शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
3
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4
कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...
5
२ हेल्थ इन्शुन्स पॉलिसी एकाच वेळी करता येतात क्लेम; फक्त 'ही' प्रक्रिया माहिती असायला हवी
6
एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार
7
मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
8
मित्रच बनला शत्रू! आधी मैत्रिणीचा गळा कापला, मग जिवंत जाळून पळ काढला
9
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
10
व्वा रे पठ्ठ्यांनो! 'या' गावाने दिले १०० IAS; प्रत्येक घरात सरकारी नोकरी, म्हणतात अधिकाऱ्यांचं गाव
11
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
12
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
13
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
14
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
15
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
16
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी
17
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
18
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
19
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
20
गावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी

बाजार भरूनही ग्रामपंचायत उत्पन्नापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:44 IST

चामोर्शी तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या आष्टी येथे दर शुक्रवारी आठवडी बाजार भरत असतो. जिल्ह्यातील बऱ्याच गावात कोरोनाकाळातही नियोजित जागीच ...

चामोर्शी तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या आष्टी येथे दर शुक्रवारी आठवडी बाजार भरत असतो. जिल्ह्यातील बऱ्याच गावात कोरोनाकाळातही नियोजित जागीच बाजार भरविला जात आहे. मात्र आष्टी येथील बाजार हा नियोजित जागेवर न भरता बालाजी टाऊनच्या रस्त्यावर भरत आहे. त्याठिकाणी पावसामुळे चिखल झाला आहे. त्यामुळे नागरिकांना बाजार करण्यासाठी चिखलातून पाय तुडवीत जावे लागते. बाजार संपल्यावर सायंकाळी खराब भाजीपाला व्यापारी त्याच ठिकाणी फेकून देत आहे. त्यामुळे परिसरात वास्तव्याने असणाऱ्यांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.

आठवडी बाजारातून ग्रामपंचायतीला लाखो रुपयांचा महसूल प्राप्त होत असतो. मात्र सध्या इतरत्र बाजार भरत असल्याने ग्रामपंचायतीला मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे ग्रामविकासावर याचा परिणाम होत आहे. याकडे ग्रामपंचायत, महसूल विभाग व पोलीस विभागाने लक्ष देऊन सदर आठवडी बाजार हा नियोजित जागीच भरविण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.