शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
4
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
5
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
6
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
7
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
8
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
9
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
10
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
11
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
12
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
13
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
14
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
15
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
16
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
17
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
18
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
19
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
20
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल

ग्राम पंचायती निधी खर्च करण्यात नापास

By admin | Updated: April 5, 2015 01:54 IST

गडचिरोली जिल्ह्यात ४६७ ग्राम पंचायती आहेत. यांना मोठ्या प्रमाणावर निधी शासनाकडून देण्यात येत आहे.

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात ४६७ ग्राम पंचायती आहेत. यांना मोठ्या प्रमाणावर निधी शासनाकडून देण्यात येत आहे. मात्र मागील दोन वर्षात ग्राम पंचायतींनी केवळ ५० टक्केच निधी खर्च केल्याची माहिती पुढे आली आहे. जिल्हा सामाजिक, आर्थिक समालोचन- २०१३ च्या अहवालातून ग्राम पंचायतींनी सरासरी केवळ ४९.२६ टक्के निधी खर्च केल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील ग्राम पंचायतींना स्थानिकस्तरावर जमीन व इतर मालमत्ता कर, इतर कर व शुल्काच्या माध्यमातून उत्पन्न मिळत असते. तसेच शासनाकडून शासकीय अनुदान, अंशदान देणग्या व इतर अनुदानाच्या माध्यमातून उत्पन्न मिळते. जिल्ह्यात ४६७ ग्राम पंचायती आहेत. या ग्राम पंचायतींना २०११-१२ मध्ये विविध माध्यमातून २ हजार ८२.८८ लाख रूपयांचे उत्पन्न मिळाले होते. यावर्षी सर्वच ग्राम पंचायतींच्या खर्चाची टक्केवारी ५१.४८ टक्के एवढी असल्याचे अहवालात नमूद केले आहे. २०१२-१३ या वर्षात सर्वच ग्राम पंचायतींना २ हजार २६२.३८ लाख रूपयांचे उत्पन्न प्राप्त झाले होते. त्यापैकी १ हजार ४१.५ लाख रूपये खर्च करण्यात आले. खर्चाची टक्केवारी ४६.०४ टक्के आहे. ग्राम पंचायतींना प्रशासन, आरोग्य व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक दिवाबत्ती, शिक्षण, लोककल्याण व इतर बाबीवर खर्च करावा लागतो. जिल्ह्यातील ग्राम पंचायतींनी २०११-१२ मध्ये आरोग्य व स्वच्छतेवर २८.५० टक्के, सार्वजनिक बांधकाम १४ टक्के, सार्वजनिक दिवाबत्ती १०.८१ टक्के, शिक्षण ७.४६ टक्के, लोककल्याण १.३४ टक्के तर इतर बाबीवर २.८० टक्के खर्च केला असल्याचे स्पष्ट झाले आहे.२०१२-१३ मध्ये ग्राम पंचायतींनी आरोग्य व स्वच्छतेवर २३.५१ टक्के, सार्वजनिक बांधकाम १४.९५ टक्के, सार्वजनिक दिवाबत्ती ११.६२ टक्के, शिक्षण ७.२० टक्के, लोककल्याण १.१८ टक्के व इतर बाबीवर २.४१ टक्के रक्कम खर्च केल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. २०११-१२ मध्ये जिल्ह्यातील ग्राम पंचायतींकडे १०१०.६५ अखर्चित होते. तर २०१२-१३ मध्ये १२२०.८८ लाख रूपये अखर्चित होते.