शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

बांबू विक्रीतून ग्रामसभा लखपती

By admin | Updated: August 24, 2016 02:19 IST

वनहक्क व पेसा कायद्याअंतर्गत ग्रामसभांना तेंदू तोडण्याचे व त्याची विक्री करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

४८ कोटींचे उत्पन्न : तेंदूपत्ता हंगामातून मिळाले १८ कोटी; दुर्गम भागाच्या विकासाची सुरुवातगडचिरोली : वनहक्क व पेसा कायद्याअंतर्गत ग्रामसभांना तेंदू तोडण्याचे व त्याची विक्री करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. जिल्हाभरातील शेकडो गावांना हजारो हेक्टर जंगलावर सामूहिक वनहक्क प्राप्त झाले आहेत. मागील वर्षी तेंदूपत्ता विक्रीतून ग्रामपंचायतींना सुमारे ४८ कोटी ४४ लाख रूपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. त्याचबरोबर तेंदूपत्त्याच्या हंगामातून १८ कोटी रूपयांची रक्कम मिळाली आहे. यामुळे ग्रामसभा लखपती होण्यास मदत झाली आहे. या निधीच्या माध्यमातून ग्रामीण व दुर्गम भागात अनेक विकास कामे सुरू झाली आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील बांबूचा दर्जा इतर जिल्ह्यातील बांबूच्या तुलनेत अतिशय चांगला आहे. त्यामुळे या बांबूला राष्ट्रीय बाजारपेठेत चांगली मागणी व भाव उपलब्ध होते. चार वर्षांपूर्वी बांबू विक्रीचे अधिकार लेखामेंढा ग्रामसभेला प्राप्त झाले. त्यानंतर हळूहळू इतरही ग्रामपंचायतींनी तेंदूविक्रीचे अधिकार प्राप्त केले. पावसाळा सुरू होण्यापूर्वी तेंदूपत्ता तोडणीचा हंगाम सुरू होतोे. जिल्ह्यात एकच पीक घेतले जाते. त्यामुळे उर्वरित आठ महिने नागरिकांना बेरोजगारीचा सामना करावा लागतो. नुकत्याच संपलेल्या हंगामात जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना बांबू विक्रीच्या माध्यमातून ४८ कोटी ४४ लाख रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे. ही रक्कम त्या-त्या गावांच्या ग्रामकोष निधीत जमा करण्यात आली आहे व त्यातून विकास खर्च करण्याचे अधिकार ग्रामसभांना देण्यात आले आहेत.मानव विकास मिशनच्या माध्यमातूनही निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. २५ कोटी रूपयांची तरतूद गडचिरोली जिल्ह्यासाठी करण्यात आली आहे. यापैकी १८ कोटी रूपये खर्चसुद्धा झाले आहेत. मानव विकास कार्यक्रमातून जिल्ह्यात मुलींच्या शिक्षणासाठी मदत म्हणून ७७ बसेस चालविल्या जात आहेत. यासर्व योजनांमुळे दुर्गम भागात वास्तव्यास असलेल्या आदिवासींसह गैरआदिवासी नागरिकांचाही विकास होण्यास फार मोठी मदत झाली आहे. शासनाच्या विविध योजनांमुळे वार्षीक उत्पन्न वाढीस मदत झाली आहे. (नगर प्रतिनिधी)१७ कोटी रूपयांचा विशेष निधी प्राप्त पेसा कायद्याअंतर्गत मोडणाऱ्या ग्रामसभांना पाच टक्के विशेष विकास निधी प्राप्त होतोे. याअंतर्गत गडचिरोली जिल्ह्याला १६ कोटी ९८ लाख रूपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या निधीच्या माध्यमातून ग्रामीण भागात पाणीपुरवठा स्वच्छता, मूलभूत सोयीसुविधा, रस्ता आदी विकास कामे केली जातात. त्याचबरोबर नागरिकांच्या उपजीविकेचे साधनही प्राप्त होईल, यासाठी प्रयत्न केला जात आहे. उपजीविका साधन निर्मितीसाठी एकूण ४४ टक्के निधीचा वापर करण्यात येत आहे. ही बाब भविष्यातील विकासाची नांदी ठरणार आहे.