकीत पारित करण्यात आला. विद्यमान सरकार भामरागड तालुक्यातील जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत आहे. तालुक्यात दुष्काळाची परिस्थिती भिषण आहे. मूलभूत समस्यांही कायम आहेत. या समस्यांना घेऊन आंदोलन करण्याची गरज असल्याचे अ‍ॅड.नोगोटी यांनी सांगितले.