शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे मानधन थकले

By admin | Updated: October 8, 2014 23:26 IST

पंचायत समितीच्या चुकीच्या धोरणामुळे गडचिरोली तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे मागील अडीच वर्षापासूनचे मानधन थकले आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची पाळी आली

गडचिरोली : पंचायत समितीच्या चुकीच्या धोरणामुळे गडचिरोली तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे मागील अडीच वर्षापासूनचे मानधन थकले आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची पाळी आली असली तरी निरगट्ट झालेल्या पंचायत समितीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना याबाबत काहीच सोयर सुतक नसल्याचे दिसून येत असून केवळ १५ दिवसात मानधन दिले जाईल असे सांगत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची बोळवण केली जात आहे. वाढीव अनुदान लागू करण्यापूर्वी जुलै २०१३ पर्यंत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना १ हजार ३०० रूपये मानधन दिले जात होते. यातील ५० टक्के म्हणजेच ६५० रूपये मानधन ग्रामपंचायत देते. तर उर्वरित ५० टक्के मानधन राज्य शासनाकडून उपलब्ध होते. राज्यशासनाकडून गडचिरोली पंचायत समितीला ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागील अडीच वर्षापासूनच्या मानधनाची रक्कम डिसेंबर २०१३ मध्येच प्राप्त झाली आहे. मात्र पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी अजूनपर्यंत या मानधनाचे वाटप ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना केले नाही. मागील १० महिन्यांपासून ग्रामपंचायत कर्मचारी पंचायत समितीचा उंबरठा झिजवून मानधन देण्याची याचना करीत आहेत. मात्र कर्मचारी नवीन असल्याने त्याला बिल काढता येत नाही, हेच कारण मागील १० महिन्यांपासून सांगत पानावर आणून हातावर खाणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची बोळवण करीत आहेत. एखाद्या कर्मचाऱ्याला काम येत नसेल तर त्याला केवळ सही मारण्याचे पैसे शासन देतो काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पंचायत समितीच्या दुसऱ्या कर्मचाऱ्याकडे सदर काम येथील संवर्ग विकास अधिकारी का देत नाही, असाही प्रश्न ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित करीत आहेत. महत्वाचे म्हणजे जिल्ह्यातील इतर पंचायत समितीमधील ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचे मानधन वाटप झाले आहे. गडचिरोली ही एकमेव पंचायत समिती आहे की, ज्यामध्ये कर्मचाऱ्यांचे मानधन झाले नाही. कर्मचारी काम करीत नसल्याने हा गुंता मागील दहा महिन्यांपासून सुटला नाही. याचा अर्थ संवर्ग विकास अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांवर नियंत्रण राहीलेले नाही. असाही आरोप कर्मचारी युनियनने केला आहे.ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे सुमारे ५० कुटुंब हालअपेष्ठेचे जीवन जगत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालून मानधनाचे वाटप तत्काळ करण्यासंबंधी संवर्ग विकास अधिकाऱ्यांना आदेश द्यावे, अशीही मागणी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी केली आहे. दिवाळीपूर्वी मानधन न दिल्यास पंचायत समितीसमोर आंदोलन करण्याचा इशारा युनियनने दिला आहे. (नगर प्रतिनिधी)