शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

अन्यायाविरोधात ग्रामसभा व्यापक आंदोलन छेडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 22:30 IST

तालुक्यातील जुव्वी येथे संयुक्त ग्रामसभा बैठक घेण्यात आली. या बैठकीत आगामी वर्षात बांबू व तेंदू विक्री व्यवहार तसेच वनकायद्यानुसार सामूहिक वनहक्क संनियंत्रण समितीचे बँक खाते काढणे, याच खात्यातून आर्थिक व्यवहार करण्याचा ठराव घेण्यात आला. या ठरावावर चर्चाही करण्यात आली.

ठळक मुद्देजुव्वी गावात बैठक : बांबू, तेंदू विक्री, बँक खात्यांवर चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : तालुक्यातील जुव्वी येथे संयुक्त ग्रामसभा बैठक घेण्यात आली. या बैठकीत आगामी वर्षात बांबू व तेंदू विक्री व्यवहार तसेच वनकायद्यानुसार सामूहिक वनहक्क संनियंत्रण समितीचे बँक खाते काढणे, याच खात्यातून आर्थिक व्यवहार करण्याचा ठराव घेण्यात आला. या ठरावावर चर्चाही करण्यात आली. तसेच जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवर अन्याय, अत्याचाराच्या विरोधात व्यापक आंदोलन छेडण्याचा ठराव या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला.या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी चुक्कू पुंगाटी होते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प.सदस्य अ‍ॅड.लालसू नगोटी, पं.स.सभापती सुखराम मडावी, प्रेमिला कुड्यामी उपस्थित होते. सदर बैठकीत ग्रामसभांच्या आंदोलनामध्ये महिलांचा सहभाग वाढविणे, ग्रामसभांचे अध्यक्ष व सचिव पदावर महिलांना सामावून घेणे, ग्रामपंचायतस्तरावर ग्रामसभा आढावा बैठक घेऊन विविध विषयांवर चर्चा करणे, दर महिन्याला एकदा तालुकास्तरावर ग्रामसभा आढावा बैठक घेणे आदी बाबींवर चर्चा करण्यात आली. याशिवाय आदिवासी व इतर पारंपरिक वननिवासी वने अधिकार मान्यता कायद्यात देऊ केलेल्या परिसर हक्का दाव्याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.सूरजसागडसह जिल्ह्यात ठिकठिकाणी सुरू असलेल्या व प्रस्तावित सर्व खदानींना विरोध करणाऱ्या इतर ग्रामसभांच्या वतीने समर्थन देणे गरजेचे आहे. त्यादृष्टिकोनातून ग्रामसभेच्या पदाधिकाºयांनी पुढाकार घेतले पाहिजे, असेही उपस्थित मान्यवरांनी यावेळी सांगितले.भामरागड तालुक्यातील ज्या गावांना महसूल गाव म्हणून अद्यापही घोषित करण्यात आले नाही, अशी गावे महसुली गाव म्हणून घोषित होण्यासाठी ग्रामसभांनी पाठपुरावा करावा, असा ठराव या बैठकीत पारित करण्यात आला. विद्यमान सरकार भामरागड तालुक्यातील जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत आहे. तालुक्यात दुष्काळाची परिस्थिती भिषण आहे. मूलभूत समस्यांही कायम आहेत. या समस्यांना घेऊन आंदोलन करण्याची गरज असल्याचे अ‍ॅड.नोगोटी यांनी सांगितले.