शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

गाव दारूबंदीसाठीची ग्रामसभा कोरमअभावी करावी लागली तहकूब

By admin | Updated: February 26, 2015 01:39 IST

दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात गावात दारूबंदी करण्यासाठी कोरेगाव ग्रामपंचायतीने ग्रामसभा बोलाविली होती. मात्र सदर ग्रामसभा कोरमअभावी तहकूब ...

देसाईगंज : दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात गावात दारूबंदी करण्यासाठी कोरेगाव ग्रामपंचायतीने ग्रामसभा बोलाविली होती. मात्र सदर ग्रामसभा कोरमअभावी तहकूब करण्याची पाळी ग्रा. पं. प्रशासनावर आली. दारूविक्रेत्यापुढे प्रशासन हतबल असल्याचे चित्र या निमित्ताने पुढे आले आहे.कोरेगावात दारूबंदीसाठी आता महिलांनी मानवाधिकार आयोगाकडे सुद्धा तक्रार दाखल केली आहे. मात्र स्थानिक प्रशासन दारूबंदीबाबत अनुकूल नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. कोरेगावात दारूविक्रेत्यांनी कळस गाठला आहे. सायंकाळी बसस्थानक परिसरात केवळ दारूड्यांचा उत्पात सुरू राहतो. पोलीस प्रशासन दारूविक्रेत्यांवर नाममात्र कारवाई करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. दारूच्या व्यसनामुळे गावातील कित्येक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. दिवसागणीक गावातील दारूविक्रेत्यांची संख्या वाढत चालली आहे. पोलीस प्रशासनाला याबाबतची सर्व माहिती असूनही आजवर गावात कोणतीही मोठी कारवाई दारूविक्रेत्यांच्या विरोधात झालेली नाही. गावातील एका गल्लीत तर दिवसाढवळ्या महिला जाऊ शकत नाही, अशी परिस्थिती आहे. स्थानिक पोलीस प्रशासन कारवाई करण्यास हतबल असल्याने गावातील महिलांनी अवैध दारूविक्रीबाबत मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. गावात दारूविक्रेला मोठ्या प्रमाणावर उधाण आले असतानाही ग्रामपंचायत, तंटामुक्त समिती व गावातील नागरिक बघ्याची भूमिका घेऊन आहेत. परंतु महिलांचा त्रास प्रचंड वाढला आहे. त्यामुळे ग्रामसभेवर दबाव आला व नाईलाजास्तव ग्रामपंचायतने अवैध दारूविक्रीविरोधात बंदी घालण्यासाठी २४ फेब्रुवारी रोजी ग्रामसभा आयोजित केली होती. मात्र गावातील नागरिकाची ग्रामसभेला अत्यल्प उपस्थिती असल्याने मंगळवारी ग्रामसभा होऊ शकली नाही. त्यानंतर तहकूब झालेली ग्रामसभा २८ फेब्रुवारीला घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यापूर्वी दारूबंदीबाबत पोलीस प्रशासनानेदेखील गावात सभा घेतली होती. मात्र सभेनंतर दारूविक्रीचा जोर अधिक वाढला. लोकहितास्तव जिल्ह्यात दारूबंदी केली आहे. मात्र स्थानिक प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे दारूविक्री अनेक गावात जोमाने सुरू आहे. याला कोरेगावही अपवाद नाही. दररोज दारू माफीयांची चारचाकी वाहने गावागावात घरपोच दारू पोहोचवितात. लहान दुकानदारांवर कारवाई करून मोठ्या दुकानदारांना अभय देण्याची भूमिका पोलीस नेहमी घेत असल्यामुळे दारूबंदी गावात नावालाच उरलेली आहे, अशी परिस्थिती आहे. (वार्ताहर)