शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
4
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
5
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
6
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
7
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
8
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
9
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
10
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
11
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
12
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
13
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
14
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
15
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
16
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
17
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
18
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
19
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
20
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला

धान्याचा पुरवठा चार महिन्यांपासून बंद

By admin | Updated: June 12, 2014 00:02 IST

आरमोरी तालुक्यातील एपीएल कार्ड धारकांना मागील ४ महिन्यापासून सरकारी स्वस्त धान्य दुकानातून मिळणारे धान्य बंद झाले असल्याने या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे.

ठाणेगाव : आरमोरी तालुक्यातील एपीएल कार्ड धारकांना मागील ४ महिन्यापासून सरकारी स्वस्त धान्य दुकानातून मिळणारे धान्य बंद झाले असल्याने या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे. केंद्र शासनाने अन्न सुरक्षा योजना लागू केली. या योजनेत बीपीएल कार्डधारकांसोबतच एपीएल कार्डधारकांनाही समाविष्ठ केले. काही नागरिकांनी राशन कार्डाचे नुतनीकरण करून कार्ड विभक्त केले. कार्ड विभक्त झाल्यानंतरही पिवळ्या कार्डधारकांना पिवळेच कार्ड देणे आवश्यक होते. मात्र विभक्त झाल्यानंतर त्यांना केशरी रंगाचे कार्ड देण्यात आले. त्यामुळे पिवळ्या कार्डामुळे होणाऱ्या लाभापासून या नागरिकांना वंचित राहावे लागले. बहुतांश कुटुंबांचा अन्न सुरक्षा योजनेतही समावेश झाला नाही. त्यामुळे या नागरिकांना १० रूपये तांदूळ व ७ रूपये किलो दराने गहु खरेदी करावे लागत आहे. खुल्या बाजारात अन्न धान्याचे भाव गगनाला भिडले असल्याने नागरिक सरकारी धान्य दुकानातूनच धान्य खरेदी करीत होते. मात्र अचानक एपीएल कार्डधारकांचा राशनचा पुरवठा मागील ४ महिन्यापासून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे. दिवसभर काबाळकष्ट करून १०० रूपये मजुरी कमाविणाऱ्या नागरिकाला ४० रूपये किलोचे तांदूळ व २५ रूपये किलोचे गहू खरेदी करणे शक्य होत नाही. खुल्या बाजारातून तांदूळ, गहू खरेदी करावयास गेल्यास त्याची दिवसाची मजुरीही पुरत नाही. अशा स्थितीत इतर खर्च कसा करावा असा प्रश्न निर्माण होत आहे. उन्हाळ्यामध्ये शेतीची कामे बंद राहत असल्याने रोजगार मिळत नाही. त्यामुळे पैसाही जवळ राहत नाही. या आर्थिक विंवचनेत असतांना धान्य खरेदी करणे शक्य होत नाही. ठाणेगाव परिसरातील बहुसंख्य नागरिक शेतीवर अवलंबून आहेत. शेतीसाठी आवश्यक असलेले बी-बियाणे व खते खरेदी करण्यासाठी जवळची गाठोडी खर्च करावी की त्यातून अन्न धान्य घ्यावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आणखी काही महिने धान्याचा पुरवठा न केल्यास अनेक कुटुंबावर उपाशी राहण्याची पाळी येणार आहे. त्यामुळे एपीएलधारकांनाही अन्नधान्याचा पुरवठा करण्यात यावा त्याचबरोबर ज्या गरीब नागरिकांना केशरी कार्ड देण्यात आले आहे. त्यांना पिवळे कार्ड देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.