शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

धान्याचा पुरवठा चार महिन्यांपासून बंद

By admin | Updated: June 12, 2014 00:02 IST

आरमोरी तालुक्यातील एपीएल कार्ड धारकांना मागील ४ महिन्यापासून सरकारी स्वस्त धान्य दुकानातून मिळणारे धान्य बंद झाले असल्याने या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे.

ठाणेगाव : आरमोरी तालुक्यातील एपीएल कार्ड धारकांना मागील ४ महिन्यापासून सरकारी स्वस्त धान्य दुकानातून मिळणारे धान्य बंद झाले असल्याने या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे. केंद्र शासनाने अन्न सुरक्षा योजना लागू केली. या योजनेत बीपीएल कार्डधारकांसोबतच एपीएल कार्डधारकांनाही समाविष्ठ केले. काही नागरिकांनी राशन कार्डाचे नुतनीकरण करून कार्ड विभक्त केले. कार्ड विभक्त झाल्यानंतरही पिवळ्या कार्डधारकांना पिवळेच कार्ड देणे आवश्यक होते. मात्र विभक्त झाल्यानंतर त्यांना केशरी रंगाचे कार्ड देण्यात आले. त्यामुळे पिवळ्या कार्डामुळे होणाऱ्या लाभापासून या नागरिकांना वंचित राहावे लागले. बहुतांश कुटुंबांचा अन्न सुरक्षा योजनेतही समावेश झाला नाही. त्यामुळे या नागरिकांना १० रूपये तांदूळ व ७ रूपये किलो दराने गहु खरेदी करावे लागत आहे. खुल्या बाजारात अन्न धान्याचे भाव गगनाला भिडले असल्याने नागरिक सरकारी धान्य दुकानातूनच धान्य खरेदी करीत होते. मात्र अचानक एपीएल कार्डधारकांचा राशनचा पुरवठा मागील ४ महिन्यापासून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे. दिवसभर काबाळकष्ट करून १०० रूपये मजुरी कमाविणाऱ्या नागरिकाला ४० रूपये किलोचे तांदूळ व २५ रूपये किलोचे गहू खरेदी करणे शक्य होत नाही. खुल्या बाजारातून तांदूळ, गहू खरेदी करावयास गेल्यास त्याची दिवसाची मजुरीही पुरत नाही. अशा स्थितीत इतर खर्च कसा करावा असा प्रश्न निर्माण होत आहे. उन्हाळ्यामध्ये शेतीची कामे बंद राहत असल्याने रोजगार मिळत नाही. त्यामुळे पैसाही जवळ राहत नाही. या आर्थिक विंवचनेत असतांना धान्य खरेदी करणे शक्य होत नाही. ठाणेगाव परिसरातील बहुसंख्य नागरिक शेतीवर अवलंबून आहेत. शेतीसाठी आवश्यक असलेले बी-बियाणे व खते खरेदी करण्यासाठी जवळची गाठोडी खर्च करावी की त्यातून अन्न धान्य घ्यावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आणखी काही महिने धान्याचा पुरवठा न केल्यास अनेक कुटुंबावर उपाशी राहण्याची पाळी येणार आहे. त्यामुळे एपीएलधारकांनाही अन्नधान्याचा पुरवठा करण्यात यावा त्याचबरोबर ज्या गरीब नागरिकांना केशरी कार्ड देण्यात आले आहे. त्यांना पिवळे कार्ड देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.