शहरं
Join us  
Trending Stories
1
'तिला न्याय देण्याऐवजी भाजपच्या व्यवस्थेने आरोपींना वाचवले'; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र
2
दोन महिलांपुढे पायलटनेही हात टेकले; विमानात जोरजोरात भांडत बसल्या अन् पुढे असे घडले...
3
टेस्लाची पहिली कार मॉडल Y लाँच, किंमत २३ लाख नाही, तुमचा आमचा श्वास रोखणारी... EMI किती?
4
'श्रीमंत' बनेल तुमचं मूल, या ६ मार्गांनी 'सुरक्षा कवच' तयार करा; महागाई देखील मार्ग अडवू शकणार नाही
5
सोने सांभाळण्याची भीती वाटते? ऑनलाईन पर्यायातून मिळेल जास्त नफा, कशी करायची गुंतवणूक?
6
अल्पसंख्याक अन् एससी-एसटींविरुद्ध भेदभाव केल्यास होणार तुरुंगवास; काँग्रेसच्या 'रोहित वेमुला' विधेयकात काय?
7
वाहन उद्योग क्षेत्रासाठी आजचा दिवस महत्त्वाचा; एकाचवेळी दोन दिग्गज कंपन्या भारतात एन्ट्री करणार
8
निमिषा प्रियाचा जीव वाचवण्यासाठी आणखी एक आशेचा किरण! येमेनच्या बंद खोलीत चर्चा सुरू
9
...नाहीतर भारत-पाकिस्तानमध्ये अण्वस्त्र युद्ध झालं असतं; डोनाल्ड ट्रम्प यांचा स्फोटक दावा
10
Video: प्रतीक्षा संपली, इलॉन मस्क यांची भारतात एन्ट्री! असं आहे Tesla चं मुंबईतील पहिलं शोरुम
11
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
12
Stock Market Today: २० अंकांनी घसरुन उघडला सेन्सेक्स; फार्मा आणि मेटल क्षेत्रात खरेदी, थोड्याच वेळात का आली तेजी?
13
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
14
क्रूरतेचा कळस! सैनिकाचे पोट फाडून त्यात ठेवला बॉम्ब; नक्षलवादी योगेंद्र कसा पकडला गेला?
15
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
16
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
17
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
18
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
19
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
20
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद

तेंदूपत्ता व्यवसायासाठी ग्रामपंचायतीला अनुदान

By admin | Updated: December 1, 2014 22:52 IST

वनहक्क कायदा २००६ नुसार ग्रामसभेला सामुहिक वनहक्क प्रदान करण्यात आले आहे. गौण वनोपजाच्या व्यवस्थापनाचे अधिकार ग्रामसभेला मिळाले आहे. तेंदूपत्ता संकलनाचे कामही त्यामुळे आता ग्रामसभांना मिळणार आहे.

कंत्राटदारांवर संक्रांत : ग्रामसभा होणार मालामालसिराज पठाण - कुरखेडावनहक्क कायदा २००६ नुसार ग्रामसभेला सामुहिक वनहक्क प्रदान करण्यात आले आहे. गौण वनोपजाच्या व्यवस्थापनाचे अधिकार ग्रामसभेला मिळाले आहे. तेंदूपत्ता संकलनाचे कामही त्यामुळे आता ग्रामसभांना मिळणार आहे. ग्रामसभांना या व्यवसायासाठी महाराष्ट्र मानव विकास कार्यक्रमातून बीज भांडवल (अनुदान) उपलब्ध होणार आहे. यामुळे ग्रामसभा मालामाल होणार असून वर्षानूवर्ष तेंदूपत्ता संकलनाचा कंत्राट घेणाऱ्या कंत्राटदारावर आता मात्र संक्रांत आली आहे. गडचिरोली जिल्ह्यात ७६ टक्के जंगल आहे. ५ वनविभागाच्या मार्फत जंगलाची देखभाल केली जाते. गडचिरोली जिल्ह्यात जवळजवळ १६० तेंदूयुनिट आहे व जिल्ह्यात राज्यपालांच्या पेसा कायद्यांतर्गतच्या १२ आॅगस्ट २०१४ च्या अधिसूचनेनुसार तेंदू, बांबूसह सर्व वनोपजावर मालकीच्या अधिकार ग्रामसभेला प्रदान करण्यात आले आहे. त्यामुळे वनविभाग यंदा पेसा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील ई-निविदामार्फत तेंदू युनिटची विक्री करणार नाही. या गावांमध्ये ग्रामसभेलाच तेंदू संकलन, विक्री, भरती, प्रक्रिया, वाहतूक व साठवणूक आदी टप्पे ग्रामसभांनाच पार पाडावयाचे आहेत. मागील वर्षी प्रायोगिक तत्वावर जिल्ह्यातील काही ग्रामसभांना तेंदू संकलनाचे कार्य सोपविण्यात आले होते. मात्र यंदा सदर हक्क सर्व गावांना प्रदान करण्यात आला आहे. या गावातील संबंधीत ग्रामसभांना हा व्यवसाय ग्रामसभा करण्यास तयार असल्याबाबतचा ठराव शासनाकडे सादर करणे गरजेचे आहे. ग्रामसभांना या व्यवसायाकरीता मजुरांचे वेतन, मालाची साठवणूक, वाहतूक खर्च, वनोपजातून मिळणाऱ्या महसूलाच्या लेखा नोंदी ठेवणे आदी बाबींसाठी खेळत्या भांडवालाची आवश्यकता भासणार आहे. याकरीता २१ आॅगस्ट २०१४ च्या शासन निर्णयानुसार राज्यातील ज्या गावांमध्ये पंचायत विस्तार कायदा १९९६ (पेसा) व वनहक्क कायदा २००६ च्या तरतूदी लागू होतात. अशा गावांना वनोपजाचा व्यवसाय करण्यासाठी मानव विकास कार्यक्रमांतर्गत शासनाकडून ग्रामसभांना अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून दरवर्षी निवळ नफ्यातील २० टक्के रक्कम संबंधीत ग्रामसभेच्या कोषात भरावे लागणार आहे. या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे ग्रामसभा मालामाल होणार असून अनेक गाव आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यास मदत होणार आहे.