शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे मानधन थकले

By admin | Updated: October 8, 2014 23:26 IST

पंचायत समितीच्या चुकीच्या धोरणामुळे गडचिरोली तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे मागील अडीच वर्षापासूनचे मानधन थकले आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची पाळी आली

गडचिरोली : पंचायत समितीच्या चुकीच्या धोरणामुळे गडचिरोली तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे मागील अडीच वर्षापासूनचे मानधन थकले आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची पाळी आली असली तरी निरगट्ट झालेल्या पंचायत समितीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना याबाबत काहीच सोयर सुतक नसल्याचे दिसून येत असून केवळ १५ दिवसात मानधन दिले जाईल असे सांगत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची बोळवण केली जात आहे. वाढीव अनुदान लागू करण्यापूर्वी जुलै २०१३ पर्यंत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना १ हजार ३०० रूपये मानधन दिले जात होते. यातील ५० टक्के म्हणजेच ६५० रूपये मानधन ग्रामपंचायत देते. तर उर्वरित ५० टक्के मानधन राज्य शासनाकडून उपलब्ध होते. राज्यशासनाकडून गडचिरोली पंचायत समितीला ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागील अडीच वर्षापासूनच्या मानधनाची रक्कम डिसेंबर २०१३ मध्येच प्राप्त झाली आहे. मात्र पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी अजूनपर्यंत या मानधनाचे वाटप ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना केले नाही. मागील १० महिन्यांपासून ग्रामपंचायत कर्मचारी पंचायत समितीचा उंबरठा झिजवून मानधन देण्याची याचना करीत आहेत. मात्र कर्मचारी नवीन असल्याने त्याला बिल काढता येत नाही, हेच कारण मागील १० महिन्यांपासून सांगत पानावर आणून हातावर खाणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची बोळवण करीत आहेत. एखाद्या कर्मचाऱ्याला काम येत नसेल तर त्याला केवळ सही मारण्याचे पैसे शासन देतो काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पंचायत समितीच्या दुसऱ्या कर्मचाऱ्याकडे सदर काम येथील संवर्ग विकास अधिकारी का देत नाही, असाही प्रश्न ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित करीत आहेत. महत्वाचे म्हणजे जिल्ह्यातील इतर पंचायत समितीमधील ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचे मानधन वाटप झाले आहे. गडचिरोली ही एकमेव पंचायत समिती आहे की, ज्यामध्ये कर्मचाऱ्यांचे मानधन झाले नाही. कर्मचारी काम करीत नसल्याने हा गुंता मागील दहा महिन्यांपासून सुटला नाही. याचा अर्थ संवर्ग विकास अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांवर नियंत्रण राहीलेले नाही. असाही आरोप कर्मचारी युनियनने केला आहे.ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे सुमारे ५० कुटुंब हालअपेष्ठेचे जीवन जगत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालून मानधनाचे वाटप तत्काळ करण्यासंबंधी संवर्ग विकास अधिकाऱ्यांना आदेश द्यावे, अशीही मागणी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी केली आहे. दिवाळीपूर्वी मानधन न दिल्यास पंचायत समितीसमोर आंदोलन करण्याचा इशारा युनियनने दिला आहे. (नगर प्रतिनिधी)