शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे मानधन थकले

By admin | Updated: October 8, 2014 23:26 IST

पंचायत समितीच्या चुकीच्या धोरणामुळे गडचिरोली तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे मागील अडीच वर्षापासूनचे मानधन थकले आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची पाळी आली

गडचिरोली : पंचायत समितीच्या चुकीच्या धोरणामुळे गडचिरोली तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे मागील अडीच वर्षापासूनचे मानधन थकले आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची पाळी आली असली तरी निरगट्ट झालेल्या पंचायत समितीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना याबाबत काहीच सोयर सुतक नसल्याचे दिसून येत असून केवळ १५ दिवसात मानधन दिले जाईल असे सांगत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची बोळवण केली जात आहे. वाढीव अनुदान लागू करण्यापूर्वी जुलै २०१३ पर्यंत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना १ हजार ३०० रूपये मानधन दिले जात होते. यातील ५० टक्के म्हणजेच ६५० रूपये मानधन ग्रामपंचायत देते. तर उर्वरित ५० टक्के मानधन राज्य शासनाकडून उपलब्ध होते. राज्यशासनाकडून गडचिरोली पंचायत समितीला ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागील अडीच वर्षापासूनच्या मानधनाची रक्कम डिसेंबर २०१३ मध्येच प्राप्त झाली आहे. मात्र पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी अजूनपर्यंत या मानधनाचे वाटप ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना केले नाही. मागील १० महिन्यांपासून ग्रामपंचायत कर्मचारी पंचायत समितीचा उंबरठा झिजवून मानधन देण्याची याचना करीत आहेत. मात्र कर्मचारी नवीन असल्याने त्याला बिल काढता येत नाही, हेच कारण मागील १० महिन्यांपासून सांगत पानावर आणून हातावर खाणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची बोळवण करीत आहेत. एखाद्या कर्मचाऱ्याला काम येत नसेल तर त्याला केवळ सही मारण्याचे पैसे शासन देतो काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पंचायत समितीच्या दुसऱ्या कर्मचाऱ्याकडे सदर काम येथील संवर्ग विकास अधिकारी का देत नाही, असाही प्रश्न ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित करीत आहेत. महत्वाचे म्हणजे जिल्ह्यातील इतर पंचायत समितीमधील ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचे मानधन वाटप झाले आहे. गडचिरोली ही एकमेव पंचायत समिती आहे की, ज्यामध्ये कर्मचाऱ्यांचे मानधन झाले नाही. कर्मचारी काम करीत नसल्याने हा गुंता मागील दहा महिन्यांपासून सुटला नाही. याचा अर्थ संवर्ग विकास अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांवर नियंत्रण राहीलेले नाही. असाही आरोप कर्मचारी युनियनने केला आहे.ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे सुमारे ५० कुटुंब हालअपेष्ठेचे जीवन जगत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालून मानधनाचे वाटप तत्काळ करण्यासंबंधी संवर्ग विकास अधिकाऱ्यांना आदेश द्यावे, अशीही मागणी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी केली आहे. दिवाळीपूर्वी मानधन न दिल्यास पंचायत समितीसमोर आंदोलन करण्याचा इशारा युनियनने दिला आहे. (नगर प्रतिनिधी)